शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

दिल्लीत रेल्वे रुळांभोवतीच्या झोपड्या हटणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 07:05 IST

रेल्वे मंत्रालयाची कारवाई सुरू

नवी दिल्ली : रेल्वे रुळांशेजारी असलेल्या झोपड्या हटविण्याची प्रक्रिया रेल्वे मंत्रालयात सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर उत्तर रेल्वे विभागात दिल्लीतील १४० कि.मी. रुळांभोवती असलेल्या ४८ हजार झोपड्या तीन महिन्यांत हटविण्यात येतील. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या पीठाने ३१ हा निर्णय आॅगस्टला दिला. २ सप्टेंबर रोजी निवृत्त झालेल्या मिश्रा यांच्या निर्णयामुळे गेल्या सात दशकांपासून प्रलंबित प्रश्न देशभर चर्चेला आहे.

अतिक्रमण हटविताना राजकीय हस्तक्षेप चालणार नाही, असेही न्यायालयाने सुनावले. शुक्रवारी न्यायालयीन निर्णयाच्या फेरविचारासाठी काँग्रेस नेते अजय माकन यांनी याचिका दाखल केली. झोपडपट्टीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा विचार व्हावा, असे त्यांनी म्हटले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे रुळांभोवतीचे अतिक्रमण हटविण्यासाठी कृती समिती आहे. वारंवार या समितीवर राजकीय दडपण येत असल्याचे ईपीसीएच्या अहवालात म्हटले आहे. त्याचाही संदर्भ सुनावणीदरम्यान आला.

दिल्लीतील झोपडपट्ट्या कमी झाल्या नाहीत, उलट वाढल्या, असेही या अहवालात नमूद होते. रेल्वे रुळाशेजारी असलेली मोकळी जागा कचरा डेपो बनली होती. तेथे कचऱ्याचे ढीग साचले. पुढच्या तीन महिन्यांत अतिक्रमणासह हा कचराही तेथून हटवावा लागेल. त्यासाठी दिल्ली महानगरपालिका व राज्य सरकारला अनुक्रमे ७० व ३० टक्के शुल्क देण्याचेही निर्देश न्यायालयाने दिले. 1999 साली दिल्ली विभागातील झोपडपट्ट्या हटविण्यासाठी १५६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पुढे २००६ साली त्यात ४४ कोटींची भर पडली. योजना विस्तार झाला; पण अतिक्रमण मात्र हटले नाही.

48,000 पैकी २७ हजार झोपड्या रेल्वे अतिसुरक्षा विभागात आहेत. रेल्वे रुळांपासून १५ मीटरचा परिसर सुरक्षा विभाग असतो. तेथील अतिक्रमणामुळे रेल्वे संचालनावरही परिणाम होतो. मतपेट्यांच्या राजकारणामुळे याकडे दुर्लक्ष होत राहिले व अतिक्रमणात वाढ झाली.च्उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी वेळेत होणार असल्याचेसांगितले.

टॅग्स :delhiदिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय