शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"अभिनयाशिवाय मी जगू शकत नाही, मंत्रिपदावरून हटवा"; केंद्रीय मंत्र्याची पुन्हा मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 13:16 IST

केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी नेतृत्वाकडे केली आहे. 

कोच्ची - अभिनेता ते नेता बनलेल्या केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांचं विधान पु्न्हा एकदा चर्चेत आले आहे. केरळमधून भाजपाचे एकमेव खासदार निवडून गेलेले सुरेश गोपी यांना मोदींच्या कॅबिनेटमध्ये राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र मला मंत्रिपदातून मुक्त केल्यास आनंदच होईल. सिनेमा ही माझी आवड आहे. मी अभिनयाशिवाय राहू शकत नाही असं मंत्री सुरेश गोपी यांनी म्हटलं आहे. गोपी यांचं हे विधान पहिल्यांदाच नाही तर ज्यादिवशी त्यांना केंद्रात मंत्री बनवण्यात आले त्याच्या काही तासानंतरही गोपी यांनी मंत्रिपदावरून दूर करावं अशी इच्छा व्यक्त केली होती. 

गोपी बुधवारी एका फिल्म सोहळ्यात बोलत होते. सुरेश गोपी म्हणाले की, अभिनय हा माझा छंद आहे. सिनेमाशिवाय मी राहू शकत नाही. जर मला मंत्रिपदावरून हटवले तर मी खूप खुश होईन. मंत्री बनण्यापूर्वी मी आमच्या नेत्यांना हेच सांगितले होते. मी अमित शाहांना भेटलो, त्यांनी मला तुमच्याकडे किती सिनेमे आहेत असं विचारले. त्यावर माझ्याकडे जवळपास २५ स्क्रिप्ट आणि २२ सिनेमा असल्याचे सांगितले होते असं गोपी यांनी म्हटलं. 

तसेच मला अभिनय पुन्हा सुरु करण्याची परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे. तरीही मी सर्वांना सांगू इच्छितो, मी ६ सप्टेंबरला ओट्टाकोम्बन या सिनेमातून अभिनयात पुन्हा पर्दापण करत आहे. एक मंत्री म्हणून जबाबदारीसोबत त्रिशूरमध्ये माझ्या मतदारांना वेळ देता येत नाही. जर मला मंत्रिपदावरून हटवले तर मी अभिनयही करू शकतो आणि माझ्या मतदारसंघातील मतदारांसोबतही संपर्कात राहू शकतो असं केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी सांगितले.

दरम्यान, सुरेश गोपी यांनी त्यांच्या करिअरमध्ये २५० हून अधिक सिनेमे केलेत. ८० च्या दशकात गोपी यांनी सिनेमाला सुरुवात केली. त्यांना मलयालमचा अँग्री यंग मॅन म्हणून ओळखलं जाते. गोपी यांचा राजकीय प्रवास ४ वेळा मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेसचे के.के करुणाकरण यांच्यासोबत वाढलेल्या जवळकीमुळे सुरू झाला. कालांतराने त्यांनी काँग्रेसला रामराम केला. 

...म्हणून मंत्रिपदाचा दिला होकार

मला कधीही मंत्री बनायचं नव्हते, आजही बनायचे नाही. मोदी यांनी मला मंत्री बनवण्याचा निर्णय घेतला त्यांचा आदर करतो. त्यांनी म्हटलं होते, त्रिशूरच्या लोकांसाठी हे पद तुम्हाला देतोय ज्या लोकांनी मला सत्तेत येण्यासाठी मतदान केले. मी त्यांच्या या निर्णयाचा स्वीकार केला. मी आजही माझ्या नेत्यांचे ऐकतो परंतु अभिनयाशिवाय मी जगू शकत नाही असं सुरेश गोपी यांनी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा