शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

ड्युटीवर असुरक्षित वाटत असल्यानं IAS अधिकाऱ्याचा राजीनामा; मोदींनाही ई-मेल करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 08:58 IST

राज्याच्या मुख्य सचिवांकडे राजीनामा सुपूर्द; काँग्रेसची राज्य सरकारवर टीका

चंदिगढ: सरकारी कर्तव्य बजावताना असुरक्षित वाटत असल्याचं कारण देत २०१४ च्या हरयाणा केडरच्या आयएएस अधिकारी राणी नागर यांनी राजीनामा दिला आहे. राणी नागर सध्या आर्काइव्ह्स विभागाच्या संचालिका म्हणून काम करत होत्या. राणी यांनी वैयक्तिक सुरक्षेचं कारण देत राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसनं राज्य सरकारला लक्ष्य केलं. राणी यांचा राजीनामा मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचं अपयश नाही का, असा सवाल काँग्रेसनं विचारला आहे. राणी नागर यांनी काल त्यांचा राजीनामा राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठवला. माझा राजीनामा केंद्र सरकारमधील योग्य विभागाकडे पाठवण्यात यावा, अशी विनंतीदेखील त्यांनी केली. राजीनाम्याची प्रत राष्ट्रपती, पंतप्रधान, हरयाणाचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे पाठवणार असल्याचं राणी यांनी सांगितलं. सरकारी कर्तव्यावर असताना सुरक्षित वाटत नसल्यानं राजीनामा देत आहे, असं राणी यांनी मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.मी आज (४ मे २०२०) अतिशय नम्रपणे भारतीय प्रशासकीय सेवेतील माझ्या पदाचा आज राजीनामा देत आहे, असं राणी यांना पत्रात नमूद केलं आहे. त्यांनी फेसबुक पेजवरदेखील राजीनाम्याचं पत्र शेअर केलं. त्यानंतर त्या चंदिगढमधून त्यांच्या गाझियाबादमधील घरी निघून गेल्या. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन संपल्यानंतर आपण राजीनामा देणार असल्याचं राणी यांनी काही दिवसांपूर्वीच एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं.राणी नागर जून २०१८ मध्ये चर्चेत आल्या होत्या. अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या पदावरील अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र संबंधित अधिकाऱ्यानं हे आरोप फेटाळले होते. डिसेंबर २०१७ मध्ये राणी नागर सिरसा जिल्ह्यातल्या डबावलीमध्ये उपविभागीय दंडाधिकारी म्हणून काम करत होत्या. त्यावेळी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात बेकायदा प्रवेश केल्याचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर नागर यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला. तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस तत्काळ कारवाई करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला होता.