शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

दिव्यांग पत्नीला हातगाडीवर बसविलं अन् ओढत ४३५ किमी मुलांसह 'त्यानं' केली पायपीट! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 14:12 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : मध्य प्रदेशातील एका मजुराने आझमगडहून बिलासपूरपर्यंत जवळपास ४३५ किलोमीटरचा प्रवास आपल्या दोन मुलांसह दिव्यांग पत्नीला हातगाडीवर बसवून ती ओढत पायी केल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन सुरु आहे.लॉकडाऊनमुळे अनेकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. सर्वात जास्त त्रास अनेक राज्यांत अडकलेल्या मजुरांना सोसावा लागत आहे.

कटनी - कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे अनेकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. सर्वात जास्त त्रास अनेक राज्यांत अडकलेल्या मजुरांना सोसावा लागत आहे. अशा परिस्थिती अनेक मजुरांनी आपल्या गावी जाण्यासाठी पदयात्रा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

अशाच प्रकारे मध्य प्रदेशातील एका मजुराने आझमगडहून बिलासपूरपर्यंत जवळपास ४३५ किलोमीटरचा प्रवास आपल्या दोन मुलांसह दिव्यांग पत्नीला हातगाडीवर बसवून ती ओढत पायी केल्याचे समोर आले आहे. तसेच, या प्रवासादरम्यान मुलांच्या पायात चप्पल नव्हते, त्यामुळे अनवाणी चालून मुलांच्या पायाला जखमा झाल्या आहेत.

ज्यावेळी हे कुटुंब प्रवास करत असताना कटनी पोलिसांनी त्यांना पाहिले आणि त्यांची चौकशी केली. त्यावेळी आझमगडहून बिलासपूरला जाण्यासाठी आम्ही प्रवास करत असल्याचे या मुजराने सांगितले. या मजुराने आपले नाव राकेश कोटरे आणि पत्नीचे नाव रामेश्वरी कोटरे असल्याचे सांगितले. त्यानंतर कटनी पोलिसांनी त्याच्या दिव्यांग पत्नीला आणि मुलांना एका खासगी गाडीत बसविले आणि छत्तीसगडसाठी रवाना गेले. 

(गर्भवती पत्नी, मुलीसाठी 'त्यानं' बनवली लाकडाची गाडी अन् ८०० किमी ओढत पायी चालला...)

लॉकडाऊनमुळे राकेश कोटरे याचे आझमगडमधील काम बंद झाले. त्यामुळे त्याला आपल्या कुटुंबीयांसह आपल्या घरी बिलासपूर येथे जाण्यास भाग पडले. या प्रवासात राकेश कोटरेला पोलिसांनी लॉकडाऊनमध्ये माणुसकी दाखविली आणि त्याच्या दिव्यांग पत्नीला आणि मुलाला बिलासपूरला पाठविण्यास मदत केली. पोलिसांनी कोटरे कुटुंबीयांना जेवण दिले. त्यानंतर राकेशच्या दिव्यांग पत्नीला आणि मुलांना मास्क दिले आणि एका गाडीतून त्यांना छत्तीसगडला रवाना केले.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांत मजूर अडकलेले आहेत. त्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यातच कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे मजुरांना त्यांच्या घरी पाठवताना विशेष काळजी सरकारकडून घेण्यात येत आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेश