शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

भारत-पाकिस्तान अणुयुद्ध झाले तर...; जगाने व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 16:28 IST

भारताला इम्रान खान यांनी अनेकदा अणु युद्ध होण्याची धमकी दिली आहे.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान फाळणीपासूनच तणावाचे संबंध आहेत. तर दोन्ही देशांदरम्यान चार वेळा युद्ध झाले आहे. सर्व युद्धांत पाकिस्तानचा पराभव झाला असला तरीही युद्धाची खुमखुमी काही कमी झालेली नाही. काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढत 370 कलम हटविल्याने भारतालाअणुयुद्धाची धमकी देण्यात येत आहे. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तर युनोमध्ये याचा उच्चार केला होता. यावर अमेरिकेच्या तज्ज्ञांनी या युद्धाचे परिणाम काय होतील याचा अहवाल दिला आहे. 

भारताला इम्रान खान यांनी अनेकदा अणु युद्ध होण्याची धमकी दिली आहे. भारत अण्वस्त्र सज्ज असला तरीही पाकिस्तानकडून हल्ला झाल्यासच अण्वस्त्रे वापरण्याची भुमिका वेळोवेळी घेत आला आहे. पाकिस्तानकडेही अण्वस्त्रे आहेत, परंतू भारताकडील अण्वस्त्रांची संख्या पाहता ती खूपच कमी आहेत. सैन्य दलाच्या बाबतीतही पाकिस्तान खूप मागे आहे. या पार्श्वभुमीवर भारत-पाकिस्तानदरम्यान चर्चा बंद झालेली आहे. 

पाकिस्तानच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेच्या तज्ज्ञांनी धक्कादायक बाब समोर आणली आहे. जर दोन्ही देशांमध्ये अणुयुद्ध झाले तर तब्बल 12.5 कोटी लोक मारले जातील. याचबरोबर जगालाही याचे चटके सोसावे लागतील. जगभरात उपासमारीची वेळ येईल. अमेरिकेच्या रटगर्स विद्यापीठाचे अभ्यासकर्ते एलन रोबक यांनी सांगितले की, जर आण्विक युद्ध झाले तर ते कोणत्या खास जागेवर होणार नाही, अणू बॉम्ब कुठेही पडू शकतात. या देशांदरम्यान 2025 मध्ये युद्ध होण्याची शक्यता या अहवालात वर्तविण्यात आली आहे. 'सायन्स अॅडव्हान्सेस'मध्ये हा अहवाल प्रकाशित झाला आहे. 

अणुहल्ल्य़ांमुळे 16 ते 36 हजार कोटी किलो कार्बन मिश्रित धुरळा उठणार आहे. हा धुरळा वायुमंडळाच्या वरच्या स्तरामध्ये पसरणार आहे. दोन्ही देशांकडे जवळपास 400 ते 500 अण्वस्त्रे असतील. या धुरळ्यामुळे सूर्याची किरणे पृथ्वीवर येणार नाहीत. यामुळे तापमान 2 ते 5 अंशावर जाईल आणि पाऊसही 20 टक्क्यांनी कमी होईल. याचा अत्यंत वाईट परिणाम होईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.  

टॅग्स :nuclear warअणुयुद्धPakistanपाकिस्तानIndiaभारतAmericaअमेरिकाArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर