शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
3
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
4
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
5
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
6
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
8
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
9
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
10
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
11
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
12
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
13
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
14
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
15
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
16
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
17
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
18
Dashavatar: 'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
19
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
20
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

Kerala Floods: देवभूमीतील देवदूत... २ लाख जणांचे प्राण वाचवणारा IAS अधिकारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 11:51 IST

Kerala Floods : पुराची माहिती मिळताच प्रसंगावधान राखत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं

तिरुवनंतपुरम: केरळमध्ये आलेल्या महापुरात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. पुरामुळे सर्वस्व गमावलेल्या अनेकांना योग्य वेळेत मदत पोहोचवण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा होता. अनेक आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. केरळमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून काम करणारे कृष्णा तेजादेखील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी योग्यवेळी योग्य ठिकाणी बचाव अभियान राबवल्यानं मोठी जीवितहानी टळली.कृष्णा तेजा यांनी प्रसंगावधान राखत पूर येण्याआधीच अनेकांना स्थलांतरित केलं. त्यांनी तीन दिवसांमध्ये जवळपास 2 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली. 16 ऑगस्ट 2018 रोजी केरळचे अर्थमंत्री डॉक्टर थॉमस आणि कृष्णा तेजा यांची बैठक सुरू होती. मुसळधार पावसामुळे चेंगन्नूर और कुट्टानाड भागातील धरणं भरल्याची माहिती यावेळी त्यांना मिळाली. या धरणांचे दरवाजे लवकरच उघडले जाऊ शकतात, अशीही माहिती तेजा यांना मिळाली. पावसाचा जोर कायम असल्यानं धरणांचे दरवाजे उघडण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे कुट्टानाडमध्ये भीषण परिस्थिती निर्माण होऊन हजारो लोकांचं जीवन संकटात सापडू शकतं, याचा अंदाज तेजा यांना आला. यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता कुट्टानाडमध्ये ऑपरेशन सुरू केलं. तेजा आणि त्यांच्या टीमनं तब्बल दोन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं. या ऑपरेशनमध्ये असंख्य अडचणी आल्या. मात्र बोटींच्या मदतीनं तेजा यांनी नागरिकांना निवारा केंद्रात हलवलं. तेजा यांच्या या कामाचं सध्या केरळमध्ये सर्वत्र कौतुक सुरू आहे. 220 लोकांची सात पथकं तयार करुन तेजा यांनी बचावकार्य पार पाडलं. यामध्ये एनडीआरएफनंदेखील महत्त्वाची कामगिरी बजावली.  

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर