शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कंडक्टर ओरडला तर होणार 100 रुपयांचा दंड, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 12:24 IST

डीटीआयडीसने दिलेल्या आदेशानुसार, बस स्थानकावर हॉर्न वाजवल्यास 500 रुपये दंड वसूल केला जाईल. तर कंडक्टरने प्रवाशांना बोलावण्यासाठी जोरजोराने आवाज दिला तर 100 रुपये दंड भरावा लागेल. 

ठळक मुद्देडीटीआयडीसीने बसमध्ये हॉर्न वाजवणे आणि आवाज देऊन प्रवाशांना बोलवण्यावर दंड आकारला आहेबस स्थानकावर हॉर्न वाजवल्यास 500 रुपये दंड वसूल केला जाईलकंडक्टरने प्रवाशांना बोलावण्यासाठी जोरजोराने आवाज दिला तर 100 रुपये दंड भरावा लागेल. 

नवी दिल्ली - ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (डीटीआयडीसी) बसमध्ये हॉर्न वाजवणे आणि आवाज देऊन प्रवाशांना बोलवण्यावर दंड आकारला आहे. देशात पहिल्यांदाच ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी अशा प्रकारचं पाऊल उचलण्यात आलं आहे. डीटीआयडीसने दिलेल्या आदेशानुसार, बस स्थानकावर हॉर्न वाजवल्यास 500 रुपये दंड वसूल केला जाईल. तर कंडक्टरने प्रवाशांना बोलावण्यासाठी जोरजोराने आवाज दिला तर 100 रुपये दंड भरावा लागेल. 

बस स्थानकांची निगा राखणा-या डीटीआयडीसीच्या कार्यकारी संचालकांनी 9 ऑक्टोबर रोजी हा आदेश जारी केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. आदेशात सांगितल्यानुसार, बस स्थानकांवरील ध्वनी प्रदूषणाने धोकादायक पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. बस अड्ड्यांवर वारंवार जोरजोरात हॉर्न वाजवणे आणि रोडवेज कंडक्टरकडून प्रवाशांना बोलावण्यासाठी ओरडून आवाज देणे ही ध्वनी प्रदूषणाची मुख्य कारणे असल्याचं समोर आलं आहे. 

तपासादरम्यान डीटीआयडीसीचे मॅनेजिंग डायरेक्टर के के दहिया यांना बस अड्ड्यांवरील ध्वनी प्रदूषणाची पातळी प्रमाणापेक्षा अधिक असल्याचं आढळलं. आदेशात स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की, 'कंडक्टरने जोराने आवाज दिल्यास 100 रुपये आणि बस अड्ड्यांवर हॉर्न वाजवल्यास 500 रुपयांचा दंड वसूल केला जाईल'.

नियमाचं उल्लंघन झाल्यास बस स्थानकातून बाहेर पडत असताना हा दंड आकारला जाईल. बस अड्ड्यांना यासंबंधी रोज रिपोर्ट सादर करणं अनिवार्य असणार आहे. 

दिल्लीत हवा प्रदूषणासोबतच ध्वनी प्रदूषणाची समस्याही गंभीर बनली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाके विक्रीवर बंदी आणल्याने दिल्लीकरांना काहीसा दिलासा मिळाल आहे. यावेळी फटाक्यांची संख्या कमी असेल, त्यामुळे प्रदूषणही कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दिवाळीत फक्त हवा नाही तर ध्वनी प्रदूषणातही तितकीच वाढ होते. दिवाळीनंतर लगेचच या समस्या जाणवायला सुरुवात होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा वर्षांच्या आकडेवारीकडे पाहिलं, तर ध्वनी प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.  

टॅग्स :New Delhiनवी दिल्ली