शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

मी तुम्हाला पंतप्रधान मानत नाही, ममतांचा मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 07:59 IST

जो माणूस आपल्या बायकोचा संभाळ करू शकत नाही तो देशातील नागरिकांचा संभाळ कसा करणार? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे.

बिष्णुपूर - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रंगत शेवटच्या टप्प्यात येत असताना राजकीय वातावरण तापू लागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी कडाडून टीका केली आहे. जो माणूस आपल्या बायकोचा संभाळ करू शकत नाही तो देशातील नागरिकांचा संभाळ कसा करणार? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे. 

यावेळी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, जर मी टोल कलेक्टर आहे तर तुम्ही कोण आहे? तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत. जेव्हा तुम्हाला विचारलं जातं तुमची पत्नी काय करते? ती कुठे राहते? तर त्यावर पंतप्रधानांकडे उत्तर नाही. जो स्वत:च्या पत्नीचा संभाळ करु शकत नाही तो भारतीयांचा संभाळ कसा करणार? असं त्या म्हणाल्या. 

मी मोदींनी देशाचा पंतप्रधान मानत नाही, त्यामुळे मी बैठकीत सहभागी झाली नाही. मी त्यांच्यासोबत एका मंचावर उपस्थित राहू इच्छित नाही. मी येणाऱ्या पंतप्रधानांशी चर्चा करेन. वादळामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. निवडणुकीपूर्वी आम्हाला केंद्राच्या मदतीची गरज नाही असंही ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले. 

मागील काही दिवसांपासून ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संघर्ष वाढत चाललेला आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात कलगीतुरा रंगताना पाहायला मिळतोय. इतकचं नाही तर फनी वादळासंदर्भातही पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फोन करण्याऐवजी राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांना फोन करुन परिस्थीतीचा आढावा घेतला, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयातील सुत्रांनी सांगितले की, पंतप्रधान कार्यालयाकडून ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, ममता यांनीच फोन घेण्यास नकार दिला. तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या आरोपानंतर पीएमओने ही माहिती दिली होती. तर ममता यांनीही नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार करुन निवडणुकीपूर्वी आम्हाला केंद्राच्या मदतीची गरज नसल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीFani Cyclone फनी वादळ