शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

'जग विसरत चाललंय की...'; हवाई दल प्रमुखांनी सांगितले ऑपरेशन सिंदूर लवकर थांबवण्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 20:02 IST

हवाई दल प्रमुख मार्शल एपी सिंग यांनी पाकिस्तानविरोधात राबवलेले ऑपरेशन सिंदूर थांबवण्याचे कारण सांगितले.

IAF Chief Air Marshal AP Singh: भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल एपी सिंग यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान वापरल्या गेलेऱ्या एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीला गेम चेंजर म्हटलं आहे. त्यांनी सांगितले की आजच्या युद्धांमध्ये ड्रोनचा वापर केला जात आहे, पण केवळ ड्रोनने युद्धे जिंकता येत नाहीत. लांब पल्ल्याच्या आणि प्राणघातक शस्त्रांव्यतिरिक्त, आपल्याकडे लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा मारा करण्यास सक्षम विमाने देखील असली पाहिजेत असेही एपी सिंग म्हणाले.

तसेच पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याचे उद्दिष्ट भारताने साध्य केल्यामुळे ऑपरेशन सिंदूर ४ दिवसांनीच थांबवण्यात आले, असे हवाई दल प्रमुख मार्शल एपी सिंग यांनी शुक्रवारी सांगितले. 'कोणत्याही संघर्षाची मोठी किंमत मोजावी लागते आणि त्याचा पुढील संघर्षाच्या तयारीवर परिणाम होतो,' असेही हवाई दल प्रमुख म्हणाले.

"आज जी मुख्य युद्धे सुरू आहेत, रशिया असो, युक्रेन असो किंवा इस्रायल युद्ध असो. ती वर्षे उलटून गेली तरी चालू आहेत. कारण कोणीही संघर्ष थांबवण्याचा विचार करत नाहीये. आम्ही ऐकले की लोक म्हणत होते की नाही आपण अजून थोडे अधिक लढायला हवे होते. आपण युद्ध खूप लवकर थांबवले. हो, पाकिस्तान युद्धात मागे पडलं काही शंका नाही, पण आमचे उद्दिष्ट काय होते? आमचे उद्दिष्ट दहशतवाद्यांच्या अड्डे उद्धवस्त करण्याचे होते. आपल्याला त्यांच्यावर हल्ला करायचा होता आणि आम्ही ते केले होते," मार्शल एपी सिंग म्हणाले.

"जर आपली उद्दिष्टे साध्य झाली असतील, तर आपण हा संघर्ष का थांबवू नये? आपण संघर्ष का चालू ठेवायचा? कारण कोणत्याही संघर्षाची किंमत खूप जास्त असते. त्याचा परिणाम पुढील संघर्षाच्या तयारीवर होतो. त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होते. त्याचा देशाच्या प्रगतीवर परिणाम होतो. म्हणून, मला वाटते की जग हेच विसरत आहे. जेव्हा त्यांनी युद्ध सुरू केले तेव्हा त्यांचे ध्येय काय होते हे त्यांना माहित नाहीये," असेही मार्शल एपी सिंग यांनी म्हटलं.

"आता त्यांची ध्येये बदलत आहेत. याच्यामध्ये अहंकार अडथळा ठरतोय आणि इथेच जगाने भारताकडून संघर्ष कसा सुरू करायचा आणि तो शक्य तितक्या लवकर कसा संपवायचा याचा धडा घेतला पाहिजे असे मला वाटते, असं एपी सिंग यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटकांवर झालेल्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ प्रमुख दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूर मुख्यालय आणि लष्कर-ए-तोयबाचे मुरीदके मुख्यालय यांचा समावेश होता. भारतविरोधी दहशतवादाला आश्रय देण्याचा आरोप असलेले हे सर्व दहशतवादी अड्डे भारतीय सशस्त्र दलांनी उद्ध्वस्त केली.

दहशतवाद्यांचे प्रमुख ज्या ठिकाणी राहत होते आणि हल्ला करण्याची योजना आखत होते त्या कार्यालयांवर भारताने हल्ले होते. भारतीय हवाई दलाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओंमध्ये दहशतवादी तळावार झालेला विनाश दिसून येत होता. या हल्ल्यांमध्ये आयसी-८१४ अपहरणकर्ता युसूफ अझहर, लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख अबू जुंदाल आणि २०१६ च्या नागरोटा हल्ल्याच्या योजनाकाराचा मुलगा यासह सुमारे डझनभर प्रमुख दहशतवादी ठार झाले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाindian air forceभारतीय हवाई दल