शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तान अणुयुद्ध झाले तर...; जगाने व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 16:28 IST

भारताला इम्रान खान यांनी अनेकदा अणु युद्ध होण्याची धमकी दिली आहे.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान फाळणीपासूनच तणावाचे संबंध आहेत. तर दोन्ही देशांदरम्यान चार वेळा युद्ध झाले आहे. सर्व युद्धांत पाकिस्तानचा पराभव झाला असला तरीही युद्धाची खुमखुमी काही कमी झालेली नाही. काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढत 370 कलम हटविल्याने भारतालाअणुयुद्धाची धमकी देण्यात येत आहे. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तर युनोमध्ये याचा उच्चार केला होता. यावर अमेरिकेच्या तज्ज्ञांनी या युद्धाचे परिणाम काय होतील याचा अहवाल दिला आहे. 

भारताला इम्रान खान यांनी अनेकदा अणु युद्ध होण्याची धमकी दिली आहे. भारत अण्वस्त्र सज्ज असला तरीही पाकिस्तानकडून हल्ला झाल्यासच अण्वस्त्रे वापरण्याची भुमिका वेळोवेळी घेत आला आहे. पाकिस्तानकडेही अण्वस्त्रे आहेत, परंतू भारताकडील अण्वस्त्रांची संख्या पाहता ती खूपच कमी आहेत. सैन्य दलाच्या बाबतीतही पाकिस्तान खूप मागे आहे. या पार्श्वभुमीवर भारत-पाकिस्तानदरम्यान चर्चा बंद झालेली आहे. 

पाकिस्तानच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेच्या तज्ज्ञांनी धक्कादायक बाब समोर आणली आहे. जर दोन्ही देशांमध्ये अणुयुद्ध झाले तर तब्बल 12.5 कोटी लोक मारले जातील. याचबरोबर जगालाही याचे चटके सोसावे लागतील. जगभरात उपासमारीची वेळ येईल. अमेरिकेच्या रटगर्स विद्यापीठाचे अभ्यासकर्ते एलन रोबक यांनी सांगितले की, जर आण्विक युद्ध झाले तर ते कोणत्या खास जागेवर होणार नाही, अणू बॉम्ब कुठेही पडू शकतात. या देशांदरम्यान 2025 मध्ये युद्ध होण्याची शक्यता या अहवालात वर्तविण्यात आली आहे. 'सायन्स अॅडव्हान्सेस'मध्ये हा अहवाल प्रकाशित झाला आहे. 

अणुहल्ल्य़ांमुळे 16 ते 36 हजार कोटी किलो कार्बन मिश्रित धुरळा उठणार आहे. हा धुरळा वायुमंडळाच्या वरच्या स्तरामध्ये पसरणार आहे. दोन्ही देशांकडे जवळपास 400 ते 500 अण्वस्त्रे असतील. या धुरळ्यामुळे सूर्याची किरणे पृथ्वीवर येणार नाहीत. यामुळे तापमान 2 ते 5 अंशावर जाईल आणि पाऊसही 20 टक्क्यांनी कमी होईल. याचा अत्यंत वाईट परिणाम होईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.  

टॅग्स :nuclear warअणुयुद्धPakistanपाकिस्तानIndiaभारतAmericaअमेरिकाArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर