शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

पत्नी MBBS ला प्रवेश मिळवू शकली नाही म्हणून पतीने जाळल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 13:43 IST

एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून पतीने पत्नीला जाळून मारल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देएमबीबीएसमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून पतीने पत्नीला जाळून मारल्याची घटना समोर आली आहे. मबीबीएसमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून हरिकाचा पती ऋषी कुमार यांने तिची जाळून हत्या केल्याचा आरोप हरिकाच्या कुटुंबियांनी केला आहे.25 वर्षीय तरूणी हरिकाला वैद्यकिय शिक्षण घ्यायचं होतं.

हैदराबाद, दि. 19- एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून पतीने पत्नीला जाळून मारल्याची घटना समोर आली आहे. या मुलीचं नाव हरिका असल्याचं समजतं आहे. एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून हरिकाचा पती ऋषी कुमार यांने तिची जाळून हत्या केल्याचा आरोप हरिकाच्या कुटुंबियांनी केला आहे. 25 वर्षीय तरूणी हरिकाला वैद्यकिय शिक्षण घ्यायचं होतं. हरिकाचा पती सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. या प्रकरणी हरिकाच्या पती आणि त्याच्या आई-वडिलांना अटक करण्यात आली आहे. 

हरिकाने आत्महत्या केल्याचा दावा तिचा पती ऋषी कुमार याने केला आहे. पण घटनास्थळाची पाहणी केल्यावर ही हत्या असल्याचा संशय पोलिसांना येतो आहे. हरिकाच्या पतीने तिची हत्या केली असावी, असा संशय असल्याचं पोलिसांनी म्हंटलं आहे. पण हरिकासोबत नेमकं काय घडलं हे पोस्टमार्टेमनंतर समोर येईल, असंही पोलिसांनी सांगितलं. हरिकाचा पती ऋषी कुमारने हरिकाच्या आईला रविवारी रात्री घरी बोलावून हरिकाने स्वतःला जाळून घेतल्याचं सांगितलं, अशी माहिती पोलिसांकडून मिळते आहे. हैदराबादच्या एलबी नगरमधील रॉक टाऊन कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. 

हरिका गेल्या काही काळापासून वैद्यकीय प्रवेश परीक्षा देण्याच्या प्रयत्नात होती. पण ती परीक्षा पास होत नव्हती. यावर्षीही ती परीक्षेत पास होऊ शकली नाही. हरिकाची एका खासगी कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी कोर्ससाठी प्रवेश मिळत होता. पण तिच्या पतीला ते मान्य नव्हतं म्हणून तो तिला घटस्फोटाची धमकी देत होता, असा आरोप हरिकाच्या आई-वडिलांनी केला आहे. ह

रिका आणि ऋषीचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. तेव्हापासून एमबीबीएसमध्ये जागा मिळत नाही म्हणून हरिकाला पतीकडून त्रास दिला जात होता. तसंच तिला हुंड्यासाठीही त्रास दिला जात होता. ही एक नियोजीत हत्या असल्याचं हरिकाच्या आई व बहिणीने म्हंटलं आहे. 'हरिकाचा आधी गळा दाबण्यात आला नंतर तिला जाळण्यात आलं का ? या गोष्टी शवविच्छेदनानंतर स्पष्ट होतील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.