शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

मी एकटा जाण्यास तयार तरीही पीडितांना भेटू दिले नाही : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 08:30 IST

सीमेवरच रोखल्यामुळे संभलला भेट न देताच माघारी परतले

गाझियाबाद : संभल हिंसाचारातील पीडितांना भेटू न देणे व  तिथे जाण्याची परवानगी नाकारून सरकारने लोकसभा विरोधी पक्षनेत्याच्या विशेष अधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. हिंसाचार पीडितांना भेटण्यासाठी बुधवारी राहुल, प्रियांका व काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते संभलला निघाले होते. मात्र, दिल्ली-गाझीपूर सीमेवर त्यांना रोखण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधींनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. सीमेवर रोखल्यामुळे संभलला भेट न देताच गांधींना दिल्लीला परतावे लागले.

आम्ही हिंसाचार पीडितांना भेटण्यासाठी संभलला जाण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, पोलिस आमचे ऐकायला तयार नाहीत. मी नजरकैदेत आहे. ही गुंडागर्दी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींना रोखल्यानंतर काँग्रेस आणि विरोधी इंडिया आघाडीने सरकारवर टीका केली.

प्रियांका गांधींकडून नाराजी व्यक्त

nदिल्ली-गाझीपूर सीमेवर राहुल यांना पोलिसांनी रोखल्यामुळे काँग्रेस खासदार प्रियांका गांधींनी नाराजी व्यक्त केली. संभलमध्ये जे घडले ते अत्यंत चुकीचे आहे.

nराहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असून, पीडितांना भेटण्याचा त्यांच्याकडे संवैधानिक अधिकार आहे. त्यामुळे संभलला जाण्यापासून त्यांना रोखले जाऊ शकत नसल्याचे त्या म्हणाल्या.

संभलमध्ये नेमके काय घडले ते पाहणे अधिकार

पोलिसांसोबत एकट्याने जाण्याची तयारीही मी दाखवली. मात्र त्यांनी आम्हाला जाऊ दिले नाही. हे कृत्य लोकशाहीविरोधी असल्याचे स्पष्ट करत राहुल गांधींनी हातातील संविधानाची प्रत दाखवली.

संभलमध्ये नेमके काय घडले ते आम्हाला पाहायचे आहे. पीडित लोकांना भेटणे हा माझा संवैधानिक अधिकार आहे.

मला त्या अधिकारापासून वंचित ठेवले गेले. हा संविधानाला संपविणारा भारत आहे. मात्र आम्ही लढू, असे राहुल म्हणाले.

दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवर चक्का जाम

nराहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वीच काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवरील बॅरिकेड्स तोडले. त्यामुळे या द्रुतगती महामार्गावर जवळपास चार तास वाहतूक कोंडी झाली.

nमात्र, पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुन्हा बॅरिकेड्स उभारत वाहनांची तपासणी सुरू केली. त्यामुळे उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे प्रवाशी प्रशासनावर वैतागले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस