शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

हम दो हमारे दो... शेतकरी आंदोलनावरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 14:55 IST

केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींचा दौरा आहे, या दौऱ्यात राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांवर हल्लाबोल केला.

नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर गेल्या अडीच महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसक वळण लागलं. अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले. पोलिसांनी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांना अटक केली. यानंतर जगभरातून आंदोलनाची दखल घेतली गेली. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्गनं आणि पॉप स्टार रिहाना हिनेही (Greta Thunberg) शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केलं. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे. 

केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींचा दौरा आहे, या दौऱ्यात राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांवर हल्लाबोल केला. जगभराने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची दखल घेतली. मात्र, दिल्लीतील केंद्र सरकारला अद्यापही शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी वाटत नाही. शेती हा एकमेव शेतकऱ्यांचाच उद्योग-व्यवसाय आहे. भारत मातेशी संबंधित उद्योग आहे, इतर प्रत्येक व्यवसाय हे इतरांशी निगडीत असतात. पण, शेती या उद्योगावरही आपलं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे. या दोन ते तीन लोकांसाठीच केंद्र सरकारने 3 शेतकरी कायदे केले आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.  

माझ्या संसदेतील भाषणात मी हिंदीत म्हटलो होतो, हम दो हमारे दो... म्हणजे सरकारमधील दोन आणि सरकारबाहेरील दोन लोकं मिळूनच सर्वकाही निर्णय घेत असल्याचे राहुल गांधींनी म्हटले. राहुल गांधींनी हम दो हमारे दो म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा आणि उद्योगपती अनिल अंबानी व गौतम अदानी यांचं नाव न घेता, त्यांच्यावर टीका केली होती. 

 

इंधन दरवाढीवरुनही भडकले राहुल गांधी

"तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचं महान काम मोदी सरकार मोफत करतंय" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किंमती वाढलेल्या नाहीत, तर उलट घसरल्या आहेत असं देखील म्हणत मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "पेट्रोल पंपावर गाडीत तेल भरताना जेव्हा तुमची नजर वेगाने धावणाऱ्या मीटरकडे जाईल, तेव्हा हे लक्षात घ्या की, कच्च्या तेलाचे दर वाढलेले नाहीत, तर उलट कमी झाले आहेत. पेट्रोल 100 रुपये प्रति लीटर आहे. तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचं महान काम मोदी सरकार मोफत करत आहे" असं राहुल यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीPetrolपेट्रोल