शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रामनाथ कोविंद यांची निवड झाली कशी?

By admin | Updated: June 21, 2017 01:31 IST

केवळ नशीब आणि सार्वजनिक आयुष्यात कधीही वाद निर्माण न करणे या दोनच कारणांमुळे रामनाथ कोविंद हे भाजपचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरले.

हरिष गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केवळ नशीब आणि सार्वजनिक आयुष्यात कधीही वाद निर्माण न करणे या दोनच कारणांमुळे रामनाथ कोविंद हे भाजपचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरले. राजकारणात वजनदार नसताना, स्वत:चा कोणताही ठसा उमटविला नसताना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सततचा संपर्क नसताना त्यांना भाजपाने ही उमेदवारी दिली.त्यांची निवड होण्याची जी प्रमुख कारणे आहेत, त्यातील एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर प्रदेशातील दलित व्यक्तीच राष्ट्रपतीपदाची उमेदवार हवी होती. त्यांच्याखेरीज त्या राज्यात भाजपाकडे महत्त्वाचा दलित नेता नव्हता. मुरली मनोहर जोशी यांचे नाव चर्चेमध्ये होते. पण भाजपला दलित चेहराच हवा होता. जोशी १0९१ साली पक्षाध्यक्ष असताना रामनाथ कोविंद हे केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील वकील होते. नंतर सलग १२ वर्षे राज्यसभेवर ते होते.२0१४ साली मोदी यांनी वाराणसीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कोविंद यांना प्रचाराची मोठी जबाबदारी दिली गेली. त्यानंतर ते मोदींचे विश्वासू नेते बनले. रा. स्व. संघाच्या नेत्यांनाही कोविंद यांच्या नावामुळे आश्चर्य वाटले आहे. मात्र, यूपीतील दलिताची निवड केल्याने संघ नेतेही गप्प बसले. थावरचंद गेहलोत आणि सत्यनारायण जतिया असे दलित चेहरे भाजपकडे होते. ते दोघे मध्य प्रदेशातील होते व मोदींना यूपीचाच नेता हवा होता. बिहारचे राज्यपाल म्हणून कोविंद यांनी चित्रकुट येथील दिव्यांगांच्या पहिल्या विद्यापीठाला ३ मे रोजी भेट दिली होती. त्या भेटीत विद्यापीठाचे संस्थापक जगद्गुरू राम भद्रचार्यजी यांनी कोविंद यांना खूप मोठे पद मिळेल, असा आशीर्वाद दिला होता. भद्रचार्यजी स्वत: अंध आहेत. स्वत: मोदी हेही भद्रचार्यजी यांचे शिष्य आहेत. अपंगांना दिव्यांग म्हणून संबोधण्यापासून, त्यांना विविध सुविधा देण्याचा सल्ला मोदी यांना त्यांच्याकडूनच मिळाला. राम भद्रचार्य यांना २0१५ साली पद्मविभूषण किताब देण्यात आला होता. आपल्या उपस्थितीतीच कोविंद यांना भद्रचार्य यांनी आशीर्वाद दिला होता, असे भाजपचे उपाध्यक्ष खा. प्रभात झा यांनीही मान्य केले.