शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

भारत-पाकिस्तान अणुयुद्ध झाले तर...; जगाने व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 16:28 IST

भारताला इम्रान खान यांनी अनेकदा अणु युद्ध होण्याची धमकी दिली आहे.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान फाळणीपासूनच तणावाचे संबंध आहेत. तर दोन्ही देशांदरम्यान चार वेळा युद्ध झाले आहे. सर्व युद्धांत पाकिस्तानचा पराभव झाला असला तरीही युद्धाची खुमखुमी काही कमी झालेली नाही. काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढत 370 कलम हटविल्याने भारतालाअणुयुद्धाची धमकी देण्यात येत आहे. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तर युनोमध्ये याचा उच्चार केला होता. यावर अमेरिकेच्या तज्ज्ञांनी या युद्धाचे परिणाम काय होतील याचा अहवाल दिला आहे. 

भारताला इम्रान खान यांनी अनेकदा अणु युद्ध होण्याची धमकी दिली आहे. भारत अण्वस्त्र सज्ज असला तरीही पाकिस्तानकडून हल्ला झाल्यासच अण्वस्त्रे वापरण्याची भुमिका वेळोवेळी घेत आला आहे. पाकिस्तानकडेही अण्वस्त्रे आहेत, परंतू भारताकडील अण्वस्त्रांची संख्या पाहता ती खूपच कमी आहेत. सैन्य दलाच्या बाबतीतही पाकिस्तान खूप मागे आहे. या पार्श्वभुमीवर भारत-पाकिस्तानदरम्यान चर्चा बंद झालेली आहे. 

पाकिस्तानच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेच्या तज्ज्ञांनी धक्कादायक बाब समोर आणली आहे. जर दोन्ही देशांमध्ये अणुयुद्ध झाले तर तब्बल 12.5 कोटी लोक मारले जातील. याचबरोबर जगालाही याचे चटके सोसावे लागतील. जगभरात उपासमारीची वेळ येईल. अमेरिकेच्या रटगर्स विद्यापीठाचे अभ्यासकर्ते एलन रोबक यांनी सांगितले की, जर आण्विक युद्ध झाले तर ते कोणत्या खास जागेवर होणार नाही, अणू बॉम्ब कुठेही पडू शकतात. या देशांदरम्यान 2025 मध्ये युद्ध होण्याची शक्यता या अहवालात वर्तविण्यात आली आहे. 'सायन्स अॅडव्हान्सेस'मध्ये हा अहवाल प्रकाशित झाला आहे. 

अणुहल्ल्य़ांमुळे 16 ते 36 हजार कोटी किलो कार्बन मिश्रित धुरळा उठणार आहे. हा धुरळा वायुमंडळाच्या वरच्या स्तरामध्ये पसरणार आहे. दोन्ही देशांकडे जवळपास 400 ते 500 अण्वस्त्रे असतील. या धुरळ्यामुळे सूर्याची किरणे पृथ्वीवर येणार नाहीत. यामुळे तापमान 2 ते 5 अंशावर जाईल आणि पाऊसही 20 टक्क्यांनी कमी होईल. याचा अत्यंत वाईट परिणाम होईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.  

टॅग्स :nuclear warअणुयुद्धPakistanपाकिस्तानIndiaभारतAmericaअमेरिकाArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर