शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

Coronavirus: तिसरी लाट आली हे कसे ओळखायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 09:59 IST

अलीकडेच इंडियन मेडिकल असोसिएशन, या देशातील सर्वोच्च वैद्यकीय संघटनेने ‘कोरोनाची तिसरी लाट अटळ’ असल्याचा इशारा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क : सिमला-कुलू मनाली तसेच इतर पर्यटन स्थळांवरची गर्दी पाहून अलीकडेच इंडियन मेडिकल असोसिएशन, या देशातील सर्वोच्च वैद्यकीय संघटनेने ‘कोरोनाची तिसरी लाट अटळ’ असल्याचा इशारा दिला. केंद्र सरकारही सातत्याने तिसऱ्या लाटेविषयी इशारे देत आहे. कोरोनाची ‘आर व्हॅल्यू’ तूर्तास ०.८८ एवढी असून ती १.० वर पोहोचताच तिसऱ्या लाटेवर शिक्कामोर्तब होणार आहे. याबाबतही केंद्राने सर्व राज्यांना सतर्क केले आहे. जाणून घेऊ या ‘आर व्हॅल्यू’ काय आहे ते...

‘आर व्हॅल्यू’ म्हणजे काय, ती कशी मोजतात?

- डेटा सायन्सनुसार आर व्हॅल्यू म्हणजे कोरोना विषाणूचा रिप्रोडक्शन रेट म्हणजेच पुनरुत्पादन होण्याचा दर

- एक बाधित व्यक्ती किती जणांना बाधित करू शकते, हे ‘आर व्हॅल्यू’ सांगते. जर १.० बाधित आणखी १.० जणांना बाधित करत असतील तर ‘आर व्हॅल्यू’ १.० इतकी असते.

- जर १०० बाधित आणखी ८० जणांपर्यंत हा संसर्ग पोहचवत असतील तर ‘आर व्हॅल्यू’ ०.८० इतकी असेल.

चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसच्या (आयएमएससी) अभ्यासानुसार सध्या देशाचा सरासरी ‘आर व्हॅल्यू’ १.० पेक्षा कमी असली तरी काही राज्यांत ती झपाट्याने वाढत आहे.

‘आर व्हॅल्यू’ १.० पेक्षा अधिक होणे म्हणजे रुग्ण वाढू लागल्याचे संकेत आहेत. हे टाळण्यासाठी मास्क, सुरक्षित अंतर आदी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. - अजय भल्ला, केंद्रीय गृह सचिव

राज्यनिहाय ‘आर व्हॅल्यू’

अरुणाचल प्रदेश : १.१४मणिपूर : १.०७  मेघालय : ०.९२त्रिपुरा : १.१५  मिझोराम : ०.८६सिक्कीम : ०.८८ आसाम : ०.८६

महाराष्ट्र : ३० मे रोजी  

‘आर व्हॅल्यू’: ०.८४जूनअखेरीस : ०.८९ झाली. या दरम्यान रुग्ण वाढले

केरळ  ‘आर व्हॅल्यू’ : ०.८४ जुलैच्या सुरुवातीलाच ‘आर व्हॅल्यू’: १.१० इतकी.रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे

१५ फेब्रुवारीनंतर ‘आर व्हॅल्यू’: ०.९३ वरून १.०२ वर रुग्ण वाढू लागल्याचे संकेत

९ मार्च ते २१ एप्रिलदरम्यान ‘आर व्हॅल्यू’: १.३७ वर. या काळात रुग्णवाढ वेगाने

दुसरी लाट वाढ सर्वोच्च स्थानाच्या दिशेने२४ एप्रिल ते १ मे दरम्यान  ‘आर व्हॅल्यू’ : १.१८ वर. रुग्ण कमी होऊ लागले

१ मे ते ७ मे दरम्यान ‘आर व्हॅल्यू’ : १.१० वर. रुग्ण कमी होऊ लागले

१५ मे ते २६ मे दरम्यान ‘आर व्हॅल्यू’: ०.७८. रुग्णसंख्येचा आलेख झपाट्याने घसरू लागला

सद्य:स्थिती२० जून ते ७ जुलै दरम्यान ‘आर व्हॅल्यू’: ०.८८

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई