शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

ड्युटीवर असुरक्षित वाटत असल्यानं IAS अधिकाऱ्याचा राजीनामा; मोदींनाही ई-मेल करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 08:58 IST

राज्याच्या मुख्य सचिवांकडे राजीनामा सुपूर्द; काँग्रेसची राज्य सरकारवर टीका

चंदिगढ: सरकारी कर्तव्य बजावताना असुरक्षित वाटत असल्याचं कारण देत २०१४ च्या हरयाणा केडरच्या आयएएस अधिकारी राणी नागर यांनी राजीनामा दिला आहे. राणी नागर सध्या आर्काइव्ह्स विभागाच्या संचालिका म्हणून काम करत होत्या. राणी यांनी वैयक्तिक सुरक्षेचं कारण देत राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसनं राज्य सरकारला लक्ष्य केलं. राणी यांचा राजीनामा मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचं अपयश नाही का, असा सवाल काँग्रेसनं विचारला आहे. राणी नागर यांनी काल त्यांचा राजीनामा राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठवला. माझा राजीनामा केंद्र सरकारमधील योग्य विभागाकडे पाठवण्यात यावा, अशी विनंतीदेखील त्यांनी केली. राजीनाम्याची प्रत राष्ट्रपती, पंतप्रधान, हरयाणाचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे पाठवणार असल्याचं राणी यांनी सांगितलं. सरकारी कर्तव्यावर असताना सुरक्षित वाटत नसल्यानं राजीनामा देत आहे, असं राणी यांनी मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.मी आज (४ मे २०२०) अतिशय नम्रपणे भारतीय प्रशासकीय सेवेतील माझ्या पदाचा आज राजीनामा देत आहे, असं राणी यांना पत्रात नमूद केलं आहे. त्यांनी फेसबुक पेजवरदेखील राजीनाम्याचं पत्र शेअर केलं. त्यानंतर त्या चंदिगढमधून त्यांच्या गाझियाबादमधील घरी निघून गेल्या. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन संपल्यानंतर आपण राजीनामा देणार असल्याचं राणी यांनी काही दिवसांपूर्वीच एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं.राणी नागर जून २०१८ मध्ये चर्चेत आल्या होत्या. अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या पदावरील अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र संबंधित अधिकाऱ्यानं हे आरोप फेटाळले होते. डिसेंबर २०१७ मध्ये राणी नागर सिरसा जिल्ह्यातल्या डबावलीमध्ये उपविभागीय दंडाधिकारी म्हणून काम करत होत्या. त्यावेळी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात बेकायदा प्रवेश केल्याचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर नागर यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला. तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस तत्काळ कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला होता.