शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राम मंदिरासाठी जागा, सोन्याची वीट देईन; मुघल राजघराण्याच्या शेवटच्या वंशजाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 04:35 IST

अयोध्या वादावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी होण्यासाठीही तुकी यांनी अर्ज केला आहे.

हैदराबाद : अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशिदीची वादग्रस्त जागा आम्हाला दिली तर आम्ही तेथे श्री रामाचे मंदिर बांधण्यासाठी सोन्याची वीट देऊ, अशी तयारी हैदराबादमध्ये राहणाऱ्या मुघल राजघराण्याच्या शेवटच्या वंशजाने दर्शविली आहे.दिल्लीचे शेवटचे मुघल बादशहा बहादूर शाह जफर यांचे सहाव्या पिढीतील ५० वर्षांचे वंशज हबिबुद्दीन तुकी म्हणाले की, अयोध्येतील सर्व वादग्रस्त जमीन मी राम मंदिर बांधण्यासाठी परत देईन व शिवाय मंदिरासाठी सोन्याची वीटही देईन. तुकी यांनी असाच प्रस्ताव गेल्या सप्टेंबरमध्येही केला होता.अयोध्या वादावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी होण्यासाठीही तुकी यांनी अर्ज केला आहे. मात्र, न्यायालयाने अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. तुकी म्हणाले की, न्यायालयापुढे असलेल्या कोणाही पक्षकाराकडे अयोध्येतील त्या जागेच्या मालकीची कागदपत्रे नाहीत; पण मुघल शासकांचा वंशज या नात्याने ती जमीन कोणाला दिली जावी याविषयी मत व्यक्त करण्याचा हक्क तरी मला नक्कीच आहे.वादग्रस्त जागेवर हक्क दाखविणारे दस्तावेज आपल्यापाशीही नाहीत, हे मान्य करून तुकी म्हणाले की, पण मुघल शासकांचा वंशजया नात्याने माझ्या हक्काच्यादाव्याला निदान विश्वासार्हता तरी आहे. दरवर्षी आग्रा येथे शहाजहाँ बादशहाचा उरूस भरतो तेव्हा ताजमहालाच्या कोठीचे दरवाजे मीच उघडतो यावरून मी मुघलांचा मान्यताप्राप्त वंशज असल्याचेच सिद्ध होते, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)भावनांचा आदर करायला हवातुकी यांच्या म्हणण्यानुसार पहिला मुघल बादशहा बाबर याने सन १५२९ मध्ये सैनिकांना नमाज पढण्याची सोय व्हावी यासाठी अयोध्येत ही मशीद बांधली. ती मशीद फक्त सैन्यासाठी होती व तेथे अन्य कोणीही जाऊ शकत नसे. ते म्हणाले की, मशीद बांधण्यापूर्वी त्या जागेवर नेमके काय होते, या वादात मला पडायचे नाही; पण ती जागा हे श्री रामाचे जन्मस्थान असल्याचे सांगून समाजाचा एक वर्ग त्यावर दावा करीत असल्याने मला त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर