शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

दिल्लीत रेल्वे रुळांभोवतीच्या झोपड्या हटणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 07:05 IST

रेल्वे मंत्रालयाची कारवाई सुरू

नवी दिल्ली : रेल्वे रुळांशेजारी असलेल्या झोपड्या हटविण्याची प्रक्रिया रेल्वे मंत्रालयात सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर उत्तर रेल्वे विभागात दिल्लीतील १४० कि.मी. रुळांभोवती असलेल्या ४८ हजार झोपड्या तीन महिन्यांत हटविण्यात येतील. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या पीठाने ३१ हा निर्णय आॅगस्टला दिला. २ सप्टेंबर रोजी निवृत्त झालेल्या मिश्रा यांच्या निर्णयामुळे गेल्या सात दशकांपासून प्रलंबित प्रश्न देशभर चर्चेला आहे.

अतिक्रमण हटविताना राजकीय हस्तक्षेप चालणार नाही, असेही न्यायालयाने सुनावले. शुक्रवारी न्यायालयीन निर्णयाच्या फेरविचारासाठी काँग्रेस नेते अजय माकन यांनी याचिका दाखल केली. झोपडपट्टीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा विचार व्हावा, असे त्यांनी म्हटले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे रुळांभोवतीचे अतिक्रमण हटविण्यासाठी कृती समिती आहे. वारंवार या समितीवर राजकीय दडपण येत असल्याचे ईपीसीएच्या अहवालात म्हटले आहे. त्याचाही संदर्भ सुनावणीदरम्यान आला.

दिल्लीतील झोपडपट्ट्या कमी झाल्या नाहीत, उलट वाढल्या, असेही या अहवालात नमूद होते. रेल्वे रुळाशेजारी असलेली मोकळी जागा कचरा डेपो बनली होती. तेथे कचऱ्याचे ढीग साचले. पुढच्या तीन महिन्यांत अतिक्रमणासह हा कचराही तेथून हटवावा लागेल. त्यासाठी दिल्ली महानगरपालिका व राज्य सरकारला अनुक्रमे ७० व ३० टक्के शुल्क देण्याचेही निर्देश न्यायालयाने दिले. 1999 साली दिल्ली विभागातील झोपडपट्ट्या हटविण्यासाठी १५६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पुढे २००६ साली त्यात ४४ कोटींची भर पडली. योजना विस्तार झाला; पण अतिक्रमण मात्र हटले नाही.

48,000 पैकी २७ हजार झोपड्या रेल्वे अतिसुरक्षा विभागात आहेत. रेल्वे रुळांपासून १५ मीटरचा परिसर सुरक्षा विभाग असतो. तेथील अतिक्रमणामुळे रेल्वे संचालनावरही परिणाम होतो. मतपेट्यांच्या राजकारणामुळे याकडे दुर्लक्ष होत राहिले व अतिक्रमणात वाढ झाली.च्उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी वेळेत होणार असल्याचेसांगितले.

टॅग्स :delhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय