शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

'मसूदला शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राईकची गरज नव्हती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 02:39 IST

दिग्विजय सिंह यांचा प्रज्ञासिंह यांच्यावर निशाणा; पठाणकोट, पुलवामा हल्ले का रोखले नाही?

भोपाळ : पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरलाही शाप दिला असता, तर भारतीय लष्कराला सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरजच पडली नसती, असा टोला लगावत काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर निशाणा साधला.

भोपाळ येथील अशोका गार्डन्स येथे प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले की, भारतासाठी प्राणाची आहुती देणारे एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरे यांचा सर्वनाश होईल, असा मी शाप दिला होता, असे प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले होते. मसूद अजहरलाही त्यांनी शाप दिला असता तर सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरजच पडली नसती.

आम्ही पाताळातही शोधून दहशतवाद्यांना मारू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात; परंतु पुलवामा, पठाणकोट आणि उरी येथे दहशतवादी हल्ले झाले तेव्हा ते कुठे होते? हे दहशतवादी हल्ले का रोखता आले नाहीत? असा सवाल करीत त्यांनी पंतप्रधानांवरही टीका केली.

काँग्रेसने भोपाळमधून माझी उमेदवारी घोषित केल्यानंतर ‘मामा’ जाम घाबरले आहेत. प्रकृती ठीक नाही, असे सांगून गौर यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या आदल्या दिवशी भाजपने प्रज्ञासिंह ठाकूर यांची उमेदवारी घोषित केली. 

धर्माच्या नावे सौदा करणाऱ्यांपासून सावध राहाहिंदू-मुस्लिम-शीख-ख्रिश्चन भाऊ-भाऊ आहेत. हे लोक असे म्हणतात की, हिंदू धोक्यात असल्याने हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. ५०० वर्षे मुस्लिमांची देशात सत्ता होती तेव्हा कोणत्याही धर्माचे नुकसान झाले नाही. धर्माच्या नावे सौदा करणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. आमच्या धर्मात ‘हर हर महादेव’ असा जयघोष करतो; परंतु भाजप ‘ हर हर मोदी’ नारा देत आहेत, त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhopal-pcभोपाळMadhya Pradesh Lok Sabha Election 2019मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक 2019