शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

उत्तरप्रदेशमधील जातीय तणाव कायम राहिल्यास भाजपचा विजय निश्चित - अमित शाह

By admin | Updated: September 7, 2014 11:48 IST

उत्तरप्रदेशमधील जातीय तणाव कायम राहिल्यास पुढील निवडणुकांमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचे वादग्रस्त विधान भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ७ - उत्तरप्रदेशमधील जातीय तणाव कायम राहिल्यास पुढील निवडणुकांमध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचे वादग्रस्त विधान भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केले आहे. उत्तरप्रदेश पोलिसांच्या एकतर्फी भूमिकेमुळे राज्यातील जातीय तणाव वाढत असल्याचा आरोपही शाह यांनी केला आहे. 
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या अमित शाह यांनी जातीय दंगलींविषयी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले. शाह म्हणाले, महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये आगामी काळात विधानसभा निवडणूक होत आहे. मात्र त्या राज्यांमध्ये कोणताही जातीय तणाव नसून मग फक्त उत्तर प्रदेशमध्येच जातीय तणाव का निर्माण होत आहे ? हा तणाव कायम राहिल्यास उत्तरप्रदेशमध्ये भाजपचीच सत्ता येणार हे निश्चित आहे. 
सोनिया गांधींनी भाजपची सत्ता येताच ६०० ठिकाणी जातीय दंगली झाल्याचा आरोप केला होता. शाह यांनी हा आरोपही फेटाळून लावला आहे. पोटनिवडणुकांमध्ये आम्हाला अपयश आले असले तरी चार राज्यांमधील विधानसभांमध्ये भाजपलाच यश मिळेल असा दावाही त्यांनी केला.