शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

माझ्या मुलाने देशासाठी दिले बलिदान याचा मला अभिमान! काश्मीरमध्ये शहीद कॅप्टन बृजेश थापा यांच्या मात्या-पित्यांचे उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 05:05 IST

बृजेश यांचे वडील निवृत्त कर्नल भुवनेश थापा यांनी देखील अशाच भावना व्यक्त केल्या. सोमवारी झालेल्या चकमकीतील बृजेश शहीद झाले होते.

जम्मू : माझ्या मुलाने देशासाठी बलिदान दिले याचा मला अभिमान वाटतो. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे, असे उद्गार शहीद बृजेश थापा यांची आई नीलिमा थापा यांनी मंगळवारी काढले. बृजेश यांचे वडील निवृत्त कर्नल भुवनेश थापा यांनी देखील अशाच भावना व्यक्त केल्या. सोमवारी झालेल्या चकमकीतील बृजेश शहीद झाले होते.

नीलिमा थापा म्हणाल्या की, आम्ही आमचा पुत्र गमावला आहे. तो आता परत येणार नाही. तो अतिशय मनमिळाऊ होता. तू नौदल किंवा हवाई दलात जा असे त्याला आम्ही सांगितले होते; पण त्याला भूदलातच जायचे होते. बृजेश थापा यांचे वडील भुवनेश हे भारतीय लष्करातील निवृत्त कर्नल आहेत. त्यांनी सांगितले की, मुलाला लष्करात जायचे होते. त्याने लहानपणापासून हे स्वप्न उराशी बाळगले होते. त्याने लष्करात जाण्यासाठी सर्व परीक्षा दिल्या व तो पहिल्याच फटक्यात उत्तीर्ण झाला.

‘काही घडलेच नाही हा थाट’

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले की, शहीद जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गेल्या ३६ दिवसांत काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, जणूकाही घडलेच नाही या थाटात मोदी सरकार वागत आहे.

दहशतवाद निपटून काढणार : सरकार

जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाल्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी तीव्र शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, काश्मीरमधून दहशतवाद निपटून काढण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.

महासंचालकांना बडतर्फ करा : मुफ्ती

पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, काश्मीरमध्ये गेल्या ३२ महिन्यांत दहशतवादी हल्ल्यांत ५० जवान शहीद झाले. याप्रकरणी जम्मू-काश्मीरच्या पोलिस महासंचालकांना बडतर्फ करण्यात यावे.

केंद्र सरकारने जबाबदारी स्वीकारावी :  राहुल गांधी

चकमकीत चार जवान शहीद झाले त्याबद्दल काँग्रेसने तीव्र शोक व्यक्त केला आहे.

काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत असून सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या त्रुटींची जबाबदारी मोदी सरकारने स्वीकारावी, अशी मागणी  विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.

त्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांविरोधात सरकारने अतिशय कठोर कारवाई केली पाहिजे. भाजपच्या चुकीच्या धोरणांची फळे लष्करातील जवान व त्यांच्या कुटुंबीयांना भोगावी लागत आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर