शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

चित्रपटगृहात राष्ट्रगीतादरम्यान मला उभं राहायला आवडत नाही - पवन कल्याण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 11:39 IST

चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जाते तेव्हा मला उठून उभे राहावेसे वाटत नाही असं पवन कल्याण यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्दे चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जाते तेव्हा मला उठून उभे राहावेसे वाटत नाही असं पवन कल्याण यांनी म्हटलं आहे. राजकीय पक्ष त्यांची बैठक सुरू करण्याआधी राष्ट्रगीत का वाजवत नाहीत? केवळ चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवण्याचे बंधन का?देशातील सर्वोच्च (सरकारी) कार्यालयांमध्येही राष्ट्रगीत वाजवले जावे.

कुरनूल - दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आणि जन सेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्याआधी वाजवण्यात येणाऱ्या राष्ट्रगीतासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जाते तेव्हा मला उठून उभे राहावेसे वाटत नाही असं पवन कल्याण यांनी म्हटलं आहे. आंध्रप्रदेशमधील कुरनूल जिल्ह्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवन यांनी राष्ट्रगीतासंदर्भातील आपलं मत व्यक्त केलं आहे. 

'चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जाते तेव्हा मला उभे राहायला आवडत नाही. कुटुंबाबरोबर आणि मित्रमंडळींबरोबर निवांत चित्रपट पाहण्याच्या उद्देशाने चित्रपटगृहात गेल्यानंतर आधी प्रत्येकाला आपण देशभक्त असल्याचे दाखवावे लागते, हे चुकीचे आहे,’ असं पवन कल्याण यांनी म्हटलं आहे. 

'राजकीय पक्ष त्यांची बैठक सुरू करण्याआधी राष्ट्रगीत का वाजवत नाहीत? केवळ चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवण्याचे बंधन का?, देशातील सर्वोच्च (सरकारी) कार्यालयांमध्येही राष्ट्रगीत वाजवले जावे. जे लोक आपल्यासाठी नियम आणि कायदे तयार करतात त्यांनीच ते अमलात आणून सामान्यांसमोर एक आदर्श निर्माण करावा' असं मत पवन कल्याण यांनी व्यक्त केलं. तसेच राष्ट्रगीतासंदर्भात राजकीय पक्षांना आणि नेत्यांना प्रेम नाही का अशा आशयाचा प्रश्न पवन कल्याण यांनी उपस्थित केला आहे. 2016 मध्ये सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या एका निर्णयामध्ये चित्रपटगृहात राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ सर्वांनी उभे राहणे अपेक्षित असल्याचे म्हटले होते. त्यावेळीही पवन कल्याण यांनी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नाराजी दर्शवली होती. 

पवन कल्याण यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीआधी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध होईल ही गोष्ट एका भाजपा नेत्याने दोन वर्षांपूर्वीच आपणास सांगितली होती असा धक्कादायक गौप्यस्फोट केला होता. केवळ निवडणुका जिंकण्यासाठी मुद्दाम युद्ध जनतेवर लादले जात असेल तर देशातील परिस्थिती काय आहे हे समजू शकते असेही त्यांनी म्हटले होते. तसेच पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावरील हल्ल्याने युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली. देशभक्तीचा मक्ता एकट्या भाजपाचा नाही. भाजपावाल्यांपेक्षा आम्ही दहा पटीनी राष्ट्रभक्त आहोत. मुसलमानांना देशभक्ती सिद्ध करण्याची मुळीच गरज नाही असे सांगतानाच समाजात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न ‘जनसेना’ उधळून लावेल असे ते म्हणाले होते.  

टॅग्स :National Anthemराष्ट्रगीतcinemaसिनेमाTheatreनाटक