शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"अभिनयाशिवाय मी जगू शकत नाही, मंत्रिपदावरून हटवा"; केंद्रीय मंत्र्याची पुन्हा मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 13:16 IST

केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी नेतृत्वाकडे केली आहे. 

कोच्ची - अभिनेता ते नेता बनलेल्या केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांचं विधान पु्न्हा एकदा चर्चेत आले आहे. केरळमधून भाजपाचे एकमेव खासदार निवडून गेलेले सुरेश गोपी यांना मोदींच्या कॅबिनेटमध्ये राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र मला मंत्रिपदातून मुक्त केल्यास आनंदच होईल. सिनेमा ही माझी आवड आहे. मी अभिनयाशिवाय राहू शकत नाही असं मंत्री सुरेश गोपी यांनी म्हटलं आहे. गोपी यांचं हे विधान पहिल्यांदाच नाही तर ज्यादिवशी त्यांना केंद्रात मंत्री बनवण्यात आले त्याच्या काही तासानंतरही गोपी यांनी मंत्रिपदावरून दूर करावं अशी इच्छा व्यक्त केली होती. 

गोपी बुधवारी एका फिल्म सोहळ्यात बोलत होते. सुरेश गोपी म्हणाले की, अभिनय हा माझा छंद आहे. सिनेमाशिवाय मी राहू शकत नाही. जर मला मंत्रिपदावरून हटवले तर मी खूप खुश होईन. मंत्री बनण्यापूर्वी मी आमच्या नेत्यांना हेच सांगितले होते. मी अमित शाहांना भेटलो, त्यांनी मला तुमच्याकडे किती सिनेमे आहेत असं विचारले. त्यावर माझ्याकडे जवळपास २५ स्क्रिप्ट आणि २२ सिनेमा असल्याचे सांगितले होते असं गोपी यांनी म्हटलं. 

तसेच मला अभिनय पुन्हा सुरु करण्याची परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे. तरीही मी सर्वांना सांगू इच्छितो, मी ६ सप्टेंबरला ओट्टाकोम्बन या सिनेमातून अभिनयात पुन्हा पर्दापण करत आहे. एक मंत्री म्हणून जबाबदारीसोबत त्रिशूरमध्ये माझ्या मतदारांना वेळ देता येत नाही. जर मला मंत्रिपदावरून हटवले तर मी अभिनयही करू शकतो आणि माझ्या मतदारसंघातील मतदारांसोबतही संपर्कात राहू शकतो असं केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी सांगितले.

दरम्यान, सुरेश गोपी यांनी त्यांच्या करिअरमध्ये २५० हून अधिक सिनेमे केलेत. ८० च्या दशकात गोपी यांनी सिनेमाला सुरुवात केली. त्यांना मलयालमचा अँग्री यंग मॅन म्हणून ओळखलं जाते. गोपी यांचा राजकीय प्रवास ४ वेळा मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेसचे के.के करुणाकरण यांच्यासोबत वाढलेल्या जवळकीमुळे सुरू झाला. कालांतराने त्यांनी काँग्रेसला रामराम केला. 

...म्हणून मंत्रिपदाचा दिला होकार

मला कधीही मंत्री बनायचं नव्हते, आजही बनायचे नाही. मोदी यांनी मला मंत्री बनवण्याचा निर्णय घेतला त्यांचा आदर करतो. त्यांनी म्हटलं होते, त्रिशूरच्या लोकांसाठी हे पद तुम्हाला देतोय ज्या लोकांनी मला सत्तेत येण्यासाठी मतदान केले. मी त्यांच्या या निर्णयाचा स्वीकार केला. मी आजही माझ्या नेत्यांचे ऐकतो परंतु अभिनयाशिवाय मी जगू शकत नाही असं सुरेश गोपी यांनी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा