शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

रामनाथ कोविंद यांची निवड झाली कशी?

By admin | Updated: June 21, 2017 01:31 IST

केवळ नशीब आणि सार्वजनिक आयुष्यात कधीही वाद निर्माण न करणे या दोनच कारणांमुळे रामनाथ कोविंद हे भाजपचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरले.

हरिष गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केवळ नशीब आणि सार्वजनिक आयुष्यात कधीही वाद निर्माण न करणे या दोनच कारणांमुळे रामनाथ कोविंद हे भाजपचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरले. राजकारणात वजनदार नसताना, स्वत:चा कोणताही ठसा उमटविला नसताना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सततचा संपर्क नसताना त्यांना भाजपाने ही उमेदवारी दिली.त्यांची निवड होण्याची जी प्रमुख कारणे आहेत, त्यातील एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर प्रदेशातील दलित व्यक्तीच राष्ट्रपतीपदाची उमेदवार हवी होती. त्यांच्याखेरीज त्या राज्यात भाजपाकडे महत्त्वाचा दलित नेता नव्हता. मुरली मनोहर जोशी यांचे नाव चर्चेमध्ये होते. पण भाजपला दलित चेहराच हवा होता. जोशी १0९१ साली पक्षाध्यक्ष असताना रामनाथ कोविंद हे केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील वकील होते. नंतर सलग १२ वर्षे राज्यसभेवर ते होते.२0१४ साली मोदी यांनी वाराणसीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कोविंद यांना प्रचाराची मोठी जबाबदारी दिली गेली. त्यानंतर ते मोदींचे विश्वासू नेते बनले. रा. स्व. संघाच्या नेत्यांनाही कोविंद यांच्या नावामुळे आश्चर्य वाटले आहे. मात्र, यूपीतील दलिताची निवड केल्याने संघ नेतेही गप्प बसले. थावरचंद गेहलोत आणि सत्यनारायण जतिया असे दलित चेहरे भाजपकडे होते. ते दोघे मध्य प्रदेशातील होते व मोदींना यूपीचाच नेता हवा होता. बिहारचे राज्यपाल म्हणून कोविंद यांनी चित्रकुट येथील दिव्यांगांच्या पहिल्या विद्यापीठाला ३ मे रोजी भेट दिली होती. त्या भेटीत विद्यापीठाचे संस्थापक जगद्गुरू राम भद्रचार्यजी यांनी कोविंद यांना खूप मोठे पद मिळेल, असा आशीर्वाद दिला होता. भद्रचार्यजी स्वत: अंध आहेत. स्वत: मोदी हेही भद्रचार्यजी यांचे शिष्य आहेत. अपंगांना दिव्यांग म्हणून संबोधण्यापासून, त्यांना विविध सुविधा देण्याचा सल्ला मोदी यांना त्यांच्याकडूनच मिळाला. राम भद्रचार्य यांना २0१५ साली पद्मविभूषण किताब देण्यात आला होता. आपल्या उपस्थितीतीच कोविंद यांना भद्रचार्य यांनी आशीर्वाद दिला होता, असे भाजपचे उपाध्यक्ष खा. प्रभात झा यांनीही मान्य केले.