शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Hyderabad Encounter: हैदराबाद एन्काऊंटरची चौकशी होणार; तेलंगना सरकारने नेमली 'एसआयटी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 08:20 IST

६ डिसेंबर रोजी हैदराबाद येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर करुन खात्मा केल्याची घटना घडली.

हैदराबाद - शहरातील डॉक्टर तरुणीसोबत बलात्कार आणि हत्या केलेल्या आरोपींचा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पोलिसांकडून झालेला आरोपींचा एन्काऊंटर याची चौकशी करण्यासाठी तेलंगाना सरकारने विशेष तपास पथक(एसआयटी) स्थापन केलं आहे. या एसआयटीचे प्रमुख रचकोंडा येथील पोलीस आयुक्त महेश एम भागवत यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

रविवारी हैदराबादच्या साइबराबाद पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत बलात्कार प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर बनावटरित्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीनंतर तेलंगना केसीआर सरकारने तपासासाठी एसआयटी नेमली आहे. एसआयटीकडून या प्रकरणाशी जोडलेल्या सर्व साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत. तसेच एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करणार आहे. या प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगही सक्रीय झाला आहे. शनिवारी आयोगाची टीम हैदराबादला पोहचली. ज्याठिकाणी या आरोपींचे मृतदेह ठेवण्यात आले आहेत त्याठिकाणी आयोगाच्या टीमने जाऊन पाहणी केली. 

तेलंगना सरकारसोबतच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. पोलिसांनी केलेला एन्काऊंटर ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेचा संविधानिक चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच तेलंगना हायकोर्टने शुक्रवारी राज्य सरकारला आदेश दिले आहेत की, या चारही आरोपींचे मृतदेह ९ डिसेंबर रात्री ९ वाजेपर्यंत सुरक्षित ठेवावे. 

६ डिसेंबर रोजी हैदराबाद येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर करुन खात्मा केल्याची घटना घडली. यामध्ये गुन्ह्यातील चारही आरोपींचा मृत्यू झाला. याबाबत अनेक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वंचित बहुनज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही केली होती. 

याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हैदराबादमध्ये ज्यांनी एन्काऊंटर केलं आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे. कायद्याची प्रक्रिया आहे ती ओलांडता येत नाही. झटपट न्याय देण्याची प्रथा पोलिसांनी सुरु केली आहे. त्या पोलिसांवर कारवाई व्हायला हवी. आरोपीला अशाप्रकारे संपविता येत नाही, फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करुन महिना-दोन महिन्यात हे प्रकरण संपवता आलं असतं असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.  

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरणPoliceपोलिसRapeबलात्कार