शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास ‘जीएसटी’च्या कररचनेत बदल करू - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 23:27 IST

नवी दिल्ली- 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं आणि पक्ष सत्तेत आल्यास जीएसटी कररचनेत बदल करू, असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. जीएसटी कररचनेत बदल व्हावा, जर तुमची अशीच इच्छा असल्यास काँग्रेस सत्तेत आल्यानंतर ती नक्कीच पूर्ण होईल, असंही राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे. ते सुरतमध्ये बोलत ...

नवी दिल्ली- 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं आणि पक्ष सत्तेत आल्यास जीएसटी कररचनेत बदल करू, असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. जीएसटी कररचनेत बदल व्हावा, जर तुमची अशीच इच्छा असल्यास काँग्रेस सत्तेत आल्यानंतर ती नक्कीच पूर्ण होईल, असंही राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे. ते सुरतमध्ये बोलत होते.गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांच्या रणसंग्राम सुरू आहे, त्यातील एका जाहीर सभेत त्यांनी हे विधान केलं आहे. राहुल गांधी व्यावसायिकांना उद्देशून म्हणाले, ‘काँग्रेस पक्ष देशात सत्तेत आल्यास एक असा जीएसटी घेऊन येऊ, ज्यात नक्कीच तुमचा फायदा असेल. तुमच्या इच्छेनुसारच त्यात फेरबदल करू. तुमच्या म्हणण्याचा निश्चितच आम्ही सन्मान करू.नोटाबंदीच्या निर्णयावरून यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. सर्वच पैसा हा काळा पैसा नाही, हे मोदींना अद्यापपर्यंत कळलं नाही. जो काळा पैसा नरेंद्र मोदी गरिबांच्या खिशात शोधतायत, तो काळा पैसा परदेशातल्या बँक खात्यांमध्ये सुरक्षितरीत्या जमा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही हवेतच विरलं आहे. वर्षभरात फक्त एक लाख नोक-याच तयार झाल्या आहेत. मोदींनी प्रत्येक वर्षी दोन कोटी नोक-या उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवरही पेट्रोलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट होऊनही भारतात पेट्रोल व डिझेल एवढं महाग का मिळतं, हेसुद्धा मला अद्यापपर्यंत समजलं नसल्याचं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस