शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

'रवींद्रनाथ टागोर यांच्या जागेवर मी बसलोच नाही, पंडीत नेहरुच बसले होते'

By महेश गलांडे | Updated: February 10, 2021 09:57 IST

अमित शाह यांनी आरोप फेटाळून लावताना रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्व भारती विद्यापीठाच्या पत्राचाही उल्लेख केला. “अधीर रंजन चौधरी यांनी सोमवारी बोलताना मी शांतीनिकेतन दौऱ्यावेळी रवींद्रनाथ टागोर यांच्या जागेवर बसल्याचं सांगितलं.

ठळक मुद्देअमित शाह यांनी आरोप फेटाळून लावताना रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्व भारती विद्यापीठाच्या पत्राचाही उल्लेख केला. “अधीर रंजन चौधरी यांनी सोमवारी बोलताना मी शांतीनिकेतन दौऱ्यावेळी रवींद्रनाथ टागोर यांच्या जागेवर बसल्याचं सांगितलं.

नवी दिल्ली - भारतीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्त्वाची परवानगी देण्याचा कुठलाही विचार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने लोकसभेत स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार १ कोटी २५ लाख म्हणजेच सुमारे १ टक्का भारतीय नागरिक परदेशात राहात आहेत. तसेच गेल्या ५ वर्षांमध्ये ६ लाख ७३ हजार जणांनी भारतीय नारिकत्त्वाचा त्याग केल्याची माहितीही गृहमंत्रालयाने लोकसभेत सादर केली. यावेळी, केंद्रीय गृहमंत्री यांनी, पश्चिम बंगाल दौऱ्यात शांतीनिकेतनला भेट दिल्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांच्या जागेवर आपण बसल्याला आरोप फेटाळला असून याबाबत स्पष्टीकरण दिले.  

रवींद्रनाथ टागोर यांच्या जागेवर आपण बसल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी अमित शाह यांच्यावर हा आरोप केला होता. गेल्या महिन्यात २० जानेवारीला पश्चिम बंगाल दौऱ्यावेळी अमित शाह यांनी विश्वभारती विद्यापीठाला भेट दिली तेव्हा रवींद्रनाथ टागोर यांच्या जागी बसून अनादर केला होता असा आरोप अधीर रंजन चौधरी यांच्याकडून करण्यात आला होता. या आरोपांवर अमित शाह यांनी लोकसभेत स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, यापूर्वी कोणते नेते त्या जागेवर बसले होते, आणि कोणाकोणाचे फोटो आहेत, हेही बालून दाखवले. 

अमित शाह यांनी आरोप फेटाळून लावताना रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्व भारती विद्यापीठाच्या पत्राचाही उल्लेख केला. “अधीर रंजन चौधरी यांनी सोमवारी बोलताना मी शांतीनिकेतन दौऱ्यावेळी रवींद्रनाथ टागोर यांच्या जागेवर बसल्याचं सांगितलं. माझ्याकडे विश्वभारतीच्या कुलगुरूंचं पत्र आहे ज्यामध्ये त्यांनी असा कोणताही प्रकार झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी खिडकीजवळ बसलो होतो जिथे कोणीही बसू शकतं,”, असं अमित शहा यांनी सांगितलं.  

पंडित नेहरु अन् राजीव गांधीच बसले होते

माजी पंतप्रधान आणि काही काँग्रेस नेत्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या जागी बसल्याचा आरोप अमित शाह यांनी केला. “माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रणब मुखर्जी, माजी पंतप्रधान राजीव गांधी त्या ठिकाणी बसले होते. मी रवींद्रनाथ टागोरांच्या जागी बसलो नव्हतो पण माझ्याकडे दोन फोटो आहेत ज्यामध्ये पंडित नेहरु आणि राजीव गांधी हेही त्या जागी बसलेले दिसत आहेत,” असे म्हणत शाह यांनी फोटेदेखील सादर केले. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाlok sabhaलोकसभाRavindranath Tagoreरवींद्रनाथ टागोर