शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास पोरा! घरची परिस्थिती बेताची, वडिलांच्या कानमंत्राने दिली हिंमत, झाला IAS

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 17:07 IST

वडिलांच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. कुटुंब चालवण्याची जबाबदारी विशाल य़ांच्या आईच्या खांद्यावर आली.

बेटा, तू फक्त अभ्यासावर लक्ष दे, कारण शिक्षणामुळेच आपलं आयुष्य चांगलं होऊ शकतं. या गरिबीतून बाहेर पडण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही. हाच कानमंत्र विशालला त्याच्या वडिलांनी लहानपणापासून दिला होता. वडिलांनी दिलेल्या या मंत्राने आपण जीवनात यश मिळवू असा निर्धार विशालने केला होता. पण, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. वडिलांचं निधन झालं तेव्हा विशाल नववीत होता. पण त्याने हार मानली नाही. मेहनत करून विशाल कुमार IAS झाले आहेत. त्यांची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया...

वडिलांच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. कुटुंब चालवण्याची जबाबदारी विशाल य़ांच्या आईच्या खांद्यावर आली. त्यांच्या आईने घर चालवण्यासाठी आणि तीन मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी शेळीपालन करण्यास सुरुवात केली. तीन भावंडांमध्ये विशाल सर्वात मोठे होते. कुटुंब खूप अडचणीत होतं आणि अशा परिस्थितीत त्यांचे गुरू गौरी शंकर प्रसाद यांचा आधार मिळाला. गौरी शंकर यांनी विशालला कठीण परिस्थितीतही पुढे जाण्याची प्रेरणा तर दिलीच, शिवाय अभ्यासासाठी आर्थिक मदतही केली.

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये राहणाऱ्या विशाल कुमार यांच्या संघर्षाची कहाणी इथून सुरू झाली. एकीकडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि दुसरीकडे आयुष्यात काहीतरी करण्याचं स्वप्न. आईची मेहनत, वडिलांची शिकवण आणि गुरू गौरी शंकर प्रसाद यांच्या मदतीने विशाल पुढे गेले. त्यांच्या गुरूंनी त्याला शाळेची फी भरण्यास मदत केली. वडिलांच्या निधनानंतर तीन वर्षांनी २०११ मध्ये, १२ वीच्या वर्गात ते आपल्या जिल्ह्यात अव्वल आले. यानंतर इंजिनीअरिंग करायचे ठरवले. 

आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली आणि त्यासाठी पाटणा येथील अभयानंदच्या सुपर ३० कोचिंगमध्ये प्रवेश घेतला. विशाल यांना मेहनतीचे फळ मिळाले आणि आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश मिळाला. इंजिनिअरिंग केल्यानंतर रिलायन्समध्ये नोकरी लागली आणि त्यांचे आयुष्य पुन्हा रुळावर येऊ लागले. मात्र, विशाल यांना नोकरीमध्ये रस नव्हता आणि काही काळानंतर ते राजस्थानमधील कोटा येथील एका संस्थेत शिक्षक म्हणून रुजू झाले.

कोटामध्ये राहून विशाल यांनी ठरवलं की यूपीएसीची तयारी करायची. २०२० मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली. विशाल यांनी प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी मुख्य परीक्षा उत्तीर्ण करू शकले नाहीत. त्यानंतर नोकरी सोडून UPSC वर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. नोकरी सोडून तयारी सुरू केली. एक वर्षाच्या तयारीनंतर २०२१ मध्ये पुन्हा परीक्षा दिली. यावेळी निकाल वेगळा लागला, UPAC मध्ये ४८४ वा रँक मिळाला. विशाल त्यांच्या यशाचे श्रेय त्यांची आई आणि त्याचे गुरू गौरी शंकर प्रसाद यांना देतात. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी