शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

मी एकटा जाण्यास तयार तरीही पीडितांना भेटू दिले नाही : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 08:30 IST

सीमेवरच रोखल्यामुळे संभलला भेट न देताच माघारी परतले

गाझियाबाद : संभल हिंसाचारातील पीडितांना भेटू न देणे व  तिथे जाण्याची परवानगी नाकारून सरकारने लोकसभा विरोधी पक्षनेत्याच्या विशेष अधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. हिंसाचार पीडितांना भेटण्यासाठी बुधवारी राहुल, प्रियांका व काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते संभलला निघाले होते. मात्र, दिल्ली-गाझीपूर सीमेवर त्यांना रोखण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधींनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. सीमेवर रोखल्यामुळे संभलला भेट न देताच गांधींना दिल्लीला परतावे लागले.

आम्ही हिंसाचार पीडितांना भेटण्यासाठी संभलला जाण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, पोलिस आमचे ऐकायला तयार नाहीत. मी नजरकैदेत आहे. ही गुंडागर्दी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींना रोखल्यानंतर काँग्रेस आणि विरोधी इंडिया आघाडीने सरकारवर टीका केली.

प्रियांका गांधींकडून नाराजी व्यक्त

nदिल्ली-गाझीपूर सीमेवर राहुल यांना पोलिसांनी रोखल्यामुळे काँग्रेस खासदार प्रियांका गांधींनी नाराजी व्यक्त केली. संभलमध्ये जे घडले ते अत्यंत चुकीचे आहे.

nराहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असून, पीडितांना भेटण्याचा त्यांच्याकडे संवैधानिक अधिकार आहे. त्यामुळे संभलला जाण्यापासून त्यांना रोखले जाऊ शकत नसल्याचे त्या म्हणाल्या.

संभलमध्ये नेमके काय घडले ते पाहणे अधिकार

पोलिसांसोबत एकट्याने जाण्याची तयारीही मी दाखवली. मात्र त्यांनी आम्हाला जाऊ दिले नाही. हे कृत्य लोकशाहीविरोधी असल्याचे स्पष्ट करत राहुल गांधींनी हातातील संविधानाची प्रत दाखवली.

संभलमध्ये नेमके काय घडले ते आम्हाला पाहायचे आहे. पीडित लोकांना भेटणे हा माझा संवैधानिक अधिकार आहे.

मला त्या अधिकारापासून वंचित ठेवले गेले. हा संविधानाला संपविणारा भारत आहे. मात्र आम्ही लढू, असे राहुल म्हणाले.

दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवर चक्का जाम

nराहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वीच काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवरील बॅरिकेड्स तोडले. त्यामुळे या द्रुतगती महामार्गावर जवळपास चार तास वाहतूक कोंडी झाली.

nमात्र, पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुन्हा बॅरिकेड्स उभारत वाहनांची तपासणी सुरू केली. त्यामुळे उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे प्रवाशी प्रशासनावर वैतागले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस