शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

कंडक्टर ओरडला तर होणार 100 रुपयांचा दंड, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 12:24 IST

डीटीआयडीसने दिलेल्या आदेशानुसार, बस स्थानकावर हॉर्न वाजवल्यास 500 रुपये दंड वसूल केला जाईल. तर कंडक्टरने प्रवाशांना बोलावण्यासाठी जोरजोराने आवाज दिला तर 100 रुपये दंड भरावा लागेल. 

ठळक मुद्देडीटीआयडीसीने बसमध्ये हॉर्न वाजवणे आणि आवाज देऊन प्रवाशांना बोलवण्यावर दंड आकारला आहेबस स्थानकावर हॉर्न वाजवल्यास 500 रुपये दंड वसूल केला जाईलकंडक्टरने प्रवाशांना बोलावण्यासाठी जोरजोराने आवाज दिला तर 100 रुपये दंड भरावा लागेल. 

नवी दिल्ली - ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (डीटीआयडीसी) बसमध्ये हॉर्न वाजवणे आणि आवाज देऊन प्रवाशांना बोलवण्यावर दंड आकारला आहे. देशात पहिल्यांदाच ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी अशा प्रकारचं पाऊल उचलण्यात आलं आहे. डीटीआयडीसने दिलेल्या आदेशानुसार, बस स्थानकावर हॉर्न वाजवल्यास 500 रुपये दंड वसूल केला जाईल. तर कंडक्टरने प्रवाशांना बोलावण्यासाठी जोरजोराने आवाज दिला तर 100 रुपये दंड भरावा लागेल. 

बस स्थानकांची निगा राखणा-या डीटीआयडीसीच्या कार्यकारी संचालकांनी 9 ऑक्टोबर रोजी हा आदेश जारी केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. आदेशात सांगितल्यानुसार, बस स्थानकांवरील ध्वनी प्रदूषणाने धोकादायक पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. बस अड्ड्यांवर वारंवार जोरजोरात हॉर्न वाजवणे आणि रोडवेज कंडक्टरकडून प्रवाशांना बोलावण्यासाठी ओरडून आवाज देणे ही ध्वनी प्रदूषणाची मुख्य कारणे असल्याचं समोर आलं आहे. 

तपासादरम्यान डीटीआयडीसीचे मॅनेजिंग डायरेक्टर के के दहिया यांना बस अड्ड्यांवरील ध्वनी प्रदूषणाची पातळी प्रमाणापेक्षा अधिक असल्याचं आढळलं. आदेशात स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की, 'कंडक्टरने जोराने आवाज दिल्यास 100 रुपये आणि बस अड्ड्यांवर हॉर्न वाजवल्यास 500 रुपयांचा दंड वसूल केला जाईल'.

नियमाचं उल्लंघन झाल्यास बस स्थानकातून बाहेर पडत असताना हा दंड आकारला जाईल. बस अड्ड्यांना यासंबंधी रोज रिपोर्ट सादर करणं अनिवार्य असणार आहे. 

दिल्लीत हवा प्रदूषणासोबतच ध्वनी प्रदूषणाची समस्याही गंभीर बनली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाके विक्रीवर बंदी आणल्याने दिल्लीकरांना काहीसा दिलासा मिळाल आहे. यावेळी फटाक्यांची संख्या कमी असेल, त्यामुळे प्रदूषणही कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दिवाळीत फक्त हवा नाही तर ध्वनी प्रदूषणातही तितकीच वाढ होते. दिवाळीनंतर लगेचच या समस्या जाणवायला सुरुवात होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा वर्षांच्या आकडेवारीकडे पाहिलं, तर ध्वनी प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.  

टॅग्स :New Delhiनवी दिल्ली