शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

...तर १९६२च्या युद्धात मानहानी पत्करावी लागली नसती, अरुणाचलचे राज्यपाल मिश्रा यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 08:04 IST

अरुणाचलातील छांगलांग जिल्ह्यात आयोजित केलेल्या सैनिक संमेलनात लष्कराच्या राजपूत रेजिमेंटला संबोधित करताना राज्यपाल मिश्रा यांनी लष्कराच्या सद्यस्थितीवर भाष्य केले.

इटानगर : चिनी सैन्याने अरुणाचलनजीक सीमारेषेवर संपूर्ण गाव वसवले असल्याने भारत आणि चीन संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना लष्कराने कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहावे, असे आवाहन अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर (निवृत्त) बी. डी. मिश्रा यांनी केले आहे. तसेच देशाचे नेतृत्व सक्षम असते तर १९६२च्या चीनविरुद्धच्या युद्धात भारताला मानहानी पत्करावी लागली नसती, असेही मिश्रा म्हणाले.  अरुणाचलातील छांगलांग जिल्ह्यात आयोजित केलेल्या सैनिक संमेलनात लष्कराच्या राजपूत रेजिमेंटला संबोधित करताना राज्यपाल मिश्रा यांनी लष्कराच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, १९६२ मध्ये देशाचेते तत्कालीन नेतृत्व सक्षम असते तर चीनविरुद्धच्या युद्धात भारताला मानहानी पत्करावी लागली नसती. आता मात्र चित्र पालटले आहे. भारतही शस्त्रसज्ज असून आव्हानाचा मुकाबला करू शकतो. मात्र, असे असले तरी आपण गाफील राहून चालणार नाही. सीमेवरील कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी प्रत्येक सैनिकाने तत्पर राहणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळताना त्यांच्या नेतृत्वाखाली लष्करात अनेक बदल झाले असल्याचे मिश्रा यांनी नमूद केले.  

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशIndiaभारतchinaचीन