शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

तेली बांधवांमुळेच मी मुख्यमंत्री झालो- देवेंद्र फडणवीस; समाजाच्या मागण्यांसाठी काम करण्याची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:33 IST

तेली समाजाने नरेंद्र मोदी यांच्या रूपाने सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान दिला आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा मिळावा यासाठी मोदींनी संसदेत विधेयक सादर केले. मात्र, राज्यसभेत विरोधकांनी अडथळे आणल्याने ते संमत झाले नाही.

- सुमेध बनसोडनवी दिल्ली : तेली समाजाने नरेंद्र मोदी यांच्या रूपाने सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान दिला आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा मिळावा यासाठी मोदींनी संसदेत विधेयक सादर केले. मात्र, राज्यसभेत विरोधकांनी अडथळे आणल्याने ते संमत झाले नाही. तेली समाजाच्या मागण्यांसाठी खांद्याला खांदा लावून काम करण्याची माझी तयारी आहे. तेली समाजाचा आशीर्वाद मला नेहमी असल्यामुळेच मी मुख्यमंत्री बनलो, असे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.अ. भा. तेली शाहू महासभेतर्फे आयोजित ‘तेली एकता रॅली’तील हजारो समाजबांधवांना फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर पहिल्यांदाच तेली एकता रॅली झाली. देशातून सुमारे ८ हजारांवर तेली बांधव एकत्रित झाले होते. महासभेचे अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर, झारखंडचे मुख्यमंत्री रघुबीर दास, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपेंद्र कुशवाह, खा. रामदास तडस, ताम्रध्वज शाहू, दिल्लीचे सामाजिक न्यायमंत्री राजेंद्रपाल गौतम, बिहारचे मंत्री रामनारायण मंडल, आमदार कृष्णा खोपडे तसेच अन्य नेते उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, मोदी यांच्यामध्ये सर्व समाजाला घेऊ न पुढे जाण्याची क्षमता आहे. महाराष्ट्राने पहिल्यांदा ओबीसी मंत्रालय स्थापन करून त्यासाठी ३ हजार कोटींची तरतूद केली. ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमात सवलती दिल्या. अनुसूचित जाती, जमातींप्रमाणे ओबीसींतील गरिबांना २०१९पर्यंत महाराष्ट्र सरकार घरे देणारआहे.केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी,‘जम गई है सारी देश की रॅली,क्यों की दिल्ली मेंहो रहीं है तेली एकता रॅली,देश के प्रधानमंत्री भी है तेली,अब तो बजाओ जोरदार ताली’असे म्हणून त्यांचा पक्ष समाजासोबत असल्याचे सांगितले. आपले मंत्रालय ओबीसींचे वर्गीकरण करण्याच्या विचारात असल्याचेही आठवलेंनी स्पष्ट केले.गंगु तेली आज राजा बन सकता है : जयदत्त क्षीरसागर‘क हाँ राजा भोज, कहाँ गंगु तेली’ असे म्हणून आपल्याला कमी लेखले जाते. पण आता गंगु तेली राजा बनू शकतो. ‘जिसके साथ है तेली, वो है भाग्यशाली’ असे म्हणत सर्व राजकीय पक्षांत समाजातील नेत्यांना योग्य नेतृत्व मिळाले पाहिजे, असे क्षीरसागर यांनी ठणकावून सांगितले. ओबीसींची लोेकसंख्या सुमारे ५१ टक्के असून, त्यांना आरक्षण २७ टक्केच मिळते. त्यामुळे २०११च्या जनगणनेची आकडेवारी जाहीर करावी आणि ओबीसी आरक्षणाचे वर्गीकरण करावे, असे सांगून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याची मागणी करताना जयदत्त क्षीरसागर यांनी ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी’ अशी घोषणा दिली.कमलनाथ यांचाराजकीय टोला!पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी खोटे बोलतात, अशी टीका काँग्रेस नेहमी करते. काँग्रेसचे महासचिव कमलनाथ यांनीही सरकारवर अप्रत्यक्षपणे तशीच टीका केली. तेली समाजाला न्याय मिळावा, अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.मुख्य मागण्या- केंद्रात ओबीसी मंत्रालयाची स्थापना करून त्याचा स्वतंत्र अर्थसंकल्प असावा.- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा द्यावा.- दिल्लीत तेली समाज भवनासाठी सरकारने जमीन द्यावी.- तेली समाजाची आराध्य देवी ‘माँ कर्मा’ यांच्या नावे टपाल तिकीट काढावे.- राजकीय पक्षांनी योग्य समाजाला योग्य प्रतिनिधित्व देऊ न त्यांना खासदार, आमदार होण्याची संधी द्यावी.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNew Delhiनवी दिल्ली