शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

मुखर्जी पंतप्रधान असते तर सत्ता गेलीच नसती

By admin | Updated: December 16, 2015 03:58 IST

सन २००४ मध्ये पंतप्रधानपदी प्रणव मुखर्जी यांच्याऐवजी मनमोहनसिंग यांची वर्णी लागली त्याक्षणी केवळ काँग्रेसच्याच नाही तर बाहेरच्या लोकांनाही आश्चर्य वाटले होते.

नवी दिल्ली : सन २००४ मध्ये पंतप्रधानपदी प्रणव मुखर्जी यांच्याऐवजी मनमोहनसिंग यांची वर्णी लागली त्याक्षणी केवळ काँग्रेसच्याच नाही तर बाहेरच्या लोकांनाही आश्चर्य वाटले होते. प्रणव मुखर्जी पंतप्रधान असते तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे चित्र काहीसे वेगळे राहिले असते,असे आजही अनेकांचे मत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी ‘दी अदर साइड आॅफ दी माऊंटेन’ या आपल्या नव्या पुस्तकात हे विचार मांडले आहेत.जून १९९१ ते १९९६ या काळात नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री असताना मनमोहनसिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा बदलली होती. संपूर्ण राष्ट्राने यासाठी त्यांची प्रशंसा केली होती. मात्र १९९९ मध्ये मनमोहनसिंग देशातील काँग्रेसची सर्वात सुरक्षित जागा मानल्या गेलेल्या दक्षिण दिल्लीतून निवडणुकीच्या आखड्यात उतरले आणि अनेकांना कदाचित स्मरणातही नसेल अशा एका उमेदवाराने त्यांचा पराभव केला. मनमोहनसिंग यांचा पराभव करणारे हे उमेदवार होते भाजपाचे विजय कुमार मल्होत्रा. सुरुवातीचा सौम्य विरोध सोडला तर संपुआ-१ चे नेतृत्व करण्यासाठी सोनिया गांधी यांनी मनमोहनसिंग यांची निवड केली तेव्हा या निर्णयाचे मोठे स्वागत झाले. केवळ स्वागतच नाही तर पाच वर्षांनंतर जनतेने पुन्हा एकदा संपुआला कौल देऊन हा निर्णय योग्य ठरवला, असे खुर्शीद यांनी लिहिले आहे. माझे पुस्तक कुण्या एका व्यक्तीचे नाही तर संपुआचा भाग असलेल्या अनेकांचे संक्षिप्त चरित्र आहे,असेही खुर्शीद यांनी आपल्या पुस्तकात आवर्जून नमुद केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘पक्षात नैराश्य पसरले होते’२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील निकालानंतरच्या घडामोडींचा उल्लेखही त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. १६ मे रोजी लोकसभेचा निकाल आला. आम्ही (संपुआचे मंत्री) विविध मतदारसंघातून नवी दिल्लीला परतलो. पराभव झाला होता पण पराभव मान्य न करणाऱ्या योद्ध्यांसारखी आमची स्थिती होती. आता आम्ही भूतकाळ होतो. काँग्रेसमध्ये नैराश्य पसरले होते, असे त्यांनी लिहिले आहे. हाच धागा पकडून काँग्रेसचे अस्तित्व संकटात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघेही लोकप्रिय नेते आहेत आणि लोकांमधून निवडून आलेले नेते आहे. मात्र पर्यायी नेतृत्वाचा विचार केल्यास दूरदूरपर्यंत काँग्रेसमध्ये कुणीच दिसत नाही, असेही त्यांनी लिहिले आहे.