शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
3
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
4
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
5
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
6
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
7
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
8
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
9
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
10
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
11
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
12
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
13
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
14
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
15
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
16
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
17
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
18
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
20
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?

चीनचा मुकाबला करण्यासाठी IAF ची 'सी-130 जे हरक्युलिस' विमाने सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 16:51 IST

चीनकडून वारंवार युद्धाची धमकी दिली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने पूर्वेकडचा पनागड येथील अर्जन सिंग हवाई तळ पूर्णपणे सज्ज ठेवला आहे.

ठळक मुद्देभारतीय वायू दलाची सहा सी-130 जे सुपर हरक्यूलिस विमाने पूर्णपणे सज्ज आहेत. गाझियबाद येथील हिंडन तळानंतर पनागड हा सी-130 जे विमानांचा देशातील दुसरा तळ आहे

कोलकाता, दि. 24 - चीनकडून वारंवार युद्धाची धमकी दिली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने पूर्वेकडचा पनागड येथील अर्जन सिंग हवाई तळ पूर्णपणे सज्ज ठेवला आहे. इथे भारतीय वायू दलाची सहा सी-130 जे सुपर हरक्यूलिस विमाने पूर्णपणे सज्ज आहेत. जून महिन्यात भारत आणि चीनमध्ये डोकलाममध्ये संघर्ष सुरु झाला होता. जुलैच्या शेवटच्या आठवडयात अर्जन सिंह हवाई तळाला आपातकालीन परिस्थितीसाठी तयार करण्यात आले. 

गाझियबाद येथील हिंडन तळानंतर पनागड हा सी-130 जे विमानांचा देशातील दुसरा तळ आहे. पनागडमध्ये मागच्या दोन वर्षांपासून लॉकहीड मार्टीनचे इंजिनिअर आणि टेक्निशिअन हँगर आणि अन्य सुविधांची उभारणी करत आहेत. 2011 सालापासून सी-130 जे विमाने भारतात यायला सुरुवात झाली. हिंडनमध्ये या विमानांचा पहिला तळ बनवण्यात आला. 

सी-130 जे सुपर हरक्यूलिस हे फक्त मालवाहतुक विमान नसून, या विमानामध्ये  काही अन्य क्षमताही आहेत. ज्यामुळे युद्धकाळात हे विमान अत्यंत महत्वपूर्ण ठरु शकते. भारताच्या ईशान्येकडची सीमा चीनला लागून आहे. या ठिकाणी छोटया धावपट्ट्यांवरही हे विमान सहज लँडींग करु शकते. 

चीनकडून सध्या वारंवार भारताला धमकी दिली जात आहे.  भारताच्या सीमेवरील इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेटवर्कमुळे आम्हाला धोका निर्माण होतोय असे कारण पुढे करुन उद्या आम्ही आमचे सैन्य घुसवले तर, खरोखरच भारतात अराजकता निर्माण होईल अशी धमकी चीनने दिली. 

 आपल्या लष्करी ताकतीच्या बळावर चीन भले वारंवार युद्धाची गर्जना करत असेल, पण उद्या दोन्ही देशांमध्ये असे युद्ध भडकलेच तर चीनला त्यात कुठलाही फायदा होणार नाही. वरिष्ठ सरकारी पातळीवरील विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. डोकलामच्या चिघळत चाललेल्या संघर्षाचे उद्या युद्धात पर्यावसन झाले तर, चीनला प्रादेशिक आणि रणनितीक दोन्ही आघाडयांवर लाभ होणार नाही. फक्त दोन्ही बाजूला  रक्तपात होईल. या युद्धातून कोणीही विजेता किंवा पराभूत ठरणार नाही. उलट चीनला 1962 सारखा युद्धाचा निकाला लावता आला नाही तर, आशियातील चीनचे वर्चस्व संपून जाईल

टॅग्स :chinaचीन