शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Dhirendra Shastri : बागेश्वर सरकार कशी ओळखतात लोकांच्या मनातील गोष्ट; समोर आलं बाबांचं सर्वात मोठं रहस्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 18:44 IST

मध्यप्रदेशातील छत्रपूर जिल्ह्यातील ग्राम गडमध्ये असलेले बागेश्वर धाम सरकार (Bageshwar Dham Sarkar) देशभरात प्रसिद्ध झाले आहे. बागेश्वर धामच्या दरबारात लोक मोठ्या संख्येने हजेरी लावतात आणि यासाठी आपला नंबरही लावतात. मात्र, सर्वात मोठा प्रश्न आहे की, बाबा लोकांच्या मनातील गोष्ट कशी ओळखतात?

रायपूर - बागेश्वर धामचे कथाकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या जबरदस्त चर्चेत आहेत. बागेश्वर महाराज या नावाने प्रसिद्धी मिळवलेले धीरेंद्र शास्त्री लोकांच्या मनातील गोष्टी ओळखतात, असा दावा केला जातो. बागेश्वर धामच्या दिव्य दरबारात संधी मिळाली तर नशीब बदलते, अशी लोकांची भावना आहे. महाराज लोकांच्या समस्या न सांगताच ओळखतात आणि त्या त्यांना सांगतात. याचवेळी ते एका कागदावर समस्येचे समाधान लिहून आपली समस्या लवकरच दूर होईल असे सांगतात.

मध्यप्रदेशातील छत्रपूर जिल्ह्यातील ग्राम गडमध्ये असलेले बागेश्वर धाम सरकार (Bageshwar Dham Sarkar) देशभरात प्रसिद्ध झाले आहे. बागेश्वर धामच्या दरबारात लोक मोठ्या संख्येने हजेरी लावतात आणि यासाठी आपला नंबरही लावतात. मात्र, सर्वात मोठा प्रश्न आहे की, बाबा लोकांच्या मनातील गोष्ट कशी ओळखतात?

बागेश्वर सरकारचा दावा आहे, की त्यांच्याजवळ अशी शक्ती आहे की, ते लोकांच्या मनातील गोष्ट ओळखू शकतात. ते सांगतात की त्यांच्याकडे वरून कनेक्शन आहे. त्यांना वरूनच सिग्नल मिळतो. ते या सिंग्नलच्या माध्यमानेच लोकांच्या मनात काय सुरू आहे? हे ओळखतात. बागेश्वर महाराजांच्या याच शक्तींमुळे बागेश्वर धाममध्ये जाणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढू लागली आहे.

...पण कशी ओळखतात मनातील गोष्ट?बागेश्वर महाराज लोकांच्या मनातील गोष्ट कशी ओळखतात? हा एक मोठा प्रश्न आहे. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काही तज्ज्ञांचा दावा आहे की, ही एक कला आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर त्याच प्रकारचे भाव येत असतात, जे काही लोक समजू शकतात. जसे, दृष्टी नसलेले लोक ब्रेल लिपीच्या सहाय्याने काहीही वाचू शकतात. तसेच काही मेंटॅलिस्ट देखील असतात, जे लोकांच्या चेहऱ्यावरील भाव वाचू शकतात. जगभरात असे अनेक मेंटॅलिस्ट आहेत. जे अशा पद्धतीने लोकांच्या चेहऱ्यावरील भाव वाचू शकतात अथवा ओळखू शकतात.

हाव-भाव आणि शारीरिक हालचालींशिवाय, समोरच्या व्यक्तीचा व्यवहार कसा आहे? याच बरोबर त्याच्या बोलण्याची पद्धत कशी आहे? हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे जाणवत असते. जर एखाद्याला मेंटॅलिस्ट आर्ट येत असेल, तर ती व्यक्तीही अशा पद्धतीने दुसऱ्याच्या मनातील गोष्टी जाणू शकते. याच पद्धतीने काही लोकांकडे सम्मोहन कलाही असते, तेही लोकांच्या मनातील काही गोष्टी सहजपणे ओळखू शकतात.

टॅग्स :HinduismहिंदुइझमMadhya Pradeshमध्य प्रदेश