शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

'मै अकेलाही चला था जानिब ए मंझिल, लोग आते गये और कारवा बनता गया'

By महेश गलांडे | Updated: March 1, 2021 13:41 IST

मार्च आणि एप्रिल महिन्यात चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. एका सर्वेक्षणानुसार तीन राज्यांमध्ये सत्ता कायम राहणार

ठळक मुद्देअब्बास सिद्दिकी यांनी काँग्रेसच्या डाव्या आघाडीशी हातमिळवणी केली. त्यामुळे, एमआयएम बंगालमध्ये एकटा पडला

नवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचीच सत्ता कायम राहणार असल्याचा अंदाज एबीपी-सी व्होटर यांच्या जनमत चाचणीतून व्यक्त करण्यात आला आहे. भाजपाने पश्चिम बंगालमधील निवडणुकांसाठी सर्वस्व पणाले लावले असून बड्या नेत्यांची फौज प्रचाराच्या मैदानात उतरवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहांच्याही सभांचा नियोजन बंगालमध्ये आहे. तर, दुसरीकडे बिहार निवडणुकीतील यशानंतर एमआयएमच्या असुदुद्दीन औवेसी यांनीही पश्चिम बंगालच्या निवडणुकीत उमेदवार उभारणार असल्याचं सांगितल होतं. 

मार्च आणि एप्रिल महिन्यात चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. एका सर्वेक्षणानुसार तीन राज्यांमध्ये सत्ता कायम राहणार असून, तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये सत्तांतराचा अंदाज या चाचणीतून व्यक्त करण्यात आला आहे. तत्पूर्वी तृणमूल काँग्रेस आणि एमआयएमच्या आघाडीचीही चर्चा रंगली आहे. एमआयएमचे प्रमुख असुद्दुदीन ओवैसी यांनी आपल्या बंगालमधील बागडोर फुरफुरा शरीफ पीरजादा अब्बास सिद्दीकी यांच्याहाती एमआयएमची कमान दिली होती. पण, अब्बास सिद्दिकी यांनी काँग्रेसच्या डाव्या आघाडीशी हातमिळवणी केली. त्यामुळे, एमआयएम बंगालमध्ये एकटा पडला. त्याबद्दल असुदुद्दीन ओवैसी यांनी विचारलं असता, मै अकेलाही चला था, लोग आते गये और कारवा बनता गया... असे ओवैसी यांनी म्हटलंय. तसेच, योग्य वेळ येताच पश्चिम बंगालमधील एमआयएमच्या निवडणूक रणनितीविषयी सांगेल, असेही ओवैसी यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे, काँग्रेससह, तृणमूलचेही लक्ष ओवैसी याच्या भूमिकेकडे लागले आहे. 

जनमत ममता यांच्या बाजुनेच

भारतीय जनता पार्टीसाठी पश्चिम बंगाल येथील निवडणूक खूप प्रतिष्ठेची आहे. तेथे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससोबत थेट टक्कर आहे. मात्र, जनमत चाचणीनुसार सत्ता ममतांच्याच पारड्यात जाणार आहे. पश्चिम बंगालमध्ये २९४ जागांपैकी तृणमूल काँग्रेसला १४८ ते १६४ जागा मिळतील, असा अंदाज आहे. ममतांना भाजपकडून यंदा कडवे आव्हान मिळणार असून, भाजपच्या वाट्याला ९२ ते १०८ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला ३१ ते ३९ जागा मिळू शकतात. तृणमूल काँग्रेसला ४३ टक्के, भाजपला ३८ टक्के, तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला १३ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. 

तृणमूलच्या जागा कमी होणार 

गेल्या निवडणुकीत ममतांना २११ जागा मिळाल्या होत्या. मात्र, यंदा सत्ता कायम राखण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असला, तरीही मोठ्या प्रमाणात जागा घटण्याची शक्यता आहे. हीच स्थिती काँग्रेस आणि डाव्या आघाडीबाबत आहे. गेल्यावर्षी बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर भाजपने प. बंगालकडे मोर्चा वळविला होता. भाजपने २०० हून अधिक जागा मिळतील, असा दावा केला आहे.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीwest bengalपश्चिम बंगालWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन