शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

मराठीने ‘करिअर’ झाले तर ती नक्की जगेल...

By admin | Updated: April 6, 2015 04:25 IST

नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी मराठी ज्ञानभाषा बनावी. मराठीमध्ये शिकूनही ‘करिअर’ होऊ शकते, ही भावना नव्या पिढीमध्ये निर्माण झाली तर मराठीवर कोणतेही

अविनाश थोरात, संत नामदेव नगरी (घुमान) -नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी मराठी ज्ञानभाषा बनावी. मराठीमध्ये शिकूनही ‘करिअर’ होऊ शकते, ही भावना नव्या पिढीमध्ये निर्माण झाली तर मराठीवर कोणतेही आक्रमण होणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. घुमान येथे आयोजित ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल जे. जे. सिंग, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते काश्मिरी साहित्यिक रेहमान राही, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन, प्रकाश पायगुडे, स्वागताध्यक्ष भारत देसडला व ‘सरहद’चे संजय नहार उपस्थित होते. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे अध्यक्षस्थानी होते.‘वाहे गुरू की खालसा, वाहे गुरू की फतेह’ असे म्हणत फडणवीस यांनी भाषणाला सुरुवात केली. मराठी भाषेसमोरील आव्हानांचा त्यांनी ऊहापोह केला. ते म्हणाले, मराठी ही जगात पहिल्या १५ भाषांपैकी एक आहे. तरीही तिच्यावरील आक्रमणाची चर्चा होते. पहिलीपासून मराठी शिकविण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली जाते. मात्र, मराठीतून शिकण्यासाठी पुस्तके उपलब्ध झाली पाहिजेत. त्यासाठी मराठीच्या उपासकांनी प्रयत्न करायला हवेत. संवेदना फक्त साहित्यच जिवंत ठेवू शकते. शेतकऱ्यांमध्ये संकटाचा सामना करण्याची शक्ती साहित्यातून निर्माण व्हायला हवी.देशाच्या विविधततेला जोडण्यासाठी अशा संमेलनांची गरज असल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले. मोरे यांनी, मराठी लोकांनी महाराष्ट्राबाहेर जाऊन केलेल्या कामगिरीचा इतिहास लिहिण्याचे काम सुरू करण्याची गरज प्रतिपादित  केली. पंढरपूर येथे संत तुकारामपीठ स्थापन करावे तसेच मध्य प्रदेशातील ‘कालिदास’ पुरस्काराच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही संत नामदेव यांच्या नावाने महाराष्ट्राबाहेरील साहित्यिकासाठी पुरस्कार सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली. पुस्तकांचे गावविनोद तावडे यांनी महाराष्ट्रामध्ये पुस्तकांचे एक गाव निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली. या गावात चार ते पाच लाख पुस्तके असतील, तसेच साहित्यिक व रसिकांचा संवाद घडेल अशी कल्पना असल्याचे ते म्हणाले. साहित्यिकांना निधीसाठी मंत्रालयाच्या दारात येण्याची गरज भासणार नाही. विजयादशमीच्या दिवशीच साहित्य व नाट्य संमेलनासाठीचा निधी दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. पुस्तकांची दुकाने कमी होत असल्याने प्रत्येक नगर परिषदेने पुस्तकांसाठी स्वस्त दरात गाळा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.महामंडळाचा हावरटपणा!साहित्य संमेलनाची तयारी सुरू असल्यापासून पंजाब सरकारच्या औदार्याच्या अनेक कहाण्या महामंडळ आणि आयोजकांकडून सातत्याने सांगितल्या जात आहेत. महामंडळाने यात जणू हावरटपणा दाखवत थेट पंजाब सरकारकडे पंढरपूरमधील संत नामदेवांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी निधीची मागणी करण्याचा ठराव केला. नामदेव समाजोन्नती परिषदेने सोडलेल्या या राष्ट्रीय स्मारकाच्या संकल्पासाठी ४० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. महाराष्ट्र सरकारने १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उर्वरित खर्चाच्या निधी संकलनासाठी केंद्र सरकार आणि पंजाब सरकार यांनी अर्थसाहाय्य करावे, अशी याचना या ठरावात करण्यात आली आहे.