शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

'मसूदला शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राईकची गरज नव्हती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 02:39 IST

दिग्विजय सिंह यांचा प्रज्ञासिंह यांच्यावर निशाणा; पठाणकोट, पुलवामा हल्ले का रोखले नाही?

भोपाळ : पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरलाही शाप दिला असता, तर भारतीय लष्कराला सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरजच पडली नसती, असा टोला लगावत काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर निशाणा साधला.

भोपाळ येथील अशोका गार्डन्स येथे प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले की, भारतासाठी प्राणाची आहुती देणारे एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरे यांचा सर्वनाश होईल, असा मी शाप दिला होता, असे प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले होते. मसूद अजहरलाही त्यांनी शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरजच पडली नसती.

आम्ही पाताळातही शोधून दहशतवाद्यांना मारू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात; परंतु पुलवामा, पठाणकोट आणि उरी येथे दहशतवादी हल्ले झाले तेव्हा ते कुठे होते? हे दहशतवादी हल्ले का रोखता आले नाहीत? असा सवाल करीत त्यांनी पंतप्रधानांवरही टीका केली.

काँग्रेसने भोपाळमधून माझी उमेदवारी घोषित केल्यानंतर ‘मामा’ जाम घाबरले आहेत. प्रकृती ठीक नाही, असे सांगून गौर यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या आदल्या दिवशी भाजपने प्रज्ञासिंह ठाकूर यांची उमेदवारी घोषित केली. 

धर्माच्या नावे सौदा करणाऱ्यांपासून सावध राहाहिंदू-मुस्लिम-शीख-ख्रिश्चन भाऊ-भाऊ आहेत. हे लोक असे म्हणतात की, हिंदू धोक्यात असल्याने हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. ५०० वर्षे मुस्लिमांची देशात सत्ता होती तेव्हा कोणत्याही धर्माचे नुकसान झाले नाही. धर्माच्या नावे सौदा करणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. आमच्या धर्मात ‘हर हर महादेव’ असा जयघोष करतो; परंतु भाजप ‘ हर हर मोदी’ नारा देत आहेत, त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhopal-pcभोपाळMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019