शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

मी भय, विद्वेष पसरवतो, ओळखा पाहू मी कोण?- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 03:41 IST

झारखंडमध्ये स्वामी अग्निवेश यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी केलेल्या मारहाणीनंतर भाजपला धारेवर धरण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक अनोखा उपाय शोधला.

नवी दिल्ली : झारखंडमध्ये स्वामी अग्निवेश यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी केलेल्या मारहाणीनंतर भाजपला धारेवर धरण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक अनोखा उपाय शोधला. ओळखा पाहू मी कोण?च्या धर्तीवर ‘मी भय व विद्वेष पसरवतो. ओळखा पाहू मी कोण? हा उपरोधिक सवाल राहुल गांधी यांनी बुधवारी टिष्ट्वटद्वारे विचारला.‘मी सर्वात बलवान आहे. सामर्थ्य व सत्ता माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. सत्ता टिकविण्यासाठी मी विद्वेष व भीतीचा वापर करतो. मी दुर्बलांना नष्ट करतो. समोरचे माझ्याकरिता किती उपयोगाचे आहेत हे जोखूनच त्यांना त्याप्रमाणे मी वागवतो. ओळखा पाहू मी कोण?' असा सवाल विचारून राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढविला आहे.स्वामी अग्निवेश यांना झालेल्या मारहाणीची बातमीही त्यांनी आपल्या टिष्ट्वटला जोडली आहे.>भाजपचे गुंड आता साधुसंतांनाही मारहाण करु लागले - तेजस्वी यादवमुसलमान, दलित, आदिवासी यांना मारहाण करणारे भाजपचे गुंड आता ७८ वर्षे वयाच्या आर्य समाजाच्या स्वामी अग्निवेश यांनाही चोप देऊ लागले आहेत. धर्माच्या आडून भाजप घाणेरडे राजकारण खेळत आहे.विरोधी विचारसरणीच्या लोकांबद्दल भाजप कार्यकर्त्यांच्या मनात द्वेषाची भावना आहे अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे युवा नेते व बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एका टिष्ट्वटद्वारे केली आहे. लोकशाही व देशाला हे लोक कुुठे घेऊन जाणार आहेत अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.राहुल गांधीच्या टिष्ट्वटला उत्तर देणाऱ्यांपैकी काहींनी भाजपावर तोंडसुख घेतले, तर काहींनी राहुल व काँग्रेसवरच कडक टीका केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी