शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
2
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
4
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
5
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
6
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
7
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
8
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
9
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
10
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
11
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
12
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
13
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
15
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
16
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
17
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
18
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
19
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
20
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान

मराठीने ‘करिअर’ झाले तर ती नक्की जगेल...

By admin | Updated: April 6, 2015 04:25 IST

नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी मराठी ज्ञानभाषा बनावी. मराठीमध्ये शिकूनही ‘करिअर’ होऊ शकते, ही भावना नव्या पिढीमध्ये निर्माण झाली तर मराठीवर कोणतेही

अविनाश थोरात, संत नामदेव नगरी (घुमान) -नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी मराठी ज्ञानभाषा बनावी. मराठीमध्ये शिकूनही ‘करिअर’ होऊ शकते, ही भावना नव्या पिढीमध्ये निर्माण झाली तर मराठीवर कोणतेही आक्रमण होणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. घुमान येथे आयोजित ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल जे. जे. सिंग, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते काश्मिरी साहित्यिक रेहमान राही, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन, प्रकाश पायगुडे, स्वागताध्यक्ष भारत देसडला व ‘सरहद’चे संजय नहार उपस्थित होते. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे अध्यक्षस्थानी होते.‘वाहे गुरू की खालसा, वाहे गुरू की फतेह’ असे म्हणत फडणवीस यांनी भाषणाला सुरुवात केली. मराठी भाषेसमोरील आव्हानांचा त्यांनी ऊहापोह केला. ते म्हणाले, मराठी ही जगात पहिल्या १५ भाषांपैकी एक आहे. तरीही तिच्यावरील आक्रमणाची चर्चा होते. पहिलीपासून मराठी शिकविण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली जाते. मात्र, मराठीतून शिकण्यासाठी पुस्तके उपलब्ध झाली पाहिजेत. त्यासाठी मराठीच्या उपासकांनी प्रयत्न करायला हवेत. संवेदना फक्त साहित्यच जिवंत ठेवू शकते. शेतकऱ्यांमध्ये संकटाचा सामना करण्याची शक्ती साहित्यातून निर्माण व्हायला हवी.देशाच्या विविधततेला जोडण्यासाठी अशा संमेलनांची गरज असल्याचे सुरेश प्रभू यांनी सांगितले. मोरे यांनी, मराठी लोकांनी महाराष्ट्राबाहेर जाऊन केलेल्या कामगिरीचा इतिहास लिहिण्याचे काम सुरू करण्याची गरज प्रतिपादित  केली. पंढरपूर येथे संत तुकारामपीठ स्थापन करावे तसेच मध्य प्रदेशातील ‘कालिदास’ पुरस्काराच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही संत नामदेव यांच्या नावाने महाराष्ट्राबाहेरील साहित्यिकासाठी पुरस्कार सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली. पुस्तकांचे गावविनोद तावडे यांनी महाराष्ट्रामध्ये पुस्तकांचे एक गाव निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली. या गावात चार ते पाच लाख पुस्तके असतील, तसेच साहित्यिक व रसिकांचा संवाद घडेल अशी कल्पना असल्याचे ते म्हणाले. साहित्यिकांना निधीसाठी मंत्रालयाच्या दारात येण्याची गरज भासणार नाही. विजयादशमीच्या दिवशीच साहित्य व नाट्य संमेलनासाठीचा निधी दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. पुस्तकांची दुकाने कमी होत असल्याने प्रत्येक नगर परिषदेने पुस्तकांसाठी स्वस्त दरात गाळा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.महामंडळाचा हावरटपणा!साहित्य संमेलनाची तयारी सुरू असल्यापासून पंजाब सरकारच्या औदार्याच्या अनेक कहाण्या महामंडळ आणि आयोजकांकडून सातत्याने सांगितल्या जात आहेत. महामंडळाने यात जणू हावरटपणा दाखवत थेट पंजाब सरकारकडे पंढरपूरमधील संत नामदेवांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी निधीची मागणी करण्याचा ठराव केला. नामदेव समाजोन्नती परिषदेने सोडलेल्या या राष्ट्रीय स्मारकाच्या संकल्पासाठी ४० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. महाराष्ट्र सरकारने १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उर्वरित खर्चाच्या निधी संकलनासाठी केंद्र सरकार आणि पंजाब सरकार यांनी अर्थसाहाय्य करावे, अशी याचना या ठरावात करण्यात आली आहे.