शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मोठी बातमी! गृहमंत्री अमित शाहांच्या सुरक्षेत मोठी चूक, TRS नेत्यानं थेट शाहांसमोरच कार लावली आडवी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 13:48 IST

हैदराबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची माहिती समोर आली आहे.

हैदराबाद-

हैदराबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार तेलंगना राष्ट्र समितीच्या (टीआरएस) एका कार्यकर्त्यानं अमित शाहांच्या ताफ्यासमोरच आपली कार आडवी लावली. यामुळे एकच गदारोळ उडाला. पोलिसांना ही कार हटवावी लागली. वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, जी श्रीनिवास नावाच्या टीआरएस नेत्याने गृहमंत्री अमित शाह यांच्या ताफ्यासमोर कार पार्क केली होती. श्रीनिवास यांनी मात्र आपली कार आपोआप थांबली आणि त्यावेळी मी खूप टेन्शनमध्ये आलो होतो. याबाबत मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणार आहे, असं म्हटलं आहे. 

पोलिसांनी जबरदस्तीनं गाडी बाजूला करताना तोडफोड केल्याचा आरोप टीआरएस नेत्यानं केला. "मी निघून जात असतानाही हे प्रकरण जाणीवपूर्वक वाढवलं गेलं", असा आरोप श्रीनिवास यांनी केला आहे. केंद्र सरकारकडून आज 'हैदराबाद मुक्ती दिना'निमित्त सिकंदराबादमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा हे प्रमुख पाहुणे असून या कार्यक्रमानिमित्त ते हैदराबाद दौऱ्यावर आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी आज हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं श्रेय सरदार वल्लभभाई पटेल यांना दिलं. तसंच व्होट बँकेच्या राजकारणामुळे आणि रझाकारांच्या "भीती"मुळे "मुक्ती दिन" साजरा करण्याच्या वचनावर पाणी सोडणाऱ्यांना शाहांनी आपल्या भाषणातून फटकारलं.

सरदार पटेल नसते तर...हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त हैदराबाद येथे आयोजित कार्यक्रमात शाह म्हणाले की, जर सरदार पटेल नसते तर हैदराबाद मुक्त व्हायला अजून बरीच वर्षे लागली असती. निजामाच्या रझाकारांचा पराभव झाल्याशिवाय अखंड भारताचे स्वप्न साकार होणार नाही हे पटेलांना माहीत होतं, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. 'इतक्या वर्षांनंतर सरकारच्या सहभागाने ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ साजरा व्हावा, ही या भूमीतील जनतेची इच्छा होती, मात्र ७५ वर्षांनंतरही मतपेटीचं राजकारण सुरू आहे, हे दुर्दैव आहे. इथे यामुळे "हैदराबाद मुक्ती दिन" साजरा करण्याचं धाडस काहींना जमलं नाही', असंही शाह म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाह