शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मला इंडिया आघाडी हे नाव द्यायचे नव्हते, दुसरे देणार होतो; नितीशकुमारांचा बाहेर पडताच मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 13:41 IST

पलटीबाज मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमारांना बिहारच्या राजकारणात ओळखले जात आहे. अशातच इंडिया आघाडीवर विचारले असता नितीश यांनी आम्ही तर नावही दिले नव्हते, आता इंडिया आघाडीच संपली आहे, असे म्हटले आहे. 

बिहारमध्ये राजकीय उलथापालथीनंतर लालू प्रसाद यादवांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांना पुन्हा मैत्रीची ऑफर दिली आहे. यावर नितीश कुमारांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. पलटीबाज मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमारांना बिहारच्या राजकारणात ओळखले जात आहे. अशातच इंडिया आघाडीवर विचारले असता नितीश यांनी आम्ही तर नावही दिले नव्हते, आता इंडिया आघाडीच संपली आहे, असे म्हटले आहे. 

लालू यांच्या ऑफरवर नितीश यांनी म्हटले की, कोण काय बोलतो त्याच्या भानगडीत पडू नका. आम्ही आता एकत्र आलो आहोत, जसे पहिले होतो. जो घोटाळा झालाय त्याची चौकशी होईल. गोष्टी ठीक सुरु नव्हत्या. यामुळे मी राजदला सोडले, असे नितीशकुमार म्हणाले.

लालू प्रसादांना नमस्कार केल्यावरून ते म्हणाले की, आता मला असे कोणी भेटले, मग तो माझ्या विरोधात असो वा विरोधी पक्षात, आम्ही नमस्कार करतो. बरोबर? ही माझी सवय आहे. आम्ही इथे होतो तेव्हा लालू समोरून येत होते, म्हणून नमस्कार केला, असा खुलासा नितीश कुमार यांनी केला.

इंडिया आघाडीबद्दल विचारले असता, मी खूप प्रयत्न केला होता. मी हे नावही दिले नव्हते, मला दुसरे नाव द्यायचे होते. त्या लोकांनीच इंडिया आघाडी हे नाव दिले. हे लोक सुरुवातीला नाराज होत होते म्हणून मी म्हटले की सोडून द्या तुम्हाला जे नाव द्यायचे ते द्या. मी जेव्हा वेगळा झालो तेव्हाच मी सगळे सांगितले होते. बिहारच्या हिताचे काम करणे हे माझे काम आहे, असे नितीशकुमार म्हणाले.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBiharबिहारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव