शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

Kerala Floods: देवभूमीतील देवदूत... २ लाख जणांचे प्राण वाचवणारा IAS अधिकारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 11:51 IST

Kerala Floods : पुराची माहिती मिळताच प्रसंगावधान राखत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं

तिरुवनंतपुरम: केरळमध्ये आलेल्या महापुरात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. पुरामुळे सर्वस्व गमावलेल्या अनेकांना योग्य वेळेत मदत पोहोचवण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा होता. अनेक आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. केरळमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून काम करणारे कृष्णा तेजादेखील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी योग्यवेळी योग्य ठिकाणी बचाव अभियान राबवल्यानं मोठी जीवितहानी टळली.कृष्णा तेजा यांनी प्रसंगावधान राखत पूर येण्याआधीच अनेकांना स्थलांतरित केलं. त्यांनी तीन दिवसांमध्ये जवळपास 2 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली. 16 ऑगस्ट 2018 रोजी केरळचे अर्थमंत्री डॉक्टर थॉमस आणि कृष्णा तेजा यांची बैठक सुरू होती. मुसळधार पावसामुळे चेंगन्नूर और कुट्टानाड भागातील धरणं भरल्याची माहिती यावेळी त्यांना मिळाली. या धरणांचे दरवाजे लवकरच उघडले जाऊ शकतात, अशीही माहिती तेजा यांना मिळाली. पावसाचा जोर कायम असल्यानं धरणांचे दरवाजे उघडण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे कुट्टानाडमध्ये भीषण परिस्थिती निर्माण होऊन हजारो लोकांचं जीवन संकटात सापडू शकतं, याचा अंदाज तेजा यांना आला. यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता कुट्टानाडमध्ये ऑपरेशन सुरू केलं. तेजा आणि त्यांच्या टीमनं तब्बल दोन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं. या ऑपरेशनमध्ये असंख्य अडचणी आल्या. मात्र बोटींच्या मदतीनं तेजा यांनी नागरिकांना निवारा केंद्रात हलवलं. तेजा यांच्या या कामाचं सध्या केरळमध्ये सर्वत्र कौतुक सुरू आहे. 220 लोकांची सात पथकं तयार करुन तेजा यांनी बचावकार्य पार पाडलं. यामध्ये एनडीआरएफनंदेखील महत्त्वाची कामगिरी बजावली.  

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर