शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
3
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
4
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
5
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
6
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
7
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
8
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
9
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
10
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
11
मुंबईवरून निघालेल्या खासगी बसचा सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात; वाहनांच्या एक किलोमीटरपर्यंत रांगा
12
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
13
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
14
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
15
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
16
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
17
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
18
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
19
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
20
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
Daily Top 2Weekly Top 5

जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 11:55 IST

नळावाटे आलेल्या दूषित पाण्यामुळे संपूर्ण वस्तीत मृत्यूचे तांडव सुरू असून, आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

माणसाची सर्वात मूलभूत गरज म्हणजे पाणी. पण हेच पाणी जर मृत्यूचे कारण बनले तर? मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदूरमधील भागीरथपुरा भागात सध्या अशीच भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. नळावाटे आलेल्या दूषित पाण्यामुळे संपूर्ण वस्तीत मृत्यूचे तांडव सुरू असून, आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे २ हजार लोकसंख्या असलेल्या या वस्तीत सध्या भीती आणि आक्रोश पाहायला मिळत असून, १०० हून अधिक जणांना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं? 

भागीरथपुरा वस्तीतील नागरिकांनी नळाचे पाणी प्यायल्यानंतर अचानक त्यांना उलट्या, तीव्र पोटदुखी आणि चक्कर येण्याचे प्रकार सुरू झाले. पाहता पाहता ही संख्या वाढत गेली आणि वस्तीतील घराघरांतून रुग्ण बाहेर पडू लागले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनमध्ये ड्रेनेज आणि सांडपाणी मिसळल्याने हे 'जलसंकट' ओढावले. या गंभीर घटनेनंतर महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले असून तातडीने ३ जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

मृत्यूचा आकडा वाढल्याने खळबळ 

आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, प्रशासनाच्या दाव्यानुसार यातील ३ मृत्यू हे थेट दूषित पाण्यामुळे झाले असून, उर्वरित ५ जणांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. सध्या ६६ रुग्णांवर उपचार सुरू असून ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेची गंभीर दखल घेत मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.

महापौर म्हणतात, 'आमची नैतिक जबाबदारी' 

इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. "ज्या ठिकाणी ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत होते, तो भाग आम्ही शोधला आहे. हे काम युद्धपातळीवर दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत," असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, महापौरांनी ६ महिन्यांपूर्वीच या भागातील जुन्या पाईपलाईन बदलण्याचे आणि तक्रारींची दखल घेण्याचे निर्देश दिले होते. तरीही कामात दिरंगाई का झाली, याची चौकशी आता केली जाणार आहे.

राजकारण तापलं! 

एकीकडे वस्तीत मृत्यूची भीती असताना दुसरीकडे या प्रकरणावरून राजकारणही तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी सत्ताधारी भाजपवर कडाडून टीका केली आहे. यावर महापौरांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की, "विपक्षाने अशा संवेदनशील वेळी राजकारण करू नये, आमचे प्राधान्य नागरिकांचे प्राण वाचवण्याला आहे." भागीरथपुरात सध्या प्रत्येक नळाची तपासणी केली जात असून टँकरद्वारे शुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, गेलेले जीव परत येणार नसल्याने स्थानिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indore Water Crisis: Contaminated Water Kills Eight, Officials Suspended

Web Summary : Contaminated water in Indore's Bhagirathpura caused eight deaths, triggering widespread panic. A drainage mix-up in the water supply led to the crisis. Three officials were suspended, and the government announced compensation for the victims' families. Investigation is underway, pure water being supplied.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशwater pollutionजल प्रदूषण