शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग पत्नीला हातगाडीवर बसविलं अन् ओढत ४३५ किमी मुलांसह 'त्यानं' केली पायपीट! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 14:12 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : मध्य प्रदेशातील एका मजुराने आझमगडहून बिलासपूरपर्यंत जवळपास ४३५ किलोमीटरचा प्रवास आपल्या दोन मुलांसह दिव्यांग पत्नीला हातगाडीवर बसवून ती ओढत पायी केल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन सुरु आहे.लॉकडाऊनमुळे अनेकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. सर्वात जास्त त्रास अनेक राज्यांत अडकलेल्या मजुरांना सोसावा लागत आहे.

कटनी - कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे अनेकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. सर्वात जास्त त्रास अनेक राज्यांत अडकलेल्या मजुरांना सोसावा लागत आहे. अशा परिस्थिती अनेक मजुरांनी आपल्या गावी जाण्यासाठी पदयात्रा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

अशाच प्रकारे मध्य प्रदेशातील एका मजुराने आझमगडहून बिलासपूरपर्यंत जवळपास ४३५ किलोमीटरचा प्रवास आपल्या दोन मुलांसह दिव्यांग पत्नीला हातगाडीवर बसवून ती ओढत पायी केल्याचे समोर आले आहे. तसेच, या प्रवासादरम्यान मुलांच्या पायात चप्पल नव्हते, त्यामुळे अनवाणी चालून मुलांच्या पायाला जखमा झाल्या आहेत.

ज्यावेळी हे कुटुंब प्रवास करत असताना कटनी पोलिसांनी त्यांना पाहिले आणि त्यांची चौकशी केली. त्यावेळी आझमगडहून बिलासपूरला जाण्यासाठी आम्ही प्रवास करत असल्याचे या मुजराने सांगितले. या मजुराने आपले नाव राकेश कोटरे आणि पत्नीचे नाव रामेश्वरी कोटरे असल्याचे सांगितले. त्यानंतर कटनी पोलिसांनी त्याच्या दिव्यांग पत्नीला आणि मुलांना एका खासगी गाडीत बसविले आणि छत्तीसगडसाठी रवाना गेले. 

(गर्भवती पत्नी, मुलीसाठी 'त्यानं' बनवली लाकडाची गाडी अन् ८०० किमी ओढत पायी चालला...)

लॉकडाऊनमुळे राकेश कोटरे याचे आझमगडमधील काम बंद झाले. त्यामुळे त्याला आपल्या कुटुंबीयांसह आपल्या घरी बिलासपूर येथे जाण्यास भाग पडले. या प्रवासात राकेश कोटरेला पोलिसांनी लॉकडाऊनमध्ये माणुसकी दाखविली आणि त्याच्या दिव्यांग पत्नीला आणि मुलाला बिलासपूरला पाठविण्यास मदत केली. पोलिसांनी कोटरे कुटुंबीयांना जेवण दिले. त्यानंतर राकेशच्या दिव्यांग पत्नीला आणि मुलांना मास्क दिले आणि एका गाडीतून त्यांना छत्तीसगडला रवाना केले.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांत मजूर अडकलेले आहेत. त्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यातच कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे मजुरांना त्यांच्या घरी पाठवताना विशेष काळजी सरकारकडून घेण्यात येत आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेश