शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिद्दीला सलाम! 10वी-12वीत नापास, ग्रॅज्युएशनमध्ये गोल्डमेडल; पहिल्याच प्रयत्नात 'ती' झाली IAS

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 15:06 IST

IAS Anju Sharma : अपयश आलं पण तिने हार मानली नाही. जिद्दीने ती आयएएस अधिकारी झाली आहे.

दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अनेक मुलं निराश होतात. पण त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की आयुष्य इथेच संपत नाही. दहावी आणि बारावी या दोन्ही परिक्षेत नापास झालेल्या एका यशस्वी व्यक्तीची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया. अपयश आलं पण तिने हार मानली नाही. जिद्दीने ती आयएएस अधिकारी झाली आहे. आयएएस अंजू शर्मा असं त्यांचं नाव आहे.

IAS अंजू शर्मा या राजस्थानच्या रहिवासी आहेत. अंजू शर्मा या 1991 च्या बॅचच्या अधिकारी गुजरात केडरमध्ये तैनात आहेत. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. त्यावेळी त्यांचं वय फक्त 22 वर्षे होतं. राजकोटमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेतील कारकिर्दीला सुरुवात केली.

अंजू शर्मा अभ्यासात हुशार होत्या. पण परीक्षेत गडबड करायच्या. यामुळे त्या दहावीच्या प्री बोर्ड परीक्षेत नापास झाल्या. यानंतर त्या पुन्हा एकदा बारावीत नापास झाल्या. मात्र, इंटरमिजिएटमध्ये त्या फक्त अर्थशास्त्र विषयात नापास झाल्या. उर्वरित सर्व विषयांमध्ये विशेष गुणांनी उत्तीर्ण झाल्या.

बारावीत नापास झाल्यानंतरही अंजू शर्मा यांच्या आईने त्यांना खूप साथ दिली. अंजू यांना समजलं की त्यांची अभ्यासाची  तयारी करण्याची पद्धत योग्य नाही. म्हणूनच महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान त्यांनी सुरुवातीपासूनच त्याच्या उणिवांवर लक्ष केंद्रित केलं. राजस्थान विद्यापीठातून त्यांनी बीएससी आणि नंतर एमबीए केलं. कॉलेजमध्ये त्या सुवर्णपदक विजेत्या होत्या.

अंजू या सध्या गुजरातची राजधानी गांधीनगर येथे असलेल्या राज्य सचिवालयात शिक्षण विभागात (उच्च आणि तंत्रशिक्षण) मुख्य सचिव आहेत. कठोर परिश्रम आणि संयम यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांना कोणतंही काम नियोजनबद्ध पद्धतीने करायला आवडतं. आयएएस अंजू शर्मा यांचा प्रवास हे सिद्ध करतो की अपयश ही यशाची फक्त एक पायरी असते. त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी