शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

तेली बांधवांमुळेच मी मुख्यमंत्री झालो- देवेंद्र फडणवीस; समाजाच्या मागण्यांसाठी काम करण्याची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:33 IST

तेली समाजाने नरेंद्र मोदी यांच्या रूपाने सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान दिला आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा मिळावा यासाठी मोदींनी संसदेत विधेयक सादर केले. मात्र, राज्यसभेत विरोधकांनी अडथळे आणल्याने ते संमत झाले नाही.

- सुमेध बनसोडनवी दिल्ली : तेली समाजाने नरेंद्र मोदी यांच्या रूपाने सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान दिला आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा मिळावा यासाठी मोदींनी संसदेत विधेयक सादर केले. मात्र, राज्यसभेत विरोधकांनी अडथळे आणल्याने ते संमत झाले नाही. तेली समाजाच्या मागण्यांसाठी खांद्याला खांदा लावून काम करण्याची माझी तयारी आहे. तेली समाजाचा आशीर्वाद मला नेहमी असल्यामुळेच मी मुख्यमंत्री बनलो, असे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.अ. भा. तेली शाहू महासभेतर्फे आयोजित ‘तेली एकता रॅली’तील हजारो समाजबांधवांना फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर पहिल्यांदाच तेली एकता रॅली झाली. देशातून सुमारे ८ हजारांवर तेली बांधव एकत्रित झाले होते. महासभेचे अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर, झारखंडचे मुख्यमंत्री रघुबीर दास, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपेंद्र कुशवाह, खा. रामदास तडस, ताम्रध्वज शाहू, दिल्लीचे सामाजिक न्यायमंत्री राजेंद्रपाल गौतम, बिहारचे मंत्री रामनारायण मंडल, आमदार कृष्णा खोपडे तसेच अन्य नेते उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, मोदी यांच्यामध्ये सर्व समाजाला घेऊ न पुढे जाण्याची क्षमता आहे. महाराष्ट्राने पहिल्यांदा ओबीसी मंत्रालय स्थापन करून त्यासाठी ३ हजार कोटींची तरतूद केली. ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमात सवलती दिल्या. अनुसूचित जाती, जमातींप्रमाणे ओबीसींतील गरिबांना २०१९पर्यंत महाराष्ट्र सरकार घरे देणारआहे.केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी,‘जम गई है सारी देश की रॅली,क्यों की दिल्ली मेंहो रहीं है तेली एकता रॅली,देश के प्रधानमंत्री भी है तेली,अब तो बजाओ जोरदार ताली’असे म्हणून त्यांचा पक्ष समाजासोबत असल्याचे सांगितले. आपले मंत्रालय ओबीसींचे वर्गीकरण करण्याच्या विचारात असल्याचेही आठवलेंनी स्पष्ट केले.गंगु तेली आज राजा बन सकता है : जयदत्त क्षीरसागर‘क हाँ राजा भोज, कहाँ गंगु तेली’ असे म्हणून आपल्याला कमी लेखले जाते. पण आता गंगु तेली राजा बनू शकतो. ‘जिसके साथ है तेली, वो है भाग्यशाली’ असे म्हणत सर्व राजकीय पक्षांत समाजातील नेत्यांना योग्य नेतृत्व मिळाले पाहिजे, असे क्षीरसागर यांनी ठणकावून सांगितले. ओबीसींची लोेकसंख्या सुमारे ५१ टक्के असून, त्यांना आरक्षण २७ टक्केच मिळते. त्यामुळे २०११च्या जनगणनेची आकडेवारी जाहीर करावी आणि ओबीसी आरक्षणाचे वर्गीकरण करावे, असे सांगून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याची मागणी करताना जयदत्त क्षीरसागर यांनी ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी’ अशी घोषणा दिली.कमलनाथ यांचाराजकीय टोला!पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी खोटे बोलतात, अशी टीका काँग्रेस नेहमी करते. काँग्रेसचे महासचिव कमलनाथ यांनीही सरकारवर अप्रत्यक्षपणे तशीच टीका केली. तेली समाजाला न्याय मिळावा, अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.मुख्य मागण्या- केंद्रात ओबीसी मंत्रालयाची स्थापना करून त्याचा स्वतंत्र अर्थसंकल्प असावा.- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा द्यावा.- दिल्लीत तेली समाज भवनासाठी सरकारने जमीन द्यावी.- तेली समाजाची आराध्य देवी ‘माँ कर्मा’ यांच्या नावे टपाल तिकीट काढावे.- राजकीय पक्षांनी योग्य समाजाला योग्य प्रतिनिधित्व देऊ न त्यांना खासदार, आमदार होण्याची संधी द्यावी.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNew Delhiनवी दिल्ली