शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

माझ्या मुलाने देशासाठी दिले बलिदान याचा मला अभिमान! काश्मीरमध्ये शहीद कॅप्टन बृजेश थापा यांच्या मात्या-पित्यांचे उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 05:05 IST

बृजेश यांचे वडील निवृत्त कर्नल भुवनेश थापा यांनी देखील अशाच भावना व्यक्त केल्या. सोमवारी झालेल्या चकमकीतील बृजेश शहीद झाले होते.

जम्मू : माझ्या मुलाने देशासाठी बलिदान दिले याचा मला अभिमान वाटतो. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे, असे उद्गार शहीद बृजेश थापा यांची आई नीलिमा थापा यांनी मंगळवारी काढले. बृजेश यांचे वडील निवृत्त कर्नल भुवनेश थापा यांनी देखील अशाच भावना व्यक्त केल्या. सोमवारी झालेल्या चकमकीतील बृजेश शहीद झाले होते.

नीलिमा थापा म्हणाल्या की, आम्ही आमचा पुत्र गमावला आहे. तो आता परत येणार नाही. तो अतिशय मनमिळाऊ होता. तू नौदल किंवा हवाई दलात जा असे त्याला आम्ही सांगितले होते; पण त्याला भूदलातच जायचे होते. बृजेश थापा यांचे वडील भुवनेश हे भारतीय लष्करातील निवृत्त कर्नल आहेत. त्यांनी सांगितले की, मुलाला लष्करात जायचे होते. त्याने लहानपणापासून हे स्वप्न उराशी बाळगले होते. त्याने लष्करात जाण्यासाठी सर्व परीक्षा दिल्या व तो पहिल्याच फटक्यात उत्तीर्ण झाला.

‘काही घडलेच नाही हा थाट’

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले की, शहीद जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गेल्या ३६ दिवसांत काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, जणूकाही घडलेच नाही या थाटात मोदी सरकार वागत आहे.

दहशतवाद निपटून काढणार : सरकार

जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाल्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी तीव्र शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, काश्मीरमधून दहशतवाद निपटून काढण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.

महासंचालकांना बडतर्फ करा : मुफ्ती

पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, काश्मीरमध्ये गेल्या ३२ महिन्यांत दहशतवादी हल्ल्यांत ५० जवान शहीद झाले. याप्रकरणी जम्मू-काश्मीरच्या पोलिस महासंचालकांना बडतर्फ करण्यात यावे.

केंद्र सरकारने जबाबदारी स्वीकारावी :  राहुल गांधी

चकमकीत चार जवान शहीद झाले त्याबद्दल काँग्रेसने तीव्र शोक व्यक्त केला आहे.

काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत असून सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या त्रुटींची जबाबदारी मोदी सरकारने स्वीकारावी, अशी मागणी  विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.

त्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांविरोधात सरकारने अतिशय कठोर कारवाई केली पाहिजे. भाजपच्या चुकीच्या धोरणांची फळे लष्करातील जवान व त्यांच्या कुटुंबीयांना भोगावी लागत आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर