शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

हम दो हमारे दो... शेतकरी आंदोलनावरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 14:55 IST

केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींचा दौरा आहे, या दौऱ्यात राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांवर हल्लाबोल केला.

नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर गेल्या अडीच महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसक वळण लागलं. अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले. पोलिसांनी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांना अटक केली. यानंतर जगभरातून आंदोलनाची दखल घेतली गेली. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्गनं आणि पॉप स्टार रिहाना हिनेही (Greta Thunberg) शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केलं. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे. 

केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींचा दौरा आहे, या दौऱ्यात राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांवर हल्लाबोल केला. जगभराने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची दखल घेतली. मात्र, दिल्लीतील केंद्र सरकारला अद्यापही शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी वाटत नाही. शेती हा एकमेव शेतकऱ्यांचाच उद्योग-व्यवसाय आहे. भारत मातेशी संबंधित उद्योग आहे, इतर प्रत्येक व्यवसाय हे इतरांशी निगडीत असतात. पण, शेती या उद्योगावरही आपलं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे. या दोन ते तीन लोकांसाठीच केंद्र सरकारने 3 शेतकरी कायदे केले आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.  

माझ्या संसदेतील भाषणात मी हिंदीत म्हटलो होतो, हम दो हमारे दो... म्हणजे सरकारमधील दोन आणि सरकारबाहेरील दोन लोकं मिळूनच सर्वकाही निर्णय घेत असल्याचे राहुल गांधींनी म्हटले. राहुल गांधींनी हम दो हमारे दो म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा आणि उद्योगपती अनिल अंबानी व गौतम अदानी यांचं नाव न घेता, त्यांच्यावर टीका केली होती. 

 

इंधन दरवाढीवरुनही भडकले राहुल गांधी

"तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचं महान काम मोदी सरकार मोफत करतंय" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किंमती वाढलेल्या नाहीत, तर उलट घसरल्या आहेत असं देखील म्हणत मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "पेट्रोल पंपावर गाडीत तेल भरताना जेव्हा तुमची नजर वेगाने धावणाऱ्या मीटरकडे जाईल, तेव्हा हे लक्षात घ्या की, कच्च्या तेलाचे दर वाढलेले नाहीत, तर उलट कमी झाले आहेत. पेट्रोल 100 रुपये प्रति लीटर आहे. तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचं महान काम मोदी सरकार मोफत करत आहे" असं राहुल यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीPetrolपेट्रोल