शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

‘जर INDIA आघाडीने आपलं नाव बदलून भारत केलं तर मोदी देशाचं नाव…’ केजरीवालांनी डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 15:39 IST

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विचारले असता जर इंडिया आघाडीने आपलं नाव बदलून भारत केलं तर सरकार देशाचं नाव बदलून बीजेपी करणार काय, असा खोचक सवाल विचारला. 

जी-२० देशांची बैठक आणि मोदी सरकारने बोलवलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशाचं इंडिया हे इंग्रजी नाव बदलून भारत करण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. जी-२० साठी ज्या नेत्यांना राष्ट्रपतींचं पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यामध्ये प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरून मोदी सरकार देशाचं इंडिया हे नाव बदलून भारत करण्याची शक्यता आहे. याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विचारले असता जर इंडिया आघाडीने आपलं नाव बदलून भारत केलं तर सरकार देशाचं नाव बदलून बीजेपी करणार काय, असा खोचक सवाल विचारला. 

अरविंद केजरीवाल म्हणाले की, मला याबाबत कुठलीही अधिकृत माहिती नाही आहे. मी याबाबत केवळी बातम्या ऐकल्या आहेत. आमच्या आघाडीचं नाव इंडिया आघाडी आहे त्यामुळे असं केलं जात आहे. जर आघाडीचं नाव इंडिया आहे तर दे देशाचं नाव कसं बदलणार? जर आम्ही भारत आघाडी असं नाव दिलं तर हे भारताचं नाव बदलून इंडिया करणार आहेत का? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आमचा देश एवढा जुना आहे आणि हे याचं नाव एवढ्यासाठी बदलण्याचा विचार करत आहेत की इंडिया आघाडी या नावामुळे यांना मिळणारी मतं कमी होतील. यामुळेच हे चिडलेले आहेत. तसेच केवळ मुद्दे भरकटवत आहेत. 

इंग्रजीमध्येही देशाचं नाव बदलून भारत करण्याची चर्चा गेल्या काही दिवसामध्ये घडलेल्या घटनांमुळे सुरू झाली आहे. मंगळवारी सकाळी भारताने प्रेसिडेंसी जी-२० ने जी-२० भारत लॉन्च केले आहे. ते जी-२०चं अतिरिक्त एक्स (ट्विटर) अकाउंट असेल. त्यावरून जी-२० शी संबंधित माहिती भारताच्या अधिकृत नावाने प्रसिद्ध केली जाईल.

अन्य एका माहितीनुसार राष्ट्रपती भवनाने ९ सप्टेंबर रोजी जी२० डिनरसाठी जे निमंत्रण पत्र पाठवले आहे. ते सुद्धा भारताचे राष्ट्रपती या नावाने पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत यासाठी सामान्य व्यवहारामध्ये  President of India या नावाचाच वापर केला जात असे. 

टॅग्स :IndiaभारतArvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी