शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

IANS- C Voter Survey: महागाईवर पहिल्यांदाच सी-व्होटरचा सर्व्हे आला; लोक त्रासलेत, खर्च प्रचंड वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 08:05 IST

या सर्व्हेमध्ये लोकांना अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले होते. हे प्रश्न काहीसे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आव्हानांचे असले तरी यातून लोक त्रस्त असल्याचे दिसून आले आहे. 

निवडणुका आल्या की कोण जिंकणार, कोण हरणार याचा सर्व्हे करणाऱ्या संस्था आता महागाईवरही सर्व्हे करू लागल्या आहेत. आयएएनएस-सी व्होटरने या वाढलेल्या महागाईवर सर्व्हे केला आहे. यामध्ये भारतीय कुटुंबे या वाढलेल्या महागाईने त्रस्त झाली असल्याचे समोर आले आहे. 

सी व्होटरने चार राज्यांचा सर्व्हे केला आहे. यामध्ये आसाम, प. बंगाल, तामिळनाडू आणि केरळ तसेच केंद्र शासित प्रदेश पाँडिचेरीमध्ये हा विशेष सर्व्हे करण्यात आला. या राज्यांमध्ये २०२१ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. या सर्व्हेमध्ये लोकांना अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले होते. हे प्रश्न काहीसे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आव्हानांचे असले तरी यातून लोक त्रस्त असल्याचे दिसून आले आहे. 

या राज्यांच्या राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी चांगले प्रदर्शन केले आहे. २०२१ नंतर निवडणुका झाल्यावर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावल्याचे अनेकांनी म्हटले आहे. आसामच्या ५१ टक्के लोकांनी म्हटले की खर्च वाढला आहे, तर उत्पन्न कमी झाले आहे.  ९ टक्के लोकांनी म्हटले की त्यांचे उत्पन्न स्थिर राहिले आहे मात्र खर्च वाढला आहे. अन्य राज्यांच्या नागरिकांची परिस्थिती काही वेगळी नाहीय. प. बंगालच्या ४६.६ टक्के लोकांनी म्हटले की गेल्या वर्षभरात कुटुंबाचे उत्पन्न कमी झाले आहे, तर खर्च वाढला आहे. तर ३१ टक्के लोकांनी उत्पन्न तसेच असून खर्च वाढल्याचे म्हटले आहे. 

दक्षिणेतील मतदारांनीदेखील याच गोष्टींकडे लक्ष वेधले आहे. केरळच्या ३९ टक्के मतदारांनी म्हटले की त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नात घट झाली आहे, परंतू कौटुंबीक खर्च वाढला आहे. ३४ टक्के लोकांचे उत्पन्न स्थिर असून खर्च वाढला आहे. तामिळनाडूमध्ये ३९ टक्के लोकांनी म्हटले की खर्च वाढला आहे, तर उत्पन्न घटले आहे. ३५ टक्के लोकांचे उत्पन्न स्थिर असून कौटुंबीक खर्च वाढल्याचे समोर आले आहे.  

टॅग्स :Inflationमहागाई