शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

"लग्नाला ४५ वर्ष झाली, मी कधीच रागवत नाही"; राज्यसभा अध्यक्षांच्या विधानाने संसदेत हास्यकल्लोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 19:19 IST

त्यावर खासदाराच्या उत्तराने तर आणखीनच हशा पिकला

Manipur Violence, Monsoon Session: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याच्या मागणीवर विरोधी पक्षांचे नेते ठामपणे मत मांडत आहेत. मात्र राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या एका मुद्यावर राज्यसभेत हास्याचा कल्लोळ झाला. जगदीप धनखड यांनी गुरुवारी विधान केले की, त्यांच्या लग्नाला 45 वर्षांहून अधिक काळ झाला असूनही ते कधीही रागावत नाहीत. ते असं का म्हणाले, आणि नक्की कसा हशा पिकला.. जाणून घेऊया

नक्की कसा घडला प्रकार?

राज्यसभेत शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपले म्हणणे मांडताना सांगितले की, 'काल अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी मणिपूरशी संबंधित स्थगिती सूचनेवर चर्चा करण्याची विनंती केली होती, पण तुम्ही थोडे रागावले होतात. त्यावर अध्यक्षांनी खर्गे यांचे मध्येच थांबवत म्हटले की 'मी ४५ वर्षांहून अधिक काळ विवाहित आहे, त्यामुळे मला कधीच राग येत नाही.' त्यांच्या या वक्तव्यावर सभागृहात चांगलाच हशा पिकला.

धनखड म्हणाले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम हे एक प्रतिष्ठित ज्येष्ठ वकील आहेत आणि त्यांना हे माहीत आहे की, ज्येष्ठ वकील या नात्याने आम्हाला रागवण्याचा अधिकार नाही, किमान अधिकार्‍यांसमोर किंवा विरोधी पक्षनेत्यांसमोर तर मुळीच नाही. मला कधीच राग येत नाही.'

अध्यक्षांचे हे वाक्य खरगे यांनी दुरुस्त केले. खर्गे म्हणाले, 'तुम्ही रागवत नाही, असं नाही. तुम्ही फक्त तुमचा राग चेहऱ्यावर दिसू देत नाही, पण आतून मात्र तुम्ही रागावलेलेच असता, ते नक्कीच जाणवतं.' खर्गे यांच्या अशा बोलण्यावर सर्व सदस्य, आणि स्वत: धनखडदेखील हसू लागले.

दुसरीकडे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर काही विरोधी नेत्यांची राज्यसभेत मणिपूरच्या मुद्द्यावरून सुरू असलेला वाद संपवण्यासाठी भेट घेतली. अध्यक्ष जगदीप धनखड यांनी बोलावलेल्या बैठकीपासून विरोधी पक्षांनी स्वतःला दूर ठेवत असताना ही बैठक झाली. दुसरीकडे, राज्यसभेतील काँग्रेसचे मुख्य व्हिप जयराम रमेश म्हणाले की, विरोधी आघाडीच्या घटक INDIA (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स) ने वाद संपवण्यासाठी मध्यम मार्ग सुचवला आहे आणि सरकार ते स्वीकारेल अशी अपेक्षा आहे. मात्र, विरोधकांनी काय ऑफर दिली आहे, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे