शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोदी सरकारच्या काळात दहशतवाद किती घटला? अमित शाहांनी संसदेत मांडली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 11:19 IST

Terrorism In Jammu Kashmir: गेल्या काही काळापासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचं प्रमाण बऱ्यापैकी घटलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दहशतवादाशी संबंधित घटनांची आकडेवारी संसदेत सादर केली.

गेल्या काही काळापासून जम्मू-काश्मीरमध्येदहशतवादी कारवायांचं प्रमाण बऱ्यापैकी घटलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दहशतवादाशी संबंधित घटनांची आकडेवारी संसदेत सादर केली. जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी कारवायांमध्ये ७० टक्क्यांनी घट झाल्याचा दावा अमित शाह यांनी या आकडेवारीच्या माध्यमातून केला. 

जम्मू काश्मीरशी संबंधित जम्मू-काश्मीर पुनर्गठन (संशोधन) विधेयक आणि जम्मू-काश्मीर आरक्षण (संशोधन) विधेयक ही दोन विधेयके सोमवारी राज्यसभेमध्ये पारित करण्यात आली. या विधेयकांवरील चर्चेवेळी अमित शाह यांनी सांगितले की, कलम ३७० ने जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादाला खतपाणी घातले. तसेच दहशतवादाला जन्म दिला. आज कलम ३७० बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा विरोधी पक्षांचा मोठा पराभव आहे, असा टोलाही अमित शाह यांनी लगावला. 

अमित शाह यांनी चर्चेदरम्यान जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांबाबत काही आकडेवारीही सभागृहासमोर ठेवली.  त्यांनी दावा केला की, मोदी सरकारच्या काळात काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये ७० टक्क्यांनी घट झाली आहे. अमित शाह यांनी सांगितले की, २००४ ते २०१४ या काळात जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाच्या ७ हजार २१७ घटना घडल्या. तर मागच्या दहा वर्षांमध्ये २ हजार १९७ दहशतवादी कारवाया झाल्या आहेत. 

अमित शाह यांनी पुढे सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये २०१० मध्ये दगडफेकीच्या २ हजार ६५६ घटना घडल्या होत्या. मात्र यावर्षी दगडफेकीची एकही घटना घडली नाही. सन २०१० मध्ये दगडफेकीत ११२ जणांचा मृत्यू झाला होता. तर यावर्षी अशा प्रकारे एकही मृत्यू झालेला नाही. तसेच २०१० मध्ये पाकिस्तानकडून ७० वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं होतं. मात्र यावर्षी केवळ ६ वेळा शस्रसंधीचं उल्लंघन झालं आहे.

सभागृहातील चर्चेदरम्यान अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादामुळे आतापर्यंत ४२ हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. १९९४ ते २००४ दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाच्या ४० हजार १६४ घटना घडल्या होत्या. तर २००४ ते २०१४ या काळात दहशतवादाच्या ७ हजार २१७ घटना घडल्या होत्या. तर मोदी सरकारच्या कार्यकाळात २०१४ ते २०२३ पर्यंत दहशतवादाच्या सुमारे २ हजार घटना घडल्या आहेत, असे अमित शाह यांनी सांगितले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादCentral Governmentकेंद्र सरकारArticle 370कलम 370