शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पार्ट टाईम कारवाया, फुल टाईम दहशत; 'हायब्रीड' दहशतवाद्यांमुळे वाढलं सुरक्षा दलांचं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 21:26 IST

श्रीनगर शहर आणि काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांसमोर नवं आव्हान

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये आता सुरक्षा दलांसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. हायब्रीड दहशतवाद्यांच्या रुपात सुरक्षा दलांचे जवान श्रीनगरसह काश्मीर खोऱ्यात अडचणींचा सामना करत आहेत. दहशतवादी कारवाया घडवल्यानंतर सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे जीवन जगणारे दहशतवादी सुरक्षा दलांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. कट्टर दहशतवाद्यांची बरीचशी माहिती सुरक्षा दलांकडे उपलब्ध आहे. पण सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगणाऱ्या हायब्रीड दहशतवाद्यांची फारशी नोंद सुरक्षा दलांकडे नाही.  त्यामुळे या दहशतवाद्यांचा सामना करण्याचं आव्हान आता सुरक्षा दलांसमोर आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून श्रीनगरसह खोऱ्यांमधील सोप्या लक्ष्यांवरील हल्ले वाढले आहेत. बहुतांश घटनांमध्ये पिस्तुलधारी तरुणांचा हात असल्याचं उघड झालं आहे. सुरक्षा दलांच्या यादीत या दहशतवाद्यांची नावं नाहीत. हायब्रीड दहशतवादी पार्ट टाईम कारवाया करत असल्यानं त्यांच्यावर लक्ष ठेवणं अवघड असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

हायब्रीड दहशतवादी पूर्ण वेळ कारवाया करत नाहीत. या दहशतवाद्यांना मोहीमा दिल्या जातात. त्यांच्याकडे काही कारवायांची जबाबदारी असते. वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर हायब्रीड दहशतवादी कामाला लागतात. मोहीम पूर्ण झाल्यावर ते त्यांच्या नियमित दिनचर्येकडे वळतात. सर्वसामान्य आयुष्य जगतात. पुढील आदेश येईपर्यंत हायब्रीड दहशतवादी कोणतीही कारवाई करत नाहीत. ते सामान्य नागरिकाप्रमाणे वावरतात. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणं अवघड जातं अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी