शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

मला इंडिया आघाडी हे नाव द्यायचे नव्हते, दुसरे देणार होतो; नितीशकुमारांचा बाहेर पडताच मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 13:41 IST

पलटीबाज मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमारांना बिहारच्या राजकारणात ओळखले जात आहे. अशातच इंडिया आघाडीवर विचारले असता नितीश यांनी आम्ही तर नावही दिले नव्हते, आता इंडिया आघाडीच संपली आहे, असे म्हटले आहे. 

बिहारमध्ये राजकीय उलथापालथीनंतर लालू प्रसाद यादवांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांना पुन्हा मैत्रीची ऑफर दिली आहे. यावर नितीश कुमारांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. पलटीबाज मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमारांना बिहारच्या राजकारणात ओळखले जात आहे. अशातच इंडिया आघाडीवर विचारले असता नितीश यांनी आम्ही तर नावही दिले नव्हते, आता इंडिया आघाडीच संपली आहे, असे म्हटले आहे. 

लालू यांच्या ऑफरवर नितीश यांनी म्हटले की, कोण काय बोलतो त्याच्या भानगडीत पडू नका. आम्ही आता एकत्र आलो आहोत, जसे पहिले होतो. जो घोटाळा झालाय त्याची चौकशी होईल. गोष्टी ठीक सुरु नव्हत्या. यामुळे मी राजदला सोडले, असे नितीशकुमार म्हणाले.

लालू प्रसादांना नमस्कार केल्यावरून ते म्हणाले की, आता मला असे कोणी भेटले, मग तो माझ्या विरोधात असो वा विरोधी पक्षात, आम्ही नमस्कार करतो. बरोबर? ही माझी सवय आहे. आम्ही इथे होतो तेव्हा लालू समोरून येत होते, म्हणून नमस्कार केला, असा खुलासा नितीश कुमार यांनी केला.

इंडिया आघाडीबद्दल विचारले असता, मी खूप प्रयत्न केला होता. मी हे नावही दिले नव्हते, मला दुसरे नाव द्यायचे होते. त्या लोकांनीच इंडिया आघाडी हे नाव दिले. हे लोक सुरुवातीला नाराज होत होते म्हणून मी म्हटले की सोडून द्या तुम्हाला जे नाव द्यायचे ते द्या. मी जेव्हा वेगळा झालो तेव्हाच मी सगळे सांगितले होते. बिहारच्या हिताचे काम करणे हे माझे काम आहे, असे नितीशकुमार म्हणाले.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBiharबिहारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव