शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

मी एकटा जाण्यास तयार तरीही पीडितांना भेटू दिले नाही : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 08:30 IST

सीमेवरच रोखल्यामुळे संभलला भेट न देताच माघारी परतले

गाझियाबाद : संभल हिंसाचारातील पीडितांना भेटू न देणे व  तिथे जाण्याची परवानगी नाकारून सरकारने लोकसभा विरोधी पक्षनेत्याच्या विशेष अधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. हिंसाचार पीडितांना भेटण्यासाठी बुधवारी राहुल, प्रियांका व काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते संभलला निघाले होते. मात्र, दिल्ली-गाझीपूर सीमेवर त्यांना रोखण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधींनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. सीमेवर रोखल्यामुळे संभलला भेट न देताच गांधींना दिल्लीला परतावे लागले.

आम्ही हिंसाचार पीडितांना भेटण्यासाठी संभलला जाण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, पोलिस आमचे ऐकायला तयार नाहीत. मी नजरकैदेत आहे. ही गुंडागर्दी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींना रोखल्यानंतर काँग्रेस आणि विरोधी इंडिया आघाडीने सरकारवर टीका केली.

प्रियांका गांधींकडून नाराजी व्यक्त

nदिल्ली-गाझीपूर सीमेवर राहुल यांना पोलिसांनी रोखल्यामुळे काँग्रेस खासदार प्रियांका गांधींनी नाराजी व्यक्त केली. संभलमध्ये जे घडले ते अत्यंत चुकीचे आहे.

nराहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असून, पीडितांना भेटण्याचा त्यांच्याकडे संवैधानिक अधिकार आहे. त्यामुळे संभलला जाण्यापासून त्यांना रोखले जाऊ शकत नसल्याचे त्या म्हणाल्या.

संभलमध्ये नेमके काय घडले ते पाहणे अधिकार

पोलिसांसोबत एकट्याने जाण्याची तयारीही मी दाखवली. मात्र त्यांनी आम्हाला जाऊ दिले नाही. हे कृत्य लोकशाहीविरोधी असल्याचे स्पष्ट करत राहुल गांधींनी हातातील संविधानाची प्रत दाखवली.

संभलमध्ये नेमके काय घडले ते आम्हाला पाहायचे आहे. पीडित लोकांना भेटणे हा माझा संवैधानिक अधिकार आहे.

मला त्या अधिकारापासून वंचित ठेवले गेले. हा संविधानाला संपविणारा भारत आहे. मात्र आम्ही लढू, असे राहुल म्हणाले.

दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवर चक्का जाम

nराहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वीच काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवरील बॅरिकेड्स तोडले. त्यामुळे या द्रुतगती महामार्गावर जवळपास चार तास वाहतूक कोंडी झाली.

nमात्र, पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुन्हा बॅरिकेड्स उभारत वाहनांची तपासणी सुरू केली. त्यामुळे उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे प्रवाशी प्रशासनावर वैतागले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस