शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'रवींद्रनाथ टागोर यांच्या जागेवर मी बसलोच नाही, पंडीत नेहरुच बसले होते'

By महेश गलांडे | Updated: February 10, 2021 09:57 IST

अमित शाह यांनी आरोप फेटाळून लावताना रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्व भारती विद्यापीठाच्या पत्राचाही उल्लेख केला. “अधीर रंजन चौधरी यांनी सोमवारी बोलताना मी शांतीनिकेतन दौऱ्यावेळी रवींद्रनाथ टागोर यांच्या जागेवर बसल्याचं सांगितलं.

ठळक मुद्देअमित शाह यांनी आरोप फेटाळून लावताना रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्व भारती विद्यापीठाच्या पत्राचाही उल्लेख केला. “अधीर रंजन चौधरी यांनी सोमवारी बोलताना मी शांतीनिकेतन दौऱ्यावेळी रवींद्रनाथ टागोर यांच्या जागेवर बसल्याचं सांगितलं.

नवी दिल्ली - भारतीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्त्वाची परवानगी देण्याचा कुठलाही विचार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने लोकसभेत स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार १ कोटी २५ लाख म्हणजेच सुमारे १ टक्का भारतीय नागरिक परदेशात राहात आहेत. तसेच गेल्या ५ वर्षांमध्ये ६ लाख ७३ हजार जणांनी भारतीय नारिकत्त्वाचा त्याग केल्याची माहितीही गृहमंत्रालयाने लोकसभेत सादर केली. यावेळी, केंद्रीय गृहमंत्री यांनी, पश्चिम बंगाल दौऱ्यात शांतीनिकेतनला भेट दिल्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांच्या जागेवर आपण बसल्याला आरोप फेटाळला असून याबाबत स्पष्टीकरण दिले.  

रवींद्रनाथ टागोर यांच्या जागेवर आपण बसल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी अमित शाह यांच्यावर हा आरोप केला होता. गेल्या महिन्यात २० जानेवारीला पश्चिम बंगाल दौऱ्यावेळी अमित शाह यांनी विश्वभारती विद्यापीठाला भेट दिली तेव्हा रवींद्रनाथ टागोर यांच्या जागी बसून अनादर केला होता असा आरोप अधीर रंजन चौधरी यांच्याकडून करण्यात आला होता. या आरोपांवर अमित शाह यांनी लोकसभेत स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, यापूर्वी कोणते नेते त्या जागेवर बसले होते, आणि कोणाकोणाचे फोटो आहेत, हेही बालून दाखवले. 

अमित शाह यांनी आरोप फेटाळून लावताना रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्व भारती विद्यापीठाच्या पत्राचाही उल्लेख केला. “अधीर रंजन चौधरी यांनी सोमवारी बोलताना मी शांतीनिकेतन दौऱ्यावेळी रवींद्रनाथ टागोर यांच्या जागेवर बसल्याचं सांगितलं. माझ्याकडे विश्वभारतीच्या कुलगुरूंचं पत्र आहे ज्यामध्ये त्यांनी असा कोणताही प्रकार झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी खिडकीजवळ बसलो होतो जिथे कोणीही बसू शकतं,”, असं अमित शहा यांनी सांगितलं.  

पंडित नेहरु अन् राजीव गांधीच बसले होते

माजी पंतप्रधान आणि काही काँग्रेस नेत्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या जागी बसल्याचा आरोप अमित शाह यांनी केला. “माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रणब मुखर्जी, माजी पंतप्रधान राजीव गांधी त्या ठिकाणी बसले होते. मी रवींद्रनाथ टागोरांच्या जागी बसलो नव्हतो पण माझ्याकडे दोन फोटो आहेत ज्यामध्ये पंडित नेहरु आणि राजीव गांधी हेही त्या जागी बसलेले दिसत आहेत,” असे म्हणत शाह यांनी फोटेदेखील सादर केले. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाlok sabhaलोकसभाRavindranath Tagoreरवींद्रनाथ टागोर