शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

गरिबांना किती पैसे दिले? केंद्र सरकार तपासणार, मोफत सुविधांवर २५ लाख कोटी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 07:38 IST

Central Government: केंद्र आणि राज्य सरकारांनी समाजातील विविध घटकांना दिलेल्या सुविधांचे नेमके मूल्य जाणून घेण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली  - केंद्र आणि राज्य सरकारांनी समाजातील विविध घटकांना दिलेल्या सुविधांचे नेमके मूल्य जाणून घेण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. एका अंदाजानुसार, केंद्र सरकार रोख रक्कम व वस्तूंच्या स्वरुपात मदत देण्यासाठी विविध योजनांवर १० लाख कोटी रुपयांचा खर्च करते. याबरोबरच ३६ राज्य सरकारे व केंद्र शासित प्रदेश आपल्या योजनांवर १५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करतात.

योग्य लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचावेत, यासाठी सरकारने अनेक केंद्रीय योजनांचे एकत्रीकरण केले आहे व प्रक्रिया सोपी केली आहे. या योजनेत पीएम किसान योजनेचा समावेश नाही. त्यात ९ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये रोख रक्कम मिळते. एका अंदाजानुसार, सुमारे २० कोटी कुटुंबांना (७५ कोटी लोक) केंद्राच्या योजनांचा लाभ मिळतो.

किती लोक दारिद्र्यरेषेच्या वर आणले गेले आहेत, हे शोधण्याचा हा पहिला प्रयत्न आहे. यामुळे लाभार्थ्यांची सर्वसमावेशक यादी तयार करण्यासही मदत मिळणार आहे. कुटुंबांना मिळत असलेल्या मोफत सुविधांवर ग्राहक खर्च सर्वेक्षणाने यापूर्वीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकारने विविध स्तरांवर दिलेल्या सबसिडी आणि मोफत सुविधांचे मूल्य जाणून घेण्याचे काम सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. 

व्यापक मोहीमराज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) राव इंद्रजित सिंह यांच्या नेतृत्त्वाखालील सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने ग्राहक खर्च सर्वेक्षणांतर्गत एकापाठोपाठ सर्वेक्षण करण्याचे ठरविले आहे. त्यात सातत्य आणि गरिबांना कशी मदत झाली, याची माहिती मिळवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मंत्रालयाने डेटामधील विसंगतीचे कारण देत २०१७-१८चा सर्वे रद्द केला होता. त्यामुळे यावेळी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार