शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

भारत कसा असावा? देशवासीयांना नेमके काय वाटते? PM नरेंद्र मोदींनी वाचून दाखवली यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 08:56 IST

PM Narendra Modi Speech on 78th India Independence Day: विकसित भारताच्या संकल्पासाठी सरकारने नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या, असे सांगत देशवासीयांना नेमके काय वाटते, ते पंतप्रधान मोदींनी सांगितले.

PM Narendra Modi Speech on 78th India Independence Day: संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ११ व्यांदा तिरंगा फडकवला. ध्वजारोहण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. विकसित भारत, समृद्ध भारत, व्होकल फॉर लोकल यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच देशवासीयांना आपला भारत कसा असावा, याबाबत नेमके काय वाटते, याची एक यादीत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनात वाचून दाखवली.

जागतिक विकासात भारताचे योगदान वाढले आहे. भारताची निर्यात सातत्याने वाढत आहे. परकीय चलनाचा साठा पूर्वीच्या तुलनेत दुप्पट होत चालला आहे. जागतिक संस्थांचा भारतावरील विश्वास वाढला आहे. भारत वेगाने प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होत आहे. शासन, प्रशासनाच्या प्रत्येक विभागात दोन सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. पंचायत स्तरावर असेच व्हायला हवे. असे केल्यास लाखो सुधारणा काही वेळातच घडतील. सामान्यांचे जीवन सुकर होईल. असे झाले तर आपल्या देशातील युवक नवीन उंची गाठतील, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. 

देशाची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याचे दिसते

जाती-पातीच्या वरती उठून प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवला जातो, तेव्हा देशाची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याचे दिसते. मध्यमवर्गीय कुटुंबांना उत्तम जीवन जगण्याची अपेक्षा असते. मी एक स्वप्न पाहिले आहे की, २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प पूर्ण झाला, तर त्याचा एक घटक असा असेल की, सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनात हस्तक्षेप करू नये. सरकारची गरज भासल्यास अशी व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प केला जातो की, सरकारमुळे कोणताही त्रास, अडथळा निर्माण होऊ नयेत. परंतु सरकारची गरज भासल्यास प्रशासन समस्यांमध्ये मदतीला उपलब्ध असेल, असे मोदी म्हणाले.

दरम्यान, विकसित भारतासाठी सरकारने सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या. हजारो देशवासीयांनी सल्ला, सूचना सरकारला पाठवल्या, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आणि काही यादी वाचून दाखवली.

भारत कसा असावा? देशवासीयांना नेमके काय वाटते? 

- भारत हे जगाचे स्किल कॅपिटल बनावे. 

- भारत जागतिक उत्पादन केंद्र बनायला हवे.  

- भारतीय विद्यापीठे जागतिक दर्जाची व्हायला हवीत. 

- भारतीय मीडिया जागतिक बनला पाहिजे 

- भारतातील कुशल युवक ही जगाची पहिली पसंती बनली पाहिजे. 

- भारताने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लवकरात लवकर स्वावलंबी व्हावे. 

- सुपरफूड्स जगातील प्रत्येक डायनिंग टेबलवर पोहोचवायला हवेत. जगाचे पोषित करून भारतातील शेतकऱ्याला समृद्ध केले पाहिजे. 

- छोटे विभागांचा कारभार आणि प्रशासन सुधारले पाहिजे. 

- न्याय मिळण्यास विलंब होत आहे, ही चिंताजनक आहे; आपल्या देशाच्या न्याय व्यवस्थेत सुधारणा करण्याची नितांत गरज आहे. 

- वाढत्या नैसर्गिक संकटात प्रशासनासाठी मोहिमा राबवायला हव्यात. 

- अंतराळात भारताचे स्पेस स्टेशन असावे. 

- भारत पारंपारिक औषधे आणि समृद्ध आरोग्याचे केंद्र म्हणून विकसित व्हावा. 

- भारत लवकरात लवकर तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनायला पाहिजे, अशा अनेक सूचना देशवासीयांनी दिल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNarendra Modiनरेंद्र मोदीRed Fortलाल किल्ला