शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Hyderabad Encounter: हैदराबाद एन्काऊंटरची चौकशी होणार; तेलंगना सरकारने नेमली 'एसआयटी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 08:20 IST

६ डिसेंबर रोजी हैदराबाद येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर करुन खात्मा केल्याची घटना घडली.

हैदराबाद - शहरातील डॉक्टर तरुणीसोबत बलात्कार आणि हत्या केलेल्या आरोपींचा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पोलिसांकडून झालेला आरोपींचा एन्काऊंटर याची चौकशी करण्यासाठी तेलंगाना सरकारने विशेष तपास पथक(एसआयटी) स्थापन केलं आहे. या एसआयटीचे प्रमुख रचकोंडा येथील पोलीस आयुक्त महेश एम भागवत यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

रविवारी हैदराबादच्या साइबराबाद पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत बलात्कार प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर बनावटरित्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीनंतर तेलंगना केसीआर सरकारने तपासासाठी एसआयटी नेमली आहे. एसआयटीकडून या प्रकरणाशी जोडलेल्या सर्व साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत. तसेच एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करणार आहे. या प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगही सक्रीय झाला आहे. शनिवारी आयोगाची टीम हैदराबादला पोहचली. ज्याठिकाणी या आरोपींचे मृतदेह ठेवण्यात आले आहेत त्याठिकाणी आयोगाच्या टीमने जाऊन पाहणी केली. 

तेलंगना सरकारसोबतच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. पोलिसांनी केलेला एन्काऊंटर ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेचा संविधानिक चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच तेलंगना हायकोर्टने शुक्रवारी राज्य सरकारला आदेश दिले आहेत की, या चारही आरोपींचे मृतदेह ९ डिसेंबर रात्री ९ वाजेपर्यंत सुरक्षित ठेवावे. 

६ डिसेंबर रोजी हैदराबाद येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर करुन खात्मा केल्याची घटना घडली. यामध्ये गुन्ह्यातील चारही आरोपींचा मृत्यू झाला. याबाबत अनेक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वंचित बहुनज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही केली होती. 

याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हैदराबादमध्ये ज्यांनी एन्काऊंटर केलं आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे. कायद्याची प्रक्रिया आहे ती ओलांडता येत नाही. झटपट न्याय देण्याची प्रथा पोलिसांनी सुरु केली आहे. त्या पोलिसांवर कारवाई व्हायला हवी. आरोपीला अशाप्रकारे संपविता येत नाही, फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करुन महिना-दोन महिन्यात हे प्रकरण संपवता आलं असतं असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.  

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरणPoliceपोलिसRapeबलात्कार