शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

शाब्बास पोरा! घरची परिस्थिती बेताची, वडिलांच्या कानमंत्राने दिली हिंमत, झाला IAS

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 17:07 IST

वडिलांच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. कुटुंब चालवण्याची जबाबदारी विशाल य़ांच्या आईच्या खांद्यावर आली.

बेटा, तू फक्त अभ्यासावर लक्ष दे, कारण शिक्षणामुळेच आपलं आयुष्य चांगलं होऊ शकतं. या गरिबीतून बाहेर पडण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही. हाच कानमंत्र विशालला त्याच्या वडिलांनी लहानपणापासून दिला होता. वडिलांनी दिलेल्या या मंत्राने आपण जीवनात यश मिळवू असा निर्धार विशालने केला होता. पण, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. वडिलांचं निधन झालं तेव्हा विशाल नववीत होता. पण त्याने हार मानली नाही. मेहनत करून विशाल कुमार IAS झाले आहेत. त्यांची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया...

वडिलांच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. कुटुंब चालवण्याची जबाबदारी विशाल य़ांच्या आईच्या खांद्यावर आली. त्यांच्या आईने घर चालवण्यासाठी आणि तीन मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी शेळीपालन करण्यास सुरुवात केली. तीन भावंडांमध्ये विशाल सर्वात मोठे होते. कुटुंब खूप अडचणीत होतं आणि अशा परिस्थितीत त्यांचे गुरू गौरी शंकर प्रसाद यांचा आधार मिळाला. गौरी शंकर यांनी विशालला कठीण परिस्थितीतही पुढे जाण्याची प्रेरणा तर दिलीच, शिवाय अभ्यासासाठी आर्थिक मदतही केली.

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये राहणाऱ्या विशाल कुमार यांच्या संघर्षाची कहाणी इथून सुरू झाली. एकीकडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि दुसरीकडे आयुष्यात काहीतरी करण्याचं स्वप्न. आईची मेहनत, वडिलांची शिकवण आणि गुरू गौरी शंकर प्रसाद यांच्या मदतीने विशाल पुढे गेले. त्यांच्या गुरूंनी त्याला शाळेची फी भरण्यास मदत केली. वडिलांच्या निधनानंतर तीन वर्षांनी २०११ मध्ये, १२ वीच्या वर्गात ते आपल्या जिल्ह्यात अव्वल आले. यानंतर इंजिनीअरिंग करायचे ठरवले. 

आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली आणि त्यासाठी पाटणा येथील अभयानंदच्या सुपर ३० कोचिंगमध्ये प्रवेश घेतला. विशाल यांना मेहनतीचे फळ मिळाले आणि आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश मिळाला. इंजिनिअरिंग केल्यानंतर रिलायन्समध्ये नोकरी लागली आणि त्यांचे आयुष्य पुन्हा रुळावर येऊ लागले. मात्र, विशाल यांना नोकरीमध्ये रस नव्हता आणि काही काळानंतर ते राजस्थानमधील कोटा येथील एका संस्थेत शिक्षक म्हणून रुजू झाले.

कोटामध्ये राहून विशाल यांनी ठरवलं की यूपीएसीची तयारी करायची. २०२० मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली. विशाल यांनी प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी मुख्य परीक्षा उत्तीर्ण करू शकले नाहीत. त्यानंतर नोकरी सोडून UPSC वर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. नोकरी सोडून तयारी सुरू केली. एक वर्षाच्या तयारीनंतर २०२१ मध्ये पुन्हा परीक्षा दिली. यावेळी निकाल वेगळा लागला, UPAC मध्ये ४८४ वा रँक मिळाला. विशाल त्यांच्या यशाचे श्रेय त्यांची आई आणि त्याचे गुरू गौरी शंकर प्रसाद यांना देतात. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी