शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

Coronavirus: २० लाख कोटींमध्ये शून्य किती?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 08:04 IST

Coronavirus: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही चूक केली त्यानंतर त्यांनी दुसरे ट्विट करून तिला दुरुस्त केले

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केलीसोशल मीडियात निर्णयाचं कौतुक करताना नेटिझन्सने घेतली फिरकीअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही केली चूक पण तातडीने केली दुरुस्त

नवी दिल्ली – देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले आणि २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली, त्यानंतर ट्विटरवर एक मजेदार ट्रेंड सुरू झाला. या निर्णयाचे कौतुक करून लोकांनी एकमेकांना विचारण्यास सुरुवात केली की, सांगा २० लाख कोटींमध्ये किती शून्य आहेत? या ट्रेंडमध्ये बॉलिवूड अभिनेता अनुपम खेरही पुढे आले.

अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये २० लाख कोटी शून्यामध्ये लिहून दाखवले आणि माझे गणित बरोबर आहे ना? असं लोकांना विचारलं. ट्विटरवर #20lakhcrores ने ट्रेंड करण्यास सुरवात केली. पॅकेजबद्दल आधीच चर्चा केली जात होती, मात्र लोक शून्यावरही मनोरंजक गोष्टी लिहित होते. अनुपम खेर यांनी ट्वीट केलं की, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात तेव्हा केवळ देशच नाही तर संपूर्ण जग ऐकतं आणि प्रेरणा घेते. १३० कोटी भारतीय आत्मनिर्भरतेची गुरुकिल्ली बाळगून वाटचाल करतील तर यश निश्चितच मिळेल. २०,००,००० कोटी असं दिसतात - २0000000000000! गणित बरोबर आहे ना? बहुधा! त्यांचे हे ट्विट काही मिनिटांत व्हायरल झाले. काही वेळात सुमारे साडेतीन हजार लोकांनी रीट्वीट केलं.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही चूक केली त्यानंतर त्यांनी दुसरे ट्विट करून तिला दुरुस्त केले. निर्मला सीतारमण यांनी लिहिलं होतं की स्वावलंबी भारत मोहिमेसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले गेले आहे. ज्यामध्ये जीडीपीच्या सुमारे १०% (सुमारे २० लाख रुपये) वचनबद्ध आहे. त्यांच्याकडून अशी चूक झाली की २० लाख कोटी ऐवजी केवळ 20 लाख लिहिले गेले. त्यानंतर त्यांनी लगेचच दुसरे ट्विट करून दुरुस्त केले.

दरम्यान, आम्ही स्वावलंबी भारत बनवू शकतो. निश्चय केला तर कोणतेही लक्ष्य साध्य करता येते. निश्चयाने भारत स्वावलंबी होऊ शकतो. शेतकरी, श्रमिक, गरीब, मध्यम वर्गासह समाजातील सर्व घटकांसोबत कुटीर, सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योगाल दिलासा देण्यासाठी घोषित २० लाख कोटींच्या विशषे आर्थिक योजने स्वावलंबी भारताला गती मिळेल. सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने घोषित केलेल्या निर्णयांसह हे विशेष आर्थिक पॅकेज २० लाख कोटींचे असेल. ते देशाच्या ढोबळ उत्पादनाच्या (जीडीपी) १० टक्के आहे. या पॅकेजची विस्तृत माहिती वित्तमंत्री निर्मला सीतारामण येत्या काही दिवसांत देतील अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारच्या भाषणात दिली.

 

टॅग्स :Anupam Kherअनुपम खेरcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन