शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

भारीच! अपयश आलं पण खचली नाही; 12वी नापास झालेली 'ती' IAS अधिकारी; प्रेरणादायी प्रवास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 15:43 IST

IAS officer Anju Sharma: IAS अधिकारी अंजू शर्मा या बारावीमध्ये काही विषयात नापास झाल्या होत्या.

UPSC परीक्षा उत्तीर्ण करणं हे सोपं नाही कारण ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत आणि संयम लागतो. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. IAS अधिकारी अंजू शर्मा या बारावीमध्ये काही विषयात नापास झाल्या होत्या. पण आता वयाच्या 22 व्या वर्षी UPSC ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि यश मिळवले. अंजू यांनी अपयशाचे यशात रूपांतर केले.

अंजू शर्मा 12वीच्या इकोनॉमिक्स पेपरमध्ये नापास झाल्या होत्या आणि 10वीमध्ये प्री-बोर्ड केमिस्ट्रीमध्येही नापास झाल्या होत्या. मात्र, इतर विषयांत त्या डिस्टिंक्शनने पास झाल्या. यशासाठी कायम तयार राहा असं त्यांनी म्हटलं आहे. त्याच्या आयुष्यातील दोन घटनांनीच त्याचे भविष्य घडवले, असं त्या म्हणतात. अंजू यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, "माझ्या प्री-बोर्ड दरम्यान, माझ्याकडे अनेक चॅप्टर कव्हर करायचे होते आणि रात्रीच्या जेवणानंतर मी घाबरू लागले कारण मी तयार नव्हते आणि मला माहीत होते की मी अयशस्वी होणार आहे."

"माझ्या आजूबाजूचे प्रत्येक जण 10वी इयत्तेतील कामगिरी किती महत्त्वाची आहे यावर जोर देत होते. या कठीण काळात त्याच्या आईने समजून घेतले आणि प्रोत्साहन दिले. शेवटच्या क्षणी अभ्यासावर अवलंबून राहू नये हा धडाही शिकविला. त्यामुळे त्याने अगदी सुरुवातीपासूनच कॉलेजच्या परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली आणि कॉलेजमध्ये गोल्ड मेडलिस्ट होण्यास मदत झाली. जयपूरमधून बीएससी आणि एमबीए पूर्ण केले."

अंजू शर्मा यांनी या स्ट्रेटर्जीमुळे पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यास मदत झाली. त्यांनी आपला अभ्यासक्रम आधीच पूर्ण केला आणि आयएएस टॉपर्सच्या यादीत स्थान मिळवले. अंजूने 1991 मध्ये राजकोटच्या असिस्टंट कलेक्टर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी भारत सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयात विविध पदांवर काम केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"