शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तेली बांधवांमुळेच मी मुख्यमंत्री झालो- देवेंद्र फडणवीस; समाजाच्या मागण्यांसाठी काम करण्याची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:33 IST

तेली समाजाने नरेंद्र मोदी यांच्या रूपाने सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान दिला आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा मिळावा यासाठी मोदींनी संसदेत विधेयक सादर केले. मात्र, राज्यसभेत विरोधकांनी अडथळे आणल्याने ते संमत झाले नाही.

- सुमेध बनसोडनवी दिल्ली : तेली समाजाने नरेंद्र मोदी यांच्या रूपाने सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान दिला आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा मिळावा यासाठी मोदींनी संसदेत विधेयक सादर केले. मात्र, राज्यसभेत विरोधकांनी अडथळे आणल्याने ते संमत झाले नाही. तेली समाजाच्या मागण्यांसाठी खांद्याला खांदा लावून काम करण्याची माझी तयारी आहे. तेली समाजाचा आशीर्वाद मला नेहमी असल्यामुळेच मी मुख्यमंत्री बनलो, असे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.अ. भा. तेली शाहू महासभेतर्फे आयोजित ‘तेली एकता रॅली’तील हजारो समाजबांधवांना फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर पहिल्यांदाच तेली एकता रॅली झाली. देशातून सुमारे ८ हजारांवर तेली बांधव एकत्रित झाले होते. महासभेचे अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर, झारखंडचे मुख्यमंत्री रघुबीर दास, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपेंद्र कुशवाह, खा. रामदास तडस, ताम्रध्वज शाहू, दिल्लीचे सामाजिक न्यायमंत्री राजेंद्रपाल गौतम, बिहारचे मंत्री रामनारायण मंडल, आमदार कृष्णा खोपडे तसेच अन्य नेते उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, मोदी यांच्यामध्ये सर्व समाजाला घेऊ न पुढे जाण्याची क्षमता आहे. महाराष्ट्राने पहिल्यांदा ओबीसी मंत्रालय स्थापन करून त्यासाठी ३ हजार कोटींची तरतूद केली. ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमात सवलती दिल्या. अनुसूचित जाती, जमातींप्रमाणे ओबीसींतील गरिबांना २०१९पर्यंत महाराष्ट्र सरकार घरे देणारआहे.केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी,‘जम गई है सारी देश की रॅली,क्यों की दिल्ली मेंहो रहीं है तेली एकता रॅली,देश के प्रधानमंत्री भी है तेली,अब तो बजाओ जोरदार ताली’असे म्हणून त्यांचा पक्ष समाजासोबत असल्याचे सांगितले. आपले मंत्रालय ओबीसींचे वर्गीकरण करण्याच्या विचारात असल्याचेही आठवलेंनी स्पष्ट केले.गंगु तेली आज राजा बन सकता है : जयदत्त क्षीरसागर‘क हाँ राजा भोज, कहाँ गंगु तेली’ असे म्हणून आपल्याला कमी लेखले जाते. पण आता गंगु तेली राजा बनू शकतो. ‘जिसके साथ है तेली, वो है भाग्यशाली’ असे म्हणत सर्व राजकीय पक्षांत समाजातील नेत्यांना योग्य नेतृत्व मिळाले पाहिजे, असे क्षीरसागर यांनी ठणकावून सांगितले. ओबीसींची लोेकसंख्या सुमारे ५१ टक्के असून, त्यांना आरक्षण २७ टक्केच मिळते. त्यामुळे २०११च्या जनगणनेची आकडेवारी जाहीर करावी आणि ओबीसी आरक्षणाचे वर्गीकरण करावे, असे सांगून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याची मागणी करताना जयदत्त क्षीरसागर यांनी ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी’ अशी घोषणा दिली.कमलनाथ यांचाराजकीय टोला!पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी खोटे बोलतात, अशी टीका काँग्रेस नेहमी करते. काँग्रेसचे महासचिव कमलनाथ यांनीही सरकारवर अप्रत्यक्षपणे तशीच टीका केली. तेली समाजाला न्याय मिळावा, अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.मुख्य मागण्या- केंद्रात ओबीसी मंत्रालयाची स्थापना करून त्याचा स्वतंत्र अर्थसंकल्प असावा.- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा द्यावा.- दिल्लीत तेली समाज भवनासाठी सरकारने जमीन द्यावी.- तेली समाजाची आराध्य देवी ‘माँ कर्मा’ यांच्या नावे टपाल तिकीट काढावे.- राजकीय पक्षांनी योग्य समाजाला योग्य प्रतिनिधित्व देऊ न त्यांना खासदार, आमदार होण्याची संधी द्यावी.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNew Delhiनवी दिल्ली