शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

Karnataka Elections results: भाजपाला स्वत:वर विश्वास असेल तर बॅलेट पेपरने निवडणुका घ्याव्यात; उद्धव ठाकरेंचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 14:40 IST

देशातलं वातावरण एक असंत आणि निकाल वेगळेच लागतात

मुंबई: देशात भाजपाविरोधी वातावरण असतानाही कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेले यश हे एकप्रकारचे गूढच म्हणायला हवे, अशी प्रतिक्रिया शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. ते मंगळवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सध्याच्या घडीला देशातलं वातावरण एक आहे, तशाचप्रकारचे अंदाजही व्यक्त केले जातात. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकांचे निकाल हे वेगळेच लागतात. विरोधी पक्ष यावरून मतदान यंत्रात (ईव्हीएम) काळबेरं असल्याचा आरोपही करतात. त्यामुळे भाजपाने या प्रकरणाचा एकदा काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा. भाजपाला स्वत:वर विश्वास असेल तर त्यांनी ईव्हीएम मशिनऐवजी मतपत्रिकांद्वारे निवडणुका घ्याव्यात, असे आव्हान उद्धव यांनी दिले. कर्नाटक निवडणुकीतील यशाबद्दल मी भाजपाचे अभिनंदन करतो. सध्याच्या घडीला मला यावर जास्त बोलायचे नाही. मात्र, सध्याची एकूणच परिस्थिती पाहता यापूर्वी सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये भाजपाला यश मिळताना दिसत आहे. त्यामुळे भाजपशासित राज्यांतील जनतेचा खरा कौल 2019 साली कळेल, असेही उद्धव यांनी म्हटले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने मेहनत केली. त्यानुसार त्यांना कमी-अधिक प्रमाणात यश मिळाले. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाबद्दल बोलायचे झाले तर प्रत्येक नेत्याला आयुष्यात आव्हानं व यशापयशाचा सामना करावा लागतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Uddhav Thackerayउद्धव ठाकरे