शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

Agnipath : अग्निवीरांच्या भरतीसाठी भारतीय वायू दलाकडून नोंदणीची तारीख जाहीर; जाणून घ्या कधी होणार परीक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 14:24 IST

Agnipath Recruitment 2022, Agniveer Bharti Rally Notification: भारतीय वायू दलातील अग्निवीरांसाठी किमान शैक्षणिक पात्रता १२ वी आहे. यामध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी अनिवार्य असणार आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. देशाच्या अनेक भागात निदर्शने होत आहेत. यादरम्यान लष्करानंतर आता भारतीय वायू दलानेही अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी आणि परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. भारतीय वायू दलातील अग्निवीरांसाठी किमान शैक्षणिक पात्रता १२ वी आहे. यामध्ये भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी अनिवार्य असणार आहे.

भारतीय वायू दलात अग्निवीरांची नोंदणी २४ जूनपासून सुरू होणार असून ५ जुलैपर्यंत राहणार आहे. ही नोंदणी ऑनलाइन पद्धतीने केली जाईल. यासाठी परीक्षा २४ जुलै रोजी होणार आहे. यामध्ये 12वीची शैक्षणिक पात्रता मागविण्यात आली असून, त्यात उमेदवाराला गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी अनिवार्य असणे आवश्यक आहे. यासोबतच इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण अनिवार्य करण्यात आले आहेत. तसेच, सरकारी मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून ५० टक्के गुणांसह इंजीनिअरिंगमध्ये (मेकॅनिक/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इंस्ट्रुमेंटल टेक्नॉलॉजी/माहिती तंत्रज्ञान) तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स झाला पाहिजे.

दरम्यान, भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी सोमवारी भारतीय लष्कराने अग्निवीर रिक्रूटमेंट रॅली नोटिफिकेशन जारी केले आहे. यानुसार, पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना भारतीय लष्कराची अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in ला भेट देऊन अर्ज करता येईल. जुलै २०२२ पासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल.

दुसरीकडे, अग्निपथ योजनेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये सरकारने सशस्त्र दलांसाठी वर्षांची जुनी निवड प्रक्रिया रद्द केली आहे, जी घटनात्मक तरतुदींच्या विरोधात आहे आणि यासाठी संसदेची मंजुरी सुद्धा घेतली नाही. अधिवक्ता एमएल शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला होत असलेल्या विरोध प्रदर्शनाचा हवाला देत ही अधिसूचना बेकायदेशीर आणि घटनाबाह्य ठरवून रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :airforceहवाईदलindian air forceभारतीय हवाई दलAgneepath Schemeअग्निपथ योजना