शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

कपबशा धुवत, लोकांना चहा देत मी मोठा झालो; चहाशी माझे नाते खूप गहिरे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 15:47 IST

मोदींनी भाषणात कपबशीसोबतचे आपले नाते सांगत मोठ्या खुबीने मित्रपक्षाला मतदान करण्याचे उपस्थितांना आवाहन केले

मिर्झापूर: कपबशा धुवत आणि लोकांना चहा देत मी लहानाचा मोठा झालो. मोदी व चहाचे नाते खूप गहिरे आहे, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हटले. रालोआचा घटकपक्ष असलेल्या अपना दल-एसचे कपबशी हे निवडणूक चिन्ह आहे. मोदींनी भाषणात कपबशीसोबतचे आपले नाते सांगत मोठ्या खुबीने मित्रपक्षाला मतदान करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

मोदी रालोआचा उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर लोकसभा मतदारसंघातील अपना दलच्या उमेदवार अनुप्रिया पटेल, रॉबर्टसगंजमधील उमेदवार रिंकी कोल यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला संबोधित करत होते. 

मोदी म्हणाले, आज मी भाषण न करता तुमच्याशी गप्पाटप्पा करेन. तुम्ही-आम्ही जेव्हा घर उभारतो आणि घर उभारताना एखादा मिस्त्री  ठेवतो. तेव्हा आपण काय दर महिन्याला नवा मिस्त्री ठेवतो का? म्हणजे एक महिना हा मिस्त्री काम  करेल, दुसऱ्या महिन्यात  दुसरा, तिसऱ्या महिन्यात तिसरा आणि चौथ्या महिन्यात चौथा. असे झाले तर ते घर बांधून तरी पूर्ण होईल का? तसेच ते घर राहण्यालायक असेल का असा सवाल मोदींनी केला.

इंडिया आघाडी समुदायाला दुय्यम दर्जाचे नागरिक बनवू इच्छिते!

मऊ (उप्र): काँग्रेस आणि सपाची इंडिया आघाडी भारतातील बहुसंख्याक समुदायाला दुय्यम दर्जाचे नागरिक बनवू इच्छिते, असा घणाघात पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केला. ते म्हणाले की, ‘पूर्वांचलची ही भूमी शौर्य आणि क्रांतीची भूमी आहे. सपा आणि काँग्रेसच्या घराणेशाहीने पूर्वांचलला माफिया, दुर्भिक्ष्य, दारिद्र्य व असहाय्यतेचे क्षेत्र बनवले आहे. मात्र, गेल्या १० वर्षांपासून पूर्वांचल देशाच्या पंतप्रधानांची आणि सात वर्षांपासून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची निवड करत आहे आणि म्हणूनच पूर्वांचल हे सर्वात खास आहे.

हे लोक कट्टर जातीयवादी आहेत... 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांची इंडिया आघाडी जातीयवादी असल्याची टीका केली.
  • मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी या आघाडीने राज्यघटना बदलण्याचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला. देशातील जनतेने इंडिया आघाडीला पुरेपूर ओळखले आहे.
  • हे लोक कट्टर जातीयवादी आहेत. जेव्हा ते सरकार स्थापन करतील तेव्हा ते या आधारावरच निर्णय घेतील, असा दावाही मोदींनी केला.

पाच वर्षांत पाच पंतप्रधान योग्य आहे?

छोटे घर बांधत असतानाही कोणी वारंवार मिस्त्री बदलत नाहीत. मग पाच वर्षांत पाच पंतप्रधान बदलणे कितपत योग्य आहे, असा सवाल मोदींनी केला.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी