जर पश्चिम बंगालमध्ये आज लोकसभा निवडणुका झाल्या, तर सत्तेचे समीकरण कसे असेल, यासंदर्भात एका नव्या सर्व्हेमधून धक्कादायक आकडे समोर आले आहेत. आज लोकसभा निवडणुका झाल्या तर पश्चिम बंगालच्या सत्ता समिकरणात फारसा बदलत होताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे, राज्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची (TMC) पकड अजूनही मजबूत असल्यचाे दिसते.
भाजपला किती जागांचा फायदा होण्याचा? तृणमूलला किती जागा मिळणा? - -'इंडिया टुडे-सीव्होटर'च्या ताज्या 'मूड ऑफ द नेशन' (MOTN) २०२६ च्या सर्व्हेनुसार, "TMC च्या जागांमध्ये किरकोळ घट होऊन त्या २८ वर येण्याची शक्यता आहे. तर भाजपला दोन जागांचा फायदा होऊन त्यांच्या जागा १४ पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. दरम्यान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूलने २९ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला १२ जागांवरच समाधान मानावे लागले होते. महत्वाचे म्हणजे, ऑगस्ट २०२६ च्या सर्वेक्षणात भाजपला ११ तर TMC ला ३१ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या दोन महिने आधीच हा सर्व्हे आला आहे.
NDA च्या वोट शेअरमध्ये ३ टक्क्यांची वाढ - -मतांच्या टक्केवारीचा विचार करता, भाजपच्या नेतृत्वाखालील NDA च्या वोट शेअरमध्ये ३ टक्क्यांची वाढ होऊन तो ३९ वरून ४२ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र असे असले तरी, तृणमूल काँग्रेसची राज्यातील पकड अद्यापही मजबूत आहे. महत्वाचे म्हणजे, या सर्वेक्षणाने NDA ला राष्ट्रीय पातळीवर ३५० हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे.