शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

IANS- C Voter Survey: महागाईवर पहिल्यांदाच सी-व्होटरचा सर्व्हे आला; लोक त्रासलेत, खर्च प्रचंड वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 08:05 IST

या सर्व्हेमध्ये लोकांना अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले होते. हे प्रश्न काहीसे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आव्हानांचे असले तरी यातून लोक त्रस्त असल्याचे दिसून आले आहे. 

निवडणुका आल्या की कोण जिंकणार, कोण हरणार याचा सर्व्हे करणाऱ्या संस्था आता महागाईवरही सर्व्हे करू लागल्या आहेत. आयएएनएस-सी व्होटरने या वाढलेल्या महागाईवर सर्व्हे केला आहे. यामध्ये भारतीय कुटुंबे या वाढलेल्या महागाईने त्रस्त झाली असल्याचे समोर आले आहे. 

सी व्होटरने चार राज्यांचा सर्व्हे केला आहे. यामध्ये आसाम, प. बंगाल, तामिळनाडू आणि केरळ तसेच केंद्र शासित प्रदेश पाँडिचेरीमध्ये हा विशेष सर्व्हे करण्यात आला. या राज्यांमध्ये २०२१ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या सर्व्हेमध्ये लोकांना अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले होते. हे प्रश्न काहीसे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आव्हानांचे असले तरी यातून लोक त्रस्त असल्याचे दिसून आले आहे. 

या राज्यांच्या राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी चांगले प्रदर्शन केले आहे. २०२१ नंतर निवडणुका झाल्यावर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावल्याचे अनेकांनी म्हटले आहे. आसामच्या ५१ टक्के लोकांनी म्हटले की खर्च वाढला आहे, तर उत्पन्न कमी झाले आहे.  ९ टक्के लोकांनी म्हटले की त्यांचे उत्पन्न स्थिर राहिले आहे मात्र खर्च वाढला आहे. अन्य राज्यांच्या नागरिकांची परिस्थिती काही वेगळी नाहीय. प. बंगालच्या ४६.६ टक्के लोकांनी म्हटले की गेल्या वर्षभरात कुटुंबाचे उत्पन्न कमी झाले आहे, तर खर्च वाढला आहे. तर ३१ टक्के लोकांनी उत्पन्न तसेच असून खर्च वाढल्याचे म्हटले आहे. 

दक्षिणेतील मतदारांनीदेखील याच गोष्टींकडे लक्ष वेधले आहे. केरळच्या ३९ टक्के मतदारांनी म्हटले की त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नात घट झाली आहे, परंतू कौटुंबीक खर्च वाढला आहे. ३४ टक्के लोकांचे उत्पन्न स्थिर असून खर्च वाढला आहे. तामिळनाडूमध्ये ३९ टक्के लोकांनी म्हटले की खर्च वाढला आहे, तर उत्पन्न घटले आहे. ३५ टक्के लोकांचे उत्पन्न स्थिर असून कौटुंबीक खर्च वाढल्याचे समोर आले आहे.  

टॅग्स :Inflationमहागाई