शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Kerala Floods: देवभूमीतील देवदूत... २ लाख जणांचे प्राण वाचवणारा IAS अधिकारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 11:51 IST

Kerala Floods : पुराची माहिती मिळताच प्रसंगावधान राखत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं

तिरुवनंतपुरम: केरळमध्ये आलेल्या महापुरात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. पुरामुळे सर्वस्व गमावलेल्या अनेकांना योग्य वेळेत मदत पोहोचवण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा होता. अनेक आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. केरळमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून काम करणारे कृष्णा तेजादेखील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी योग्यवेळी योग्य ठिकाणी बचाव अभियान राबवल्यानं मोठी जीवितहानी टळली.कृष्णा तेजा यांनी प्रसंगावधान राखत पूर येण्याआधीच अनेकांना स्थलांतरित केलं. त्यांनी तीन दिवसांमध्ये जवळपास 2 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली. 16 ऑगस्ट 2018 रोजी केरळचे अर्थमंत्री डॉक्टर थॉमस आणि कृष्णा तेजा यांची बैठक सुरू होती. मुसळधार पावसामुळे चेंगन्नूर और कुट्टानाड भागातील धरणं भरल्याची माहिती यावेळी त्यांना मिळाली. या धरणांचे दरवाजे लवकरच उघडले जाऊ शकतात, अशीही माहिती तेजा यांना मिळाली. पावसाचा जोर कायम असल्यानं धरणांचे दरवाजे उघडण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे कुट्टानाडमध्ये भीषण परिस्थिती निर्माण होऊन हजारो लोकांचं जीवन संकटात सापडू शकतं, याचा अंदाज तेजा यांना आला. यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता कुट्टानाडमध्ये ऑपरेशन सुरू केलं. तेजा आणि त्यांच्या टीमनं तब्बल दोन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं. या ऑपरेशनमध्ये असंख्य अडचणी आल्या. मात्र बोटींच्या मदतीनं तेजा यांनी नागरिकांना निवारा केंद्रात हलवलं. तेजा यांच्या या कामाचं सध्या केरळमध्ये सर्वत्र कौतुक सुरू आहे. 220 लोकांची सात पथकं तयार करुन तेजा यांनी बचावकार्य पार पाडलं. यामध्ये एनडीआरएफनंदेखील महत्त्वाची कामगिरी बजावली.  

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर