शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

मुखर्जी पंतप्रधान असते तर सत्ता गेलीच नसती

By admin | Updated: December 16, 2015 03:58 IST

सन २००४ मध्ये पंतप्रधानपदी प्रणव मुखर्जी यांच्याऐवजी मनमोहनसिंग यांची वर्णी लागली त्याक्षणी केवळ काँग्रेसच्याच नाही तर बाहेरच्या लोकांनाही आश्चर्य वाटले होते.

नवी दिल्ली : सन २००४ मध्ये पंतप्रधानपदी प्रणव मुखर्जी यांच्याऐवजी मनमोहनसिंग यांची वर्णी लागली त्याक्षणी केवळ काँग्रेसच्याच नाही तर बाहेरच्या लोकांनाही आश्चर्य वाटले होते. प्रणव मुखर्जी पंतप्रधान असते तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे चित्र काहीसे वेगळे राहिले असते,असे आजही अनेकांचे मत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी ‘दी अदर साइड आॅफ दी माऊंटेन’ या आपल्या नव्या पुस्तकात हे विचार मांडले आहेत.जून १९९१ ते १९९६ या काळात नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री असताना मनमोहनसिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा बदलली होती. संपूर्ण राष्ट्राने यासाठी त्यांची प्रशंसा केली होती. मात्र १९९९ मध्ये मनमोहनसिंग देशातील काँग्रेसची सर्वात सुरक्षित जागा मानल्या गेलेल्या दक्षिण दिल्लीतून निवडणुकीच्या आखड्यात उतरले आणि अनेकांना कदाचित स्मरणातही नसेल अशा एका उमेदवाराने त्यांचा पराभव केला. मनमोहनसिंग यांचा पराभव करणारे हे उमेदवार होते भाजपाचे विजय कुमार मल्होत्रा. सुरुवातीचा सौम्य विरोध सोडला तर संपुआ-१ चे नेतृत्व करण्यासाठी सोनिया गांधी यांनी मनमोहनसिंग यांची निवड केली तेव्हा या निर्णयाचे मोठे स्वागत झाले. केवळ स्वागतच नाही तर पाच वर्षांनंतर जनतेने पुन्हा एकदा संपुआला कौल देऊन हा निर्णय योग्य ठरवला, असे खुर्शीद यांनी लिहिले आहे. माझे पुस्तक कुण्या एका व्यक्तीचे नाही तर संपुआचा भाग असलेल्या अनेकांचे संक्षिप्त चरित्र आहे,असेही खुर्शीद यांनी आपल्या पुस्तकात आवर्जून नमुद केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘पक्षात नैराश्य पसरले होते’२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील निकालानंतरच्या घडामोडींचा उल्लेखही त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. १६ मे रोजी लोकसभेचा निकाल आला. आम्ही (संपुआचे मंत्री) विविध मतदारसंघातून नवी दिल्लीला परतलो. पराभव झाला होता पण पराभव मान्य न करणाऱ्या योद्ध्यांसारखी आमची स्थिती होती. आता आम्ही भूतकाळ होतो. काँग्रेसमध्ये नैराश्य पसरले होते, असे त्यांनी लिहिले आहे. हाच धागा पकडून काँग्रेसचे अस्तित्व संकटात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघेही लोकप्रिय नेते आहेत आणि लोकांमधून निवडून आलेले नेते आहे. मात्र पर्यायी नेतृत्वाचा विचार केल्यास दूरदूरपर्यंत काँग्रेसमध्ये कुणीच दिसत नाही, असेही त्यांनी लिहिले आहे.