शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मला पक्षातून काढलंत तर कोरोना काळातील भ्रष्टाचार बाहेर काढेन; भाजप आमदाराची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 08:47 IST

येडीयुराप्पा सरकारने ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. ४५ रुपयांचा मास्क ४८५ रुपयांना... आमदाराचे आरोप

कोरोना काळातील घोटाळ्यांवरून इकडे महाराष्ट्रात राजकारण सुरु असताना तिकडे कर्नाटकात देखील भाजपा आमदाराने तत्कालीन स्वपक्षीय नेत्यांविरोधात शड्डू ठोकले आहेत. मला पक्षातून काढून टाकले तर कोरोना काळात अव्वाच्या सव्वा दर लावून पैसे लुटणाऱ्या आणि मालमत्ता बनविणाऱ्या लोकांची भांडाफोड करण्याचा इशारा बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी दिला आहे. 

कोरोना काळात येडीयुराप्पा सरकारने ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप यत्नाळ यांनी केला आहे. या लोकांनी प्रत्येक कोरोना रुग्णाचे ८ ते ९ लाखांचे बिल बनविले होते. ४५ रुपयांच्या मास्कची किंमत ४८५ रुपये ठेवण्यात आली होती, असा आरोप आमदारांनी केला आहे. 

तेव्हा आमचे सरकार होते. मला यामुळे काहीही फरक पडत नाही की सत्तेत कोणाचे सरकार होते. चोर तो चोरच असतो. बंगळुरुमध्ये १० हजार बेडची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी भाड्याने १० हजार बेड आणण्यात आले होते. जेव्हा मला कोरोना झाला तेव्हा मणिपाल हॉस्पिटलने पाच लाख ऐशी हजार रुपये मागितले होते. गरीब माणूस एवढे पैसे कुठून आणू शकला असता, असा सवाल यत्नाळ यांनी उपस्थित केला आहे. 

मला नोटीस देऊन माझी पक्षातून हकालपट्टी करावी. मी सर्वांचा पर्दाफाश करीन. सगळेच चोर झाले तर राज्य आणि देश कोण वाचवणार? पंतप्रधान मोदींमुळे देश वाचला असल्याचे वक्तव्य यत्नाळ यांनी केले आहे. 

सिद्धरामय्या म्हणाले, आता कुठे लपलेत...

भाजप आमदाराने आपल्याच सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून कर्नाटकात राजकारण तापणार असून मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची प्रतिक्रियाही आली आहे. यत्नाळ यांच्या आरोपांमुळे आम्ही जे भ्रष्टाचाराचे आरोप करत होतो त्यांना पुष्टी मिळत आहे. भाजपा सरकार म्हणजे ४० टक्के कमिशन सरकार होते. यत्नाळ यांच्या आरोपांवर विचार केला तर हा भ्रष्टाचार आमच्या अंदाजापेक्षा १० पटींनी अधिक आहे. आम्ही आरोप केल्यानंतर भाजपाचे मंत्री जोरजोरात ओरडत सभागृहाच्या बाहेर आलेले ते आता कुठे लपले आहेत, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकCorruptionभ्रष्टाचारBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या