शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

Mamata Banerjee : "मी भाजपाला 200 जागांचा टप्पा पार करण्याचं आव्हान देते"; ममता बॅनर्जी कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 16:27 IST

Mamata Banerjee And BJP : ममता बॅनर्जी यांनी भाजपा लोकसभा निवडणुकीत 400 हून अधिक जागा जिंकण्याच्या घोषणेची खिल्ली उडवली आहे. तसेच 200 जागांचा टप्पा पार करण्याचं आव्हान देखील दिलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा लोकसभा निवडणुकीत 400 हून अधिक जागा जिंकण्याच्या घोषणेची खिल्ली उडवली आहे. तसेच 200 जागांचा टप्पा पार करण्याचं आव्हान देखील दिलं आहे. या राज्यात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू होऊ देणार नाही, असंही ममता यांनी म्हटलं आहे. त्यांनी लोकांना सावध केलं की, CAA साठी अर्ज करणारा विदेशी होईल. यासाठी लोकांनी अर्ज करू नयेत, अशी विनंती केली आहे.

तृणमूल काँग्रेस (TMC) सुप्रीमो म्हणाल्या, "भाजपा म्हणतेय '400 पार ', मी त्यांना आधी 200 जागांचा टप्पा पार करण्याचं आव्हान देते. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत 200 हून अधिक जागा येणार असल्याचं सांगितलं, मात्र त्यांना 77 वरच थांबावं लागलं." या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दुखापतीनंतर त्यांनी आता रॅलीला संबोधित केलं. 

"सीएए हे नागरिकांना विदेशी बनवण्याचं जाळं आहे. आम्ही पश्चिम बंगालमध्ये सीएए लागू करू देणार नाही" असं म्हटलं आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये भाजपासोबत हातमिळवणी" केल्याबद्दल ममतांनी इंडिया आघाडीच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा) आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

"पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी नाही. माकपा आणि काँग्रेस भाजपासाठी काम करत आहेत" असं ममता बॅनर्जी यांनी कृष्णानगर येथे टीएमसी उमेदवार महुआ मोईत्रा यांच्या समर्थनार्थ एका निवडणूक रॅलीत म्हटलं आहे. तसेच "आमच्या खासदार महुआ मोईत्रा यांची बदनामी करण्यात आली" असं म्हटलं आहे.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपा