शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

‘जर INDIA आघाडीने आपलं नाव बदलून भारत केलं तर मोदी देशाचं नाव…’ केजरीवालांनी डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 15:39 IST

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विचारले असता जर इंडिया आघाडीने आपलं नाव बदलून भारत केलं तर सरकार देशाचं नाव बदलून बीजेपी करणार काय, असा खोचक सवाल विचारला. 

जी-२० देशांची बैठक आणि मोदी सरकारने बोलवलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशाचं इंडिया हे इंग्रजी नाव बदलून भारत करण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. जी-२० साठी ज्या नेत्यांना राष्ट्रपतींचं पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यामध्ये प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरून मोदी सरकार देशाचं इंडिया हे नाव बदलून भारत करण्याची शक्यता आहे. याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विचारले असता जर इंडिया आघाडीने आपलं नाव बदलून भारत केलं तर सरकार देशाचं नाव बदलून बीजेपी करणार काय, असा खोचक सवाल विचारला. 

अरविंद केजरीवाल म्हणाले की, मला याबाबत कुठलीही अधिकृत माहिती नाही आहे. मी याबाबत केवळी बातम्या ऐकल्या आहेत. आमच्या आघाडीचं नाव इंडिया आघाडी आहे त्यामुळे असं केलं जात आहे. जर आघाडीचं नाव इंडिया आहे तर दे देशाचं नाव कसं बदलणार? जर आम्ही भारत आघाडी असं नाव दिलं तर हे भारताचं नाव बदलून इंडिया करणार आहेत का? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आमचा देश एवढा जुना आहे आणि हे याचं नाव एवढ्यासाठी बदलण्याचा विचार करत आहेत की इंडिया आघाडी या नावामुळे यांना मिळणारी मतं कमी होतील. यामुळेच हे चिडलेले आहेत. तसेच केवळ मुद्दे भरकटवत आहेत. 

इंग्रजीमध्येही देशाचं नाव बदलून भारत करण्याची चर्चा गेल्या काही दिवसामध्ये घडलेल्या घटनांमुळे सुरू झाली आहे. मंगळवारी सकाळी भारताने प्रेसिडेंसी जी-२० ने जी-२० भारत लॉन्च केले आहे. ते जी-२०चं अतिरिक्त एक्स (ट्विटर) अकाउंट असेल. त्यावरून जी-२० शी संबंधित माहिती भारताच्या अधिकृत नावाने प्रसिद्ध केली जाईल.

अन्य एका माहितीनुसार राष्ट्रपती भवनाने ९ सप्टेंबर रोजी जी२० डिनरसाठी जे निमंत्रण पत्र पाठवले आहे. ते सुद्धा भारताचे राष्ट्रपती या नावाने पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत यासाठी सामान्य व्यवहारामध्ये  President of India या नावाचाच वापर केला जात असे. 

टॅग्स :IndiaभारतArvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी