शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

रामनाथ कोविंद यांची निवड झाली कशी?

By admin | Updated: June 21, 2017 01:31 IST

केवळ नशीब आणि सार्वजनिक आयुष्यात कधीही वाद निर्माण न करणे या दोनच कारणांमुळे रामनाथ कोविंद हे भाजपचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरले.

हरिष गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केवळ नशीब आणि सार्वजनिक आयुष्यात कधीही वाद निर्माण न करणे या दोनच कारणांमुळे रामनाथ कोविंद हे भाजपचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरले. राजकारणात वजनदार नसताना, स्वत:चा कोणताही ठसा उमटविला नसताना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सततचा संपर्क नसताना त्यांना भाजपाने ही उमेदवारी दिली.त्यांची निवड होण्याची जी प्रमुख कारणे आहेत, त्यातील एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर प्रदेशातील दलित व्यक्तीच राष्ट्रपतीपदाची उमेदवार हवी होती. त्यांच्याखेरीज त्या राज्यात भाजपाकडे महत्त्वाचा दलित नेता नव्हता. मुरली मनोहर जोशी यांचे नाव चर्चेमध्ये होते. पण भाजपला दलित चेहराच हवा होता. जोशी १0९१ साली पक्षाध्यक्ष असताना रामनाथ कोविंद हे केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील वकील होते. नंतर सलग १२ वर्षे राज्यसभेवर ते होते.२0१४ साली मोदी यांनी वाराणसीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कोविंद यांना प्रचाराची मोठी जबाबदारी दिली गेली. त्यानंतर ते मोदींचे विश्वासू नेते बनले. रा. स्व. संघाच्या नेत्यांनाही कोविंद यांच्या नावामुळे आश्चर्य वाटले आहे. मात्र, यूपीतील दलिताची निवड केल्याने संघ नेतेही गप्प बसले. थावरचंद गेहलोत आणि सत्यनारायण जतिया असे दलित चेहरे भाजपकडे होते. ते दोघे मध्य प्रदेशातील होते व मोदींना यूपीचाच नेता हवा होता. बिहारचे राज्यपाल म्हणून कोविंद यांनी चित्रकुट येथील दिव्यांगांच्या पहिल्या विद्यापीठाला ३ मे रोजी भेट दिली होती. त्या भेटीत विद्यापीठाचे संस्थापक जगद्गुरू राम भद्रचार्यजी यांनी कोविंद यांना खूप मोठे पद मिळेल, असा आशीर्वाद दिला होता. भद्रचार्यजी स्वत: अंध आहेत. स्वत: मोदी हेही भद्रचार्यजी यांचे शिष्य आहेत. अपंगांना दिव्यांग म्हणून संबोधण्यापासून, त्यांना विविध सुविधा देण्याचा सल्ला मोदी यांना त्यांच्याकडूनच मिळाला. राम भद्रचार्य यांना २0१५ साली पद्मविभूषण किताब देण्यात आला होता. आपल्या उपस्थितीतीच कोविंद यांना भद्रचार्य यांनी आशीर्वाद दिला होता, असे भाजपचे उपाध्यक्ष खा. प्रभात झा यांनीही मान्य केले.