शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: २० लाख कोटींमध्ये शून्य किती?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 08:04 IST

Coronavirus: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही चूक केली त्यानंतर त्यांनी दुसरे ट्विट करून तिला दुरुस्त केले

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केलीसोशल मीडियात निर्णयाचं कौतुक करताना नेटिझन्सने घेतली फिरकीअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही केली चूक पण तातडीने केली दुरुस्त

नवी दिल्ली – देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले आणि २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली, त्यानंतर ट्विटरवर एक मजेदार ट्रेंड सुरू झाला. या निर्णयाचे कौतुक करून लोकांनी एकमेकांना विचारण्यास सुरुवात केली की, सांगा २० लाख कोटींमध्ये किती शून्य आहेत? या ट्रेंडमध्ये बॉलिवूड अभिनेता अनुपम खेरही पुढे आले.

अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये २० लाख कोटी शून्यामध्ये लिहून दाखवले आणि माझे गणित बरोबर आहे ना? असं लोकांना विचारलं. ट्विटरवर #20lakhcrores ने ट्रेंड करण्यास सुरवात केली. पॅकेजबद्दल आधीच चर्चा केली जात होती, मात्र लोक शून्यावरही मनोरंजक गोष्टी लिहित होते. अनुपम खेर यांनी ट्वीट केलं की, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात तेव्हा केवळ देशच नाही तर संपूर्ण जग ऐकतं आणि प्रेरणा घेते. १३० कोटी भारतीय आत्मनिर्भरतेची गुरुकिल्ली बाळगून वाटचाल करतील तर यश निश्चितच मिळेल. २०,००,००० कोटी असं दिसतात - २0000000000000! गणित बरोबर आहे ना? बहुधा! त्यांचे हे ट्विट काही मिनिटांत व्हायरल झाले. काही वेळात सुमारे साडेतीन हजार लोकांनी रीट्वीट केलं.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही चूक केली त्यानंतर त्यांनी दुसरे ट्विट करून तिला दुरुस्त केले. निर्मला सीतारमण यांनी लिहिलं होतं की स्वावलंबी भारत मोहिमेसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले गेले आहे. ज्यामध्ये जीडीपीच्या सुमारे १०% (सुमारे २० लाख रुपये) वचनबद्ध आहे. त्यांच्याकडून अशी चूक झाली की २० लाख कोटी ऐवजी केवळ 20 लाख लिहिले गेले. त्यानंतर त्यांनी लगेचच दुसरे ट्विट करून दुरुस्त केले.

दरम्यान, आम्ही स्वावलंबी भारत बनवू शकतो. निश्चय केला तर कोणतेही लक्ष्य साध्य करता येते. निश्चयाने भारत स्वावलंबी होऊ शकतो. शेतकरी, श्रमिक, गरीब, मध्यम वर्गासह समाजातील सर्व घटकांसोबत कुटीर, सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योगाल दिलासा देण्यासाठी घोषित २० लाख कोटींच्या विशषे आर्थिक योजने स्वावलंबी भारताला गती मिळेल. सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने घोषित केलेल्या निर्णयांसह हे विशेष आर्थिक पॅकेज २० लाख कोटींचे असेल. ते देशाच्या ढोबळ उत्पादनाच्या (जीडीपी) १० टक्के आहे. या पॅकेजची विस्तृत माहिती वित्तमंत्री निर्मला सीतारामण येत्या काही दिवसांत देतील अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारच्या भाषणात दिली.

 

टॅग्स :Anupam Kherअनुपम खेरcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन